शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंचे नेत्यांना आदेश; जिल्हाप्रमुखांपासून सगळ्यांना पोहचला संदेश
2
अमित शाह आणि एकनाथ शिंदेंमध्ये ५० मिनिटे बैठक; रवींद्र चव्हाणांबाबत तक्रारीचा सूर, काय घडलं?
3
कणकवलीत नाट्यमय घडामोडी, कट्टर विरोधक एकत्र, निलेश राणेंचा थेट ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
4
पाकिस्तानच्या शेअर बाजारात पैशांचा पाऊस, भारत राहिला मागे; एक्सपर्ट म्हणाले, "पुढच्या १० वर्षांत..."
5
अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती आता कशी आहे? 'ही मॅन' यांच्याबाबत मोठी अपडेट समोर
6
"एका मिनिटात खटला संपला, ठाकरेंच्या वकिलांनी कोर्टात महत्त्वाचे मुद्दे मांडलेच नाही"; पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा
7
२१ नोव्हेंबर, मार्गशीर्ष मास; देवदिवाळी, नागदिवाळी, महालक्ष्मी व्रत, दत्त जयंती व्रत वैकल्याचा महिना
8
Palmistry: तळहातावर ‘या’ रेषा करतात अचानक श्रीमंत, शनिचे वरदान; भरपूर पैसा, राजयोगाचे जीवन!
9
देव दिवाळी २०२५: ९ राशींना शुभ-लाभ, मनासारखे यश; ठरलेली कामे होतील, पैसा मिळेल, पण मोह टाळा!
10
रशियाचं भारतप्रेम वाढलं! कच्चं तेल-गॅसनंतर आता दिली 'ही' मोठी ऑफर; अमेरिकेला लागणार झटका?
11
Mumbai Weather: मुंबईत हुडहुडी! १२ वर्षांत पहिल्यांदाच 'इतक्या' नीचांकी ताममानाची नोंद
12
Ashish Shelar:... तर मुंबईत अजित पवार गटाशी युती करणार नाही, आशिष शेलार यांचा इशारा!
13
"त्या माणसाच्या अवयवांचा माज ठेचायला हवा...", मालेगावात चिमुकलीवर अत्याचार करून हत्या, मराठी अभिनेत्री संतापली
14
नेपाळमध्ये पुन्हा भडकलं Gen Z आंदोलन, युवक रस्त्यावर उतरले; कर्फ्यू लागू, एअरपोर्ट सेवा बंद
15
Mumbai: जोडीदाराकडून आत्महत्येची वारंवार धमकी ही क्रूरताच: मुंबई उच्च न्यायालय
16
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात; Nifty २६,१०० च्या जवळ, मेटल-ऑटो शेअर्समध्ये खरेदी
17
SBI मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४१,८२६ चं फिक्स व्याज; परताव्याची गॅरंटी
18
लाल किल्ल्यापासून काश्मीरपर्यंत घुसून मारू; हल्ल्यात पाकिस्तान सहभागी असल्याची PoKची कबुली
19
आजचे राशीभविष्य - २० नोव्हेंबर २०२५, 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आज लाभदायी दिवस, शेअर-सट्टा ह्यात धनलाभ होईल
20
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
Daily Top 2Weekly Top 5

संसदेचे महत्त्व कमी करण्याचे प्रयत्न, संजय राऊत यांची खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 00:53 IST

लोकशाहीत संसदेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मात्र सध्या संसदेचे महत्त्व कमी करण्याचे, संसद चालूच नये असे प्रयत्न केले जात आहेत.

मुंबई : लोकशाहीत संसदेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मात्र सध्या संसदेचे महत्त्व कमी करण्याचे, संसद चालूच नये असे प्रयत्न केले जात आहेत. सीएएवर संसदेत नऊ तास चर्चा सुरू असताना पंतप्रधान मात्र नऊ मिनिटेही उपस्थित राहत नाहीत. काँग्रेसने नेहमी संसदेला महत्त्व दिले. सध्या केवळ विधेयके मंजूर करण्यासाठी संसदेचा वापर केला जात आहे, अशी खंत शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली.मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे आयोजित पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. या वेळी राऊत यांच्या हस्ते मनश्री पाठक, सदानंद खोपकर, गुणाजी काजिर्डेकर, जयू भाटकर, संजीवनी खेर, वैभव परब व तेजस वाघमारे यांना पुरस्काराने गौरवण्यात आले. संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, आमदार सुनील प्रभू, प्रकाश सुर्वे, माजी आमदार सुनील शिंदे, पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.राऊत म्हणाले, राज्यात परिवर्तन करण्याची क्षमता बाळासाहेब ठाकरे यांच्यात होती व शरद पवार यांच्यामध्ये आहे. राज्यात परिवर्तन व्हावे असा ठाम निर्णय पवारांनी घेतला होता. पवार राष्ट्रपती, पंतप्रधान व्हावेत अशी आमची सदिच्छा आहे. ते पंतप्रधान, राष्ट्रपती होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पवार राष्ट्रपती झाल्यास मराठी माणसाला आनंद वाटेल. पवारांचे राजकीय व सामाजिक कार्य फार मोठे आहे. नरेंद्र वाबळे व संजय परब यांनी राऊत यांची प्रकट मुलाखत घेतली. धनश्री प्रधान दामले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले.बाळासाहेब टीका करणाऱ्यांना बोलावून त्यांच्याशी संवाद साधायचे. बाळासाहेबांची शिवसेना उद्धव ठाकरे यांनी पुढे नेली. त्यांच्यामध्ये चांगले प्रशासकीय गुण आहेत. त्यांच्यात व माझ्यात वाद करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. मात्र आमची दोघांची चांगली मैत्री आहे, असे राऊत म्हणाले. सरकारविरोधात उभे राहणे हा देशद्र्रोह नाही. मात्र सध्या तसे चित्र निर्माण केले जात आहे. सध्या अप्रत्यक्ष आणीबाणीसारखी परिस्थिती आहे. त्याविरोधात आवाज उठवण्याचे काम केले. दिल्लीची दहशत झुगारून लावण्याचा प्रयत्न महाराष्ट्राने केला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.राजकारणात काम करताना केंद्रात मंत्री होणे सहज शक्य होते. मात्र सामनाचा राजीनामा द्यावा लागला असता त्यामुळे मंत्रिपद स्वीकारले नाही, मंत्री झाल्यास सामनाशी, पत्रकारितेशी संपर्क सुटेल अशी भीती होती, असे राऊत म्हणाले.>हिंदुत्वावर कायमशिवसेनेने हिंदुत्व सोडले हा अपप्रचार केला जात आहे. सावरकर हे महान आहेत. त्यांचा अपमान सहन केला जाणार नाही. सावरकरांना भाजपने सत्तेवर आल्यावर पहिला भारतरत्न पुरस्कार देण्याची गरज होती. मात्र त्यांनी साडेपाच वर्षांत पुरस्कार दिला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच अयोद्धेला जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली. सरकार धर्माच्या आधारावर नव्हेतर, किमान समान कार्यक्रमावर चालते. हे सरकार पाच वर्षे चालेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. धर्मावर पोट भरत नाही. सरकार संविधानानुसार चालेल, असेही राऊत यांनी सांगितले.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊत