शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

शिक्षण व्यवस्था बंधनमुक्त हवी : अरुण जेटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 02:38 IST

भारतात गेल्या २५ वर्षांत झालेल्या आर्थिक व सामाजिक सुधारणांमुळे अर्थव्यवस्था झपाट्याने प्रगती करते आहे. आज अर्थव्यवस्थेच्या वाढीचा विकास दर साडेसात टक्क्यांवर आहे. हा दर दहा-बारा टक्क्यांवर न्यायचा असेल तर शिक्षण आणि न्याय व्यवस्था बंधनमुक्त करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी रविवारी केले.

पुणे : भारतात गेल्या २५ वर्षांत झालेल्या आर्थिक व सामाजिक सुधारणांमुळे अर्थव्यवस्था झपाट्याने प्रगती करते आहे. आज अर्थव्यवस्थेच्या वाढीचा विकास दर साडेसात टक्क्यांवर आहे. हा दर दहा-बारा टक्क्यांवर न्यायचा असेल तर शिक्षण आणि न्याय व्यवस्था बंधनमुक्त करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी रविवारी केले.सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या १४ व्या पदवीप्रदान सोहळ्याला जेटली प्रमुख अथिती म्हणून उपस्थित होते.या वेळी ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज, बोस्टन विद्यापीठातील प्रा. फिलिप अल्टबॅक यांना विद्यापीठाकडून डी.लिट पदवी प्रदान करण्यात आली.कुलपती शां. ब. मुजूमदार, उपकुलपती विद्या येरवडेकर,कुलगुरू रजनी गुप्ते, कुलसचिव एम. एस. शेजूल उपस्थित होते. या वेळी विविध विद्याशाखांमधील ३५०० विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आल्या.जेटली म्हणाले, आपले बलस्थान असलेल्या लोकसंख्येला चांगले शिक्षण दिल्यास जागतिक अर्थव्यवस्थांना भारत कुशल मनुष्यबळ पुरवू शकेल. त्यासाठी शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र सुधारणेची आवश्यकता आहे.शिक्षणाला बंधनमुक्त केल्याशिवाय देशातील मनुष्यबळ विकासाच्या प्रचंड क्षमता आपण वापरू शकणार नाही. शिक्षणाकडे जास्तीत जास्त लक्ष दिले गेलेपाहिजे. सध्या स्पर्धात्मक युग असल्याने गुणवत्तेला महत्त्व आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षणात प्रावीण्य मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत.आज देशालाच नव्हे तर जगाला उत्कृष्ट मनुष्यबळाची गरजआहे. त्यामुळे पदवी घेऊन बाहेर पडणाºया तरुणांना आपल्या देशातच नव्हे, तर जगभरात संधी उपलब्ध आहेत.गेल्या ५० वर्षांत परिस्थिती झपाट्याने बदलली आहे आणि त्यापेक्षा अधिक वेगाने ती पुढील ५ वर्षांत बदलणार आहे. या बदलाचे नेतृत्व करण्यासाठी तरुणांनी पुढे यायला हवे, असे आवाहन अरुण जेटली यांनी केले.अभिमत शब्द शिक्षणाच्या प्रगतीला मारक-सर्वोच्च न्यायालयाने खासगी विद्यापीठांना त्यांच्या नावामध्ये अभिमत शब्द वापरणे बंधनकारक केले आहे. याचा संदर्भ देऊन डॉ. मुजूमदार म्हणाले, जगभर कुठेही विद्यापीठांसाठी अभिमत नाव वापरले जात नाही. त्यामुळे जगभरातील पालकांना अभिमत शब्दाचा अर्थ कळणार नाही. खासगी विद्यापीठांना अभिमत संबोधणे हे शिक्षणाच्या प्रगतीला आणि आंतरराष्टÑीयकरणाला मारक ठरेल.

टॅग्स :Arun Jaitleyअरूण जेटलीPuneपुणे