शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

पूर्व विदर्भात पूरच पूर, निम्म्या राज्यात पिके आतुर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 06:01 IST

रस्ते, घरे पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत, तीन जिल्ह्यांचा संपर्क तुटला, मराठवाड्यात पावसाची प्रतीक्षाच

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : तीन दिवसांपासून विदर्भात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असून, अतिवृष्टीमुळे रविवारी गडचिरोली, चंद्रपूर व गोंदियात पूरपरिस्थिती निर्माण झाली. अनेक पुलांवर पाणी साचल्याने महामार्ग बंद पडले. गावांचे संपर्क तुटल्याने जनजीवन विस्कळीत झाले. असे असले तरी निम्म्या विदर्भासह मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

तलाव फुटून ३०० घरांत पाणीचंद्रपूर : गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वैनगंगा, वर्धा, अंधारी, उमा व पिंपळनेरी नद्यांना पूर आला. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. चंद्रपूर तालुक्यातील चिचपल्ली येथील मामा तलावाची पाळ फुटल्याने ३०० घरांत पाणी शिरले जिल्हा प्रशासनाकडून मदतकार्य सुरू झाले आहे.

गडचिरोली नागपूर, चंद्रपूरशी संपर्क तुटला गडचिरोली : शनिवारी रात्री झालेल्या पावसामुळे गडचिरोलीचा नागपूर व चंद्रपूर जिल्ह्याशी संपर्क तुटला असून, चार राष्ट्रीय महामार्गांसह ३७ रस्त्यांची रहदारी सध्या बंद आहे. भामरागडला पुराचा सर्वाधिक फटका बसला. अनेक दुकाने आणि घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. निम्मे गडचिरोली शहरही पाण्याखाली गेले. पूर परिस्थितीमुळे २२ जुलैला जिल्ह्यातील सर्व शाळा- महाविद्यालयांना सुटी दिली आहे.

पंचगंगा नदीकाठच्या गावांची स्थलांतराची तयारी सुरू कोल्हापूर : जिल्ह्यात रविवारी सकाळपासून जोरदार पाऊस आला. परिणामी पंचगंगा नदी ३७ फुटांच्या वरून वाहू लागली. पाण्याच्या विसर्गामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, स्थलांतराची तयारी सुरू केली आहे, काही तालुक्यांत ढगफुटीसारखा पाऊस कोसळत आहे. जिल्ह्यातील ३३ मार्ग पुरामुळे बंद आले. • रत्नागिरी जिल्ह्यातील चिंचवली (ता. खेड) येथील रामचंद्र सखाराम पवार हे गुरुवारी नदीतून वाहून गेले होते. शनिवारी त्यांचा मृतदेह आढळून आला आहे.

अनेक जिल्ह्यांत अद्यापही पावसाची प्रतीक्षाचप्रादेशिक हवामान विभागाच्या पावसाच्या अहवालानुसार, अमरावती येथे १२ टक्के, तर गोंदिया जिल्ह्यात ११ टक्के पावसाची तूट आहे. पूर्व विदर्भात पावसाचा जोर असला तरी अकोला, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यात प्रतीक्षा कायम आहे.

बीड जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या निम्मा म्हणजेच ३३७.२ मिमी. पावसाची नोंद झाली आहे. १ जून ते २० जुलै या ५० दिवसांच्या कालावधीत ५९.६ टक्के पाऊस झाला असतानाही जिल्ह्यातील मोठी धरणे अद्याप तहानलेली आहेत. अहमदनगर जिल्ह्यातही पावसाने दडी मारल्यामुळे पिकांसाठी दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी सतर्क राहावे : मुख्यमंत्री शिंदेमुंबई : मुंबईसह कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. इतरही जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर एसडीआरएफ, जिल्हा प्रशासन, पोलिस, महापालिका, नगरपालिका तसेच विविध स्थानिक स्वराज्य संस्थांनी सतर्क राहावे आणि नागरिकांना सर्वतोपरी मदत करावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. हवामान खाते, आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून वेळोवेळी माहिती घ्यावी, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

कृष्णेची पातळी १८ फुटांवरकाही दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या पाणीपातळी वाढ झाली. रविवारी सांगलीतील पातळी १८ फुटांवर गेली होती.कोयना धरणात ५४ टीएमसीचोवीस तासांत कोयना धरणात साडेतीन टीएमसी पाणीसाठा वाढला. त्यामुळे सध्या ५४.४३ टीएमसी पाणीसाठा झाला.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर