शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Eknath Khadse : "पतीव्रताच नसेल तर दागिने घालून काय फायदा?"; एकनाथ खडसेंचा शिंदे गटावर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2022 14:23 IST

Eknath Khadse And CM Eknath Shinde : "आपल्या जिल्ह्यातील 5 आमदार शिंदेंच्या गटात गेले. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना वाढवली, घडवली."

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपा आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. "पतीव्रताच नसेल तर दागिने घालून काय फायदा?" असं म्हणत शिंदे गटावर घणाघात केला आहे. तसेच महाराष्ट्राच्या इतिहासात एवढं घाणेरडं राजकारण कधी झालं नव्हतं. खोक्यांची भाषा कधी झाली नव्हती असंही म्हटलं आहे. यासोबतच धनुष्यबाणाच्या जोरावर, बाळासाहेबांच्या पुण्याईवर तुम्ही निवडून आलात आणि त्यांच्याशी धोका देऊन दुसरीकडे गेलात हे जनता उघड्या डोळ्याने पाहत आहे असं म्हणत निशाणा साधला आहे. 

"राज्यातील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. राज्यात झालेले फेरबदल जनतेला फार काही आवडलेले नाही. महाराष्ट्राच्या इतिहासात एवढं घाणेरडं राजकारण कधी झालं नव्हतं. खोक्यांची भाषा कधी झाली नव्हती. निवडणुका विचाराने लढल्या जायच्या. अलीकडे हे सरकार पाडायच, ते पाडायचं हेच चाललं आहे" असं टीकास्त्र एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी सोडलं आहे. 

"बाळासाहेबांच्या पुण्याईवर तुम्ही निवडून आलात आणि त्यांच्याशी धोका देऊन दुसरीकडे गेलात"

"आपल्या जिल्ह्यातील 5 आमदार शिंदेंच्या गटात गेले. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना वाढवली, घडवली. धनुष्यबाणाच्या जोरावर, बाळासाहेबांच्या पुण्याईवर तुम्ही निवडून आलात आणि त्यांच्याशी धोका देऊन दुसरीकडे गेलात हे जनता उघड्या डोळ्याने पाहत आहे. राज्यातील जनता तुम्हाला धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही" असंही खडसेंनी म्हटलं आहे. एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी असं म्हटलं आहे. 

"आपल्याला हा मतदारसंघ जिंकायचा आहे"

"तुम्ही 200 कोटीच काय 600 कोटी आणले असतील पण तत्त्व आणि सत्त्व शिल्लक राहिले नाही. पण निष्ठा शिल्लक नसेल तर 200 कोटी आणले काय आणि 600 कोटी आणले, त्याला काय अर्थ आहे? पतीव्रताच नसेल तर दागिने घालून काय फायदा?" असं म्हणत टीका केली आहे. तसेच आपल्याला हा मतदारसंघ जिंकायचा आहे हा दृष्टीने काम करायचं आहे. हा मतदारसंघ पिंजून काढायचा आहे असंही एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :eknath khadseएकनाथ खडसेEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपाShiv Senaशिवसेना