शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

बीट शेतीत लावले शिक्षणाचे कसब..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 11:39 IST

यशकथा : बीट असो, कारले असो वा अन्य पालेभाज्यांची शेती ही शेतकऱ्यांसाठी वरदान आहे. यासाठी शेतकऱ्यांनी पुढे येऊन यातून उत्पन्न मिळवावे, असा सल्ला नीलेश बांगर यांनी दिला आहे.

- विशाल शिर्के (पुणे)

कृषी अभ्यासक्रमाची पदवी घेतल्यानंतर नोकरीत न रमता शेतीलाच करिअर निवडून त्यात आपल्या शिक्षणाचे पूर्ण कसब लावणाऱ्या मंचर येथील उच्च शिक्षित युवा शेतकऱ्याने बीट शेतीचा नवा मार्ग निवडून दोन हंगामात तब्बल १४ लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. त्यांचा हा प्रयोग पारंपरिक शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक ठरत आहे.

मंचरजवळ असलेल्या चांडोली या गावातील उच्च शिक्षित शेतकरी नीलेश बांगर यांनी ही किमया केली आहे. बी.एस्सी. नंतर नोकरी न करता घरची शेतीच करायची, असा निश्चय सुरुवातीपासूनच केला असल्याचे बांगर यांनी सांगितले. तिन्ही ऋतूत बीट पीक घेता येते. मात्र, मंचर परिसरात पाऊस अधिक असल्याने पावसाळ्यात हे पीक घेता येत नाही. बीट पिकाला कमी पाऊस असला तरीही चालतो. जास्त पावसाळ्यात बीट लाल पडते.

हिवाळ्यात बियाणे कमी लागत असल्याने खर्च कमी येतो. उन्हाळ्यात बियाणेदेखील जास्त लागते आणि कीटकनाशकाच्या फवारण्यादेखील जास्त कराव्या लागतात. पावसाळ्यात बीटला प्रतिकिलो २० ते ३० रुपये दर मिळतो. मात्र उत्पादन सरासरीच्या २५ टक्केच येते. उन्हाळ्यात तुलनेने चांगला भाव मिळतो.

हिवाळ्यात (नोव्हेंबर ते जानेवारी) उत्पादन चांगले येते. तसेच उत्पादन खर्चही कमी येतो. उत्पादन जास्त असल्याने भावही किलोला २ ते ४ रुपये अधिक मिळतो, त्यामुळे बीट शीतगृहात साठवून ठेवले. त्यानंतर बाजारातील स्थिती पाहून विक्रीसाठी आणले. हिवाळ्यात नऊ एकरातून १७८ टन उत्पादन घेऊन ९ लाख रुपये मिळाले. खर्च वजा जाता ४ लाख रुपयांचा फायदा झाला. उन्हाळ्यात ४ एकरातून ४० ते ४२ टन उत्पादन मिळाले.

सरासरी १२ रुपये किलोप्रमाणे दर मिळाला. त्यातून ५ लाख रुपये मिळाले. खर्च वजा जाता अडीच लाख रुपयांचा फायदा झाला. बाजारातील स्थिती, उत्पन्नानुसार केलेला पुरवठा असे व्यवस्थापन केल्याने बीट पिकातून चांगले उत्पादन आणि भाव मिळाल्याचे बांगर यांनी सांगितले.   शेतकऱ्यांनी पारंपरिक पीक न घेता, वेगळे काही करता येईल का? याचे नियोजन करणे आवश्यक आहे. केवळ हवामान, नापिकी याला शेतकऱ्यांनी दोष न देता शेतीचे व्यवस्थित नियोजन केल्यास शेती फायद्याचीच आहे.

बीट असो, कारले असो वा अन्य पालेभाज्यांची शेती ही शेतकऱ्यांसाठी वरदान आहे. यासाठी शेतकऱ्यांनी पुढे येऊन यातून उत्पन्न मिळवावे, असा सल्ला नीलेश बांगर यांनी दिला आहे. यासाठी त्यांनी स्वत:चे उदाहरण दिले. ते म्हणतात, माझे शिक्षण बी.एस्सी.पर्यंत झाले होते. नोकरीच्या मागे न लागता मी शेती करण्याचा निर्णय घेऊन बीट शेतीचा पर्याय निवडला. यातून मला अपेक्षित किंबहुना त्यापेक्षा अधिक फायदा बीट शेतीमधून झाला, असे बांगर यांनी आवर्जून सांगितले.   

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी