शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

'रजनीगंधा, गुटखा, पानसुपारी खा पण डोकं शांत ठेवा'; जितेंद्र आव्हाडांचा 'वादग्रस्त' सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2021 10:51 IST

राज्यात गुटख्यावर बंदी असताना थेट मंत्र्यांनीच गुटखा खाण्याचा सल्ला दिल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मुंबई: अनेकदा आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असलेले राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड पुन्हा एकदा एका वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. शिवाय त्यांच्या या वक्तव्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. राज्यात गुटख्यावर बंदी असताना डोकं शांत ठेवण्यासाठी गुटखा पानसुपारी खाण्याचा सल्ला आव्हाडांनी दिला आहे. 

भिवंडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन जितेंद्र आव्डाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी डोके शांत ठेवायचे असेल तर रजनीगंधा पानसुपारी खा, असा अजब सल्ला दिला. आव्हाडांच्या वक्तव्यानंतर कार्यक्रमात सर्वांना हसू आवरले नाही. हे वक्तव्य करुन आव्हाडांनी विरोधकांना टीका करण्यासाठी ऐती संधी दिली, त्यामुळे आता त्यांच्यावर विरोधकांकडून टीकेची झोड उठण्याची शक्यता आहे.

जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले ?शुक्रवारी भिवंडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना आव्हाड म्हणाले की, मी मुस्लीम बांधवांना विनंती करतो की, त्यांनी शांत राहावं, डोकं गरम करून घेऊ नये. विरोधक राजकीय स्वार्थासाठी तुमची डोकी भडकवत आहेत. पण तुम्ही शांत रहा, डोकं थंड ठेवण्यासाठी मांस कमी खा आणि तोंडात रजनीगंधा, गुटखा ठेवा, मात्र शांत रहा, असे वादग्रस्त वक्तव्य आव्हाडांनी केले आहे. 

दरवाढीवरुन भाजपावर टीकायावेळी आव्हाडांनी देशातील महागाई आणि पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरवाढीवरुन भाजपावर निशाणा साधला. देशात महागाई उच्चस्थरावर आहे, पेट्रोल डिझेलचे दर वाढले आहेत. भाजपाची सत्ता आल्यास देशातील प्रत्येक नागरिकाच्या खात्यात 15 लाख जमा होतील, अशी घोषणा मोदींनी केली होती. मग आता त्या घोषणेचे काय झाले, असा सवाल उपस्थित करत त्यांनी भाजपावर निशाणा साधला.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडNCPराष्ट्रवादी काँग्रेसState Governmentराज्य सरकार