आठवलेंना हव्यात २५ जागा

By Admin | Updated: June 18, 2014 05:14 IST2014-06-18T05:14:45+5:302014-06-18T05:14:45+5:30

रिपब्लिकन पार्टीच्या उमेदवाराला भाजपा-शिवसेनेची मते मिळाली नाहीत, अशी उघड नाराजी रिपाइंच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत आज व्यक्त करतानाच विधानसभा निवडणुकीत पक्षला किमान २५ जागा मिळाव्यात

Eight people have 25 seats | आठवलेंना हव्यात २५ जागा

आठवलेंना हव्यात २५ जागा

मुंबई : लोकसभा निवडणुकीत सातारा मतदारसंघात रिपब्लिकन पार्टीच्या उमेदवाराला भाजपा-शिवसेनेची मते मिळाली नाहीत, अशी उघड नाराजी रिपाइंच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत आज व्यक्त करतानाच विधानसभा निवडणुकीत पक्षला किमान २५ जागा मिळाव्यात, असा ठराव पक्षाच्या बैठकीत करण्यात आला.
विधानसभा निवडणुकीत आता तरी रिपाइंच्या उमेदवारांना युतीची मते मिळतील, याची काळजी त्यांच्या नेत्यांनी घ्यावी, तसेच रिपाइं उमेदवारांविरुद्ध युतीचे बंडखोर लढणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी, असा ठराव करण्यात आला. याबाबतची माहिती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.रामदास आठवले यांनी पत्रकारांना दिली.
प्रदेशाध्यक्ष भूपेश थूलकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. रिपाइंला विधानसभेच्या किमान २५ जागा मिळाव्यात, महायुतीची राज्यात सत्ता आल्यास १५ टक्के मंत्रिपदे आणि महामंडळांची १५ टक्के पदे मिळावीत, असा ठरावदेखील करण्यात आला. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Eight people have 25 seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.