शहरं
Join us  
Trending Stories
1
'इंडिया आघाडी' तुटणार? बिहारमधील पराभवानंतर, काँग्रेसवर एकट्याने निवडणूक लढण्याचा वाढला दबाव
2
'माझ्या प्रियकराला भैय्या म्हणायचीस, आता बाबू बोलतेस'; दोन तरुणींचा रस्त्यातच राडा, केस ओढून मारहाण; व्हिडीओ व्हायरल
3
कुठे तोडफोड, कुठे राडा; उमेदवारीवरून राज्यभरात दिसला 'हायव्होल्टेज ड्रामा'! इच्छुकांचे नेत्यांपुढे रडगाणे...
4
पाकिस्तानात मोठी खळबळ! लष्कर मुख्यालयात लष्करप्रमुखांच्या मुलीचा निकाह; फोटो का आले नाहीत समोर?
5
नवीन वर्ष २०२६ मध्ये PM Kisan योजनेचा २२ वा हप्ता कधी जारी होईल? कोणाला मिळणार नाहीत पैसे, जाणून घ्या
6
२००३ मध्ये भारताच्या हातातला वर्ल्डकप हिसकावणारा फलंदाज कोमामध्ये; ऑस्ट्रेलियाचा स्फोटक दिग्गज मृत्यूशी देतोय झुंज
7
भारत-पाक संघर्षात चीनची उडी! "आम्हीच केली मध्यस्थी"; ट्रम्प यांच्यानंतर आता 'ड्रॅगन'चा नवा दावा
8
टार्गेट पूर्ण...! केंद्र सरकारने 'या' इलेक्ट्रिक वाहनांवरील सबसिडी बंद केली; टू-व्हीलर, कारही रांगेत...
9
Union Bank of India मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२२,२३९ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा कॅलक्युलेशन
10
६ राशींचे धनलाभाने २०२६ नववर्ष सुरू, यश-प्रगती; समृद्धी-भरभराट, तुमच्या राशीवर कसा प्रभाव?
11
निवडणुकीला समोरे जाण्यापूर्वी योगी आदित्यनाथ अखेरचा डाव टाकणार; संक्रांतीनंतर अनेक मंत्र्यांना डच्चू देणार, मंत्रिमंडळाचा विस्तार करणार...
12
गुड न्यूज! रेल्वे तिकिटावर ३ टक्के सवलत; प्रवाशांना आर्थिक दिलासा
13
भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था; जपानला टाकले मागे; केंद्र सरकारची अधिकृत घोषणा
14
सैन्य भरतीची तयारी करत होता, पण प्रेमाच्या जाळ्यात अडकला; प्रेयसीच्या एका फोन कॉलने घात केला!
15
नाराज निष्ठावंतांचा उद्रेक, थेट नेत्यांनाच शिव्यांची लाखोली! वर्षानुवर्षे पक्षनिष्ठा जपणारे, सतरंज्या उचलणारे भाजप कार्यकर्ते भडकले
16
नातेवाईकच उदंड झाले कार्यकर्ते वाऱ्यावर उडाले, ३० नेत्यांसह ११६ नातेवाईक निवडणूक रिंगणात
17
आजचे राशीभविष्य ३१ डिसेंबर २०२५ : सरत्या वर्षाचा शेवट कोणासाठी गोड होणार? कसा असेल आजचा दिवस...
18
तिसरं महायुद्ध अन् मोठी आपत्ती...! 2026 साठी बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
19
सावधान! मोबाईलमध्ये 'हे' गाणे आढळल्यास थेट तुरुंगवास; चीनने लादले कडक निर्बंध
20
KDMC: मतदानाआधीच भाजपच्या रेखा चौधरी विजयी? कल्याण- डोंबिवली महापालिकेत नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण व्यवस्था बंधनमुक्त हवी : अरुण जेटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 02:38 IST

भारतात गेल्या २५ वर्षांत झालेल्या आर्थिक व सामाजिक सुधारणांमुळे अर्थव्यवस्था झपाट्याने प्रगती करते आहे. आज अर्थव्यवस्थेच्या वाढीचा विकास दर साडेसात टक्क्यांवर आहे. हा दर दहा-बारा टक्क्यांवर न्यायचा असेल तर शिक्षण आणि न्याय व्यवस्था बंधनमुक्त करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी रविवारी केले.

पुणे : भारतात गेल्या २५ वर्षांत झालेल्या आर्थिक व सामाजिक सुधारणांमुळे अर्थव्यवस्था झपाट्याने प्रगती करते आहे. आज अर्थव्यवस्थेच्या वाढीचा विकास दर साडेसात टक्क्यांवर आहे. हा दर दहा-बारा टक्क्यांवर न्यायचा असेल तर शिक्षण आणि न्याय व्यवस्था बंधनमुक्त करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी रविवारी केले.सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या १४ व्या पदवीप्रदान सोहळ्याला जेटली प्रमुख अथिती म्हणून उपस्थित होते.या वेळी ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज, बोस्टन विद्यापीठातील प्रा. फिलिप अल्टबॅक यांना विद्यापीठाकडून डी.लिट पदवी प्रदान करण्यात आली.कुलपती शां. ब. मुजूमदार, उपकुलपती विद्या येरवडेकर,कुलगुरू रजनी गुप्ते, कुलसचिव एम. एस. शेजूल उपस्थित होते. या वेळी विविध विद्याशाखांमधील ३५०० विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आल्या.जेटली म्हणाले, आपले बलस्थान असलेल्या लोकसंख्येला चांगले शिक्षण दिल्यास जागतिक अर्थव्यवस्थांना भारत कुशल मनुष्यबळ पुरवू शकेल. त्यासाठी शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र सुधारणेची आवश्यकता आहे.शिक्षणाला बंधनमुक्त केल्याशिवाय देशातील मनुष्यबळ विकासाच्या प्रचंड क्षमता आपण वापरू शकणार नाही. शिक्षणाकडे जास्तीत जास्त लक्ष दिले गेलेपाहिजे. सध्या स्पर्धात्मक युग असल्याने गुणवत्तेला महत्त्व आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षणात प्रावीण्य मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत.आज देशालाच नव्हे तर जगाला उत्कृष्ट मनुष्यबळाची गरजआहे. त्यामुळे पदवी घेऊन बाहेर पडणाºया तरुणांना आपल्या देशातच नव्हे, तर जगभरात संधी उपलब्ध आहेत.गेल्या ५० वर्षांत परिस्थिती झपाट्याने बदलली आहे आणि त्यापेक्षा अधिक वेगाने ती पुढील ५ वर्षांत बदलणार आहे. या बदलाचे नेतृत्व करण्यासाठी तरुणांनी पुढे यायला हवे, असे आवाहन अरुण जेटली यांनी केले.अभिमत शब्द शिक्षणाच्या प्रगतीला मारक-सर्वोच्च न्यायालयाने खासगी विद्यापीठांना त्यांच्या नावामध्ये अभिमत शब्द वापरणे बंधनकारक केले आहे. याचा संदर्भ देऊन डॉ. मुजूमदार म्हणाले, जगभर कुठेही विद्यापीठांसाठी अभिमत नाव वापरले जात नाही. त्यामुळे जगभरातील पालकांना अभिमत शब्दाचा अर्थ कळणार नाही. खासगी विद्यापीठांना अभिमत संबोधणे हे शिक्षणाच्या प्रगतीला आणि आंतरराष्टÑीयकरणाला मारक ठरेल.

टॅग्स :Arun Jaitleyअरूण जेटलीPuneपुणे