शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

संसदेचे महत्त्व कमी करण्याचे प्रयत्न, संजय राऊत यांची खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 00:53 IST

लोकशाहीत संसदेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मात्र सध्या संसदेचे महत्त्व कमी करण्याचे, संसद चालूच नये असे प्रयत्न केले जात आहेत.

मुंबई : लोकशाहीत संसदेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मात्र सध्या संसदेचे महत्त्व कमी करण्याचे, संसद चालूच नये असे प्रयत्न केले जात आहेत. सीएएवर संसदेत नऊ तास चर्चा सुरू असताना पंतप्रधान मात्र नऊ मिनिटेही उपस्थित राहत नाहीत. काँग्रेसने नेहमी संसदेला महत्त्व दिले. सध्या केवळ विधेयके मंजूर करण्यासाठी संसदेचा वापर केला जात आहे, अशी खंत शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली.मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे आयोजित पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. या वेळी राऊत यांच्या हस्ते मनश्री पाठक, सदानंद खोपकर, गुणाजी काजिर्डेकर, जयू भाटकर, संजीवनी खेर, वैभव परब व तेजस वाघमारे यांना पुरस्काराने गौरवण्यात आले. संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, आमदार सुनील प्रभू, प्रकाश सुर्वे, माजी आमदार सुनील शिंदे, पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.राऊत म्हणाले, राज्यात परिवर्तन करण्याची क्षमता बाळासाहेब ठाकरे यांच्यात होती व शरद पवार यांच्यामध्ये आहे. राज्यात परिवर्तन व्हावे असा ठाम निर्णय पवारांनी घेतला होता. पवार राष्ट्रपती, पंतप्रधान व्हावेत अशी आमची सदिच्छा आहे. ते पंतप्रधान, राष्ट्रपती होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पवार राष्ट्रपती झाल्यास मराठी माणसाला आनंद वाटेल. पवारांचे राजकीय व सामाजिक कार्य फार मोठे आहे. नरेंद्र वाबळे व संजय परब यांनी राऊत यांची प्रकट मुलाखत घेतली. धनश्री प्रधान दामले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले.बाळासाहेब टीका करणाऱ्यांना बोलावून त्यांच्याशी संवाद साधायचे. बाळासाहेबांची शिवसेना उद्धव ठाकरे यांनी पुढे नेली. त्यांच्यामध्ये चांगले प्रशासकीय गुण आहेत. त्यांच्यात व माझ्यात वाद करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. मात्र आमची दोघांची चांगली मैत्री आहे, असे राऊत म्हणाले. सरकारविरोधात उभे राहणे हा देशद्र्रोह नाही. मात्र सध्या तसे चित्र निर्माण केले जात आहे. सध्या अप्रत्यक्ष आणीबाणीसारखी परिस्थिती आहे. त्याविरोधात आवाज उठवण्याचे काम केले. दिल्लीची दहशत झुगारून लावण्याचा प्रयत्न महाराष्ट्राने केला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.राजकारणात काम करताना केंद्रात मंत्री होणे सहज शक्य होते. मात्र सामनाचा राजीनामा द्यावा लागला असता त्यामुळे मंत्रिपद स्वीकारले नाही, मंत्री झाल्यास सामनाशी, पत्रकारितेशी संपर्क सुटेल अशी भीती होती, असे राऊत म्हणाले.>हिंदुत्वावर कायमशिवसेनेने हिंदुत्व सोडले हा अपप्रचार केला जात आहे. सावरकर हे महान आहेत. त्यांचा अपमान सहन केला जाणार नाही. सावरकरांना भाजपने सत्तेवर आल्यावर पहिला भारतरत्न पुरस्कार देण्याची गरज होती. मात्र त्यांनी साडेपाच वर्षांत पुरस्कार दिला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच अयोद्धेला जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली. सरकार धर्माच्या आधारावर नव्हेतर, किमान समान कार्यक्रमावर चालते. हे सरकार पाच वर्षे चालेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. धर्मावर पोट भरत नाही. सरकार संविधानानुसार चालेल, असेही राऊत यांनी सांगितले.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊत