इचमपल्लीसाठी राज्यपालांवर दबाव !
By Admin | Updated: November 12, 2014 01:33 IST2014-11-12T01:33:43+5:302014-11-12T01:33:43+5:30
महाराष्ट्राचे राज्यपाल चेन्नमेनेनी विद्यासागर राव यांच्या सत्कार कार्यक्रमात त्यांना इचमपल्ली धरणाच्या कामासाठी महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून सहकार्य करा, असे जाहीर आवाहनच करण्यात आले.

इचमपल्लीसाठी राज्यपालांवर दबाव !
अभिनय खोपडे -गडचिरोली
तेलंगण सरकारने इचमपल्ली धरणाच्या निर्मितीसाठी आक्रमक पाऊल उचलले असून, रविवारी हैदराबाद येथे आयोजित महाराष्ट्राचे राज्यपाल चेन्नमेनेनी विद्यासागर राव यांच्या सत्कार कार्यक्रमात त्यांना इचमपल्ली धरणाच्या कामासाठी महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून सहकार्य करा, असे जाहीर आवाहनच करण्यात आले. तसेच महाराष्ट्राच्या राज्यपालांवर तेलंगण सरकारने या कामासाठी मोठा दबाव वाढविला असल्याची विश्वसनीय माहिती आहे.
महाराष्ट्र-तेलंगण सीमेलगत 198क् च्या दशकात इचमपल्ली धरणाचे काम करण्याचा प्रय} करण्यात आला. मात्र, त्या वेळी ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी या प्रकल्पाला विरोध केला होता़ या धरणात सिरोंचा तालुक्यातील दीडशे गावे बुडीत क्षेत्रत जाणार आहेत. तत्कालीन वनमंत्री छेदीलाल गुप्ता यांनी सदर धरण झाल्यास आपण पहिले आंदोलन करू, असाही इशारा आंध्र प्रदेश सरकारला दिला होता.
महाराष्ट्राचा हा विरोध लक्षात घेऊन या धरणाचे काम 3क् वर्षापासून प्रलंबित आहे. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी हस्तक्षेप करून हे काम थांबविले होते. इचमपल्ली धरणामुळे तेलंगणच्या 1क् जिल्ह्यांतील जवळपास दीड लाख एकर जमीन ओलिताखाली येणार आहे. तसेच छत्तीसगडमध्ये वीजनिर्मिती प्रकल्पालाही पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे तेलंगण या धरणाचे काम मार्गी लावण्यासाठी प्रय} करताना दिसत आहे. तेलंगण सरकारतर्फे हैदराबाद येथे महाराष्ट्राचे राज्यपाल चेन्नमेनेनी विद्यासागर राव यांचा 9 नोव्हेंबर रोजी जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. या वेळी तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी राव यांना इचमपल्ली धरणाचा प्रस्ताव मार्गी लावण्यासाठी सहकार्य करण्याचे जाहीर आवाहन केले.
राज्यपाल राव हे तेलंगणच्या करीमनगर भागातील रहिवासी आहेत. ते भाजपाचे माजी खासदारही होते. ते इचमपल्ली धरणाचे समर्थक असल्याचे मानले जाते. त्यामुळे त्यांनी सत्कारादरम्यान धरणाच्या कामासाठी सर्व सहकार्य केले जाईल, असे आश्वासन दिल्याची विश्वसनीय माहिती आहे. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात रविवारी बंडारू दत्तात्रेय यांचीही वर्णी लागली आहे. तेही या इचमपल्ली धरणाचे कट्टर समर्थक आहेत. याशिवाय तेलंगण भाजपाचे प्रदेशाध्यक्ष क्रिष्णा रेड्डी यांनी 2क्क्3-क्4 मध्ये सदर धरणाचे काम मार्गी लागावे म्हणून आंदोलन केले होते. त्या वेळी ते भाजपा युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते.
तेलंगणमधील भाजपाची भूमिका ही इचमपल्ली धरणाच्या समर्थनाची आहे. त्यामुळे दबाव वाढविण्याचा प्रयत्न केला जात आह़े दुसरीकडे महाराष्ट्र सरकारने सद्य:स्थितीत सुरू असलेल्या चव्हेला धरणाच्या कामालाही विरोध केलेला नाही. आता पुन्हा एका धरणाचे नवे संकट महाराष्ट्रावर येऊ घातले आहे.
च्198क् मध्ये मी आमदार होतो. त्या वेळी या धरणाचा प्रश्न निर्माण झाला होता. या धरणामुळे सिरोंचा तालुक्याला मोठा फटका बसणार आहे. जवळपास दीडशे गावे बुडीत क्षेत्रत जातील. वनजमीनही बुडणार आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल तेलंगण भागातील असले तरी राज्याचे हित लक्षात घेऊनच ते याबाबत भूमिका घेतील, असा आम्हाला विश्वास आहे. गडचिरोली या मागास जिल्ह्यावर कोणताही अन्याय होता कामा नये, अशी आमची कायम भूमिका आहे, असे चंद्रपूर-गडचिरोली क्षेत्रचे माजी खासदार नरेश पुगलिया यांनी सांगितले.