शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

साद्राबाडीच्या ३५ किमी परिघापर्यंत भूकंपाचीच कंपने

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2018 21:13 IST

‘एनसीएन’ पथकप्रमुखांची माहिती : मध्य प्रदेशातील देडतलाईपर्यंत भूगर्भातील धक्यांची श्रृंखला

गजानन मोहोडअमरावती : भूगर्भातील हालचालीमुळे जाणवणारे धक्के व प्रचंड आवाज केवळ मेळघाटातील साद्राबाडीपर्यंत सीमित न राहता मध्यप्रदेशातील देडतलाईपर्यंत जाणवत आहे. ‘एनसीएस’चे पथकप्रमुख कुलवीरसिंग यांनी ही भूकंपाचीच कंपने असल्याचे स्पष्ट केले. साद्राबाडीपासून ३५ किमीच्या परिघात धक्के बसत असल्याने नवी दिल्ली येथील ‘नॅशनल सेंटर फॉर सिस्मोग्रॉफ’ची चमू २५ ऑगस्टपासून ठाण मांडून आहे. २१ ऑगस्टला दिल्ली केंद्रातील सिस्मोग्राफ यंत्रात २.५ रिश्टरस्केल  नोंद झाल्याचे त्यांनी सांगितले.धारणी तालुक्यातील साद्राबाडी, झिल्पी, खारी, गावलानडोह, सुसर्दा व राणीपिसा  या गावांमध्ये साधारणपणे दोन आठवड्यापासून भूगर्भात हालचाल होत आहे. जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने घेत साद्राबाडी व परिसरातील भूकंपसदृश घटनेचे नेमके कारण व शास्त्रीयदृष्ट्या तपासासाठी ‘जीएसआय’ (जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया) व  एनसीएस (नॅशनल सेंटर फॉर सिस्मोग्राफ) च्या पथकास पाचारण केले. राष्ट्रीय स्तरावरील दिल्ली येथील ‘एनसीएस’ या संस्थेच्या तज्ज्ञांचे पथक साद्राबाडीला २४ ऑगस्टपासून ठाण मांडून आहेत. या पथकाद्वारा तीन ठिकाणी ‘सिस्मोग्रॉफ’ यंत्र बसविण्यात आले व या यंत्राद्वारे नोंदी ठेवण्यात येत आहेत. यामध्ये साद्राबाडी येथील धक्के भूकंपाचेच असल्याचे स्पष्ट झाले. 

तिव्रता कमी होतेयसाद्राबार्डी व परिसरात २१ ऑगस्टला २.५ रिश्टरस्केलपर्यंत भूकंपाची नोंद झाली. त्यानंतर या धक्क्याची तीव्रता कमी होत आहे. चार दिवसांपूर्वी १.५ रिश्टरस्केल, तर बुधवारी सकाळी १.२ रिश्टरस्केलपर्यंत याची नोंद साद्राबाडी येथे बसविलेल्या सिस्मोग्रॉफ यंत्रावर नोंद झाली. या धक्क्यांची तीव्रता दिवसेंदिवस कमी होत असल्याने घाबरण्याचे कोणतेही कारण नसल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

वरिष्ठ शास्त्रज्ञांशी चर्चेनंतर अहवालसाद्राबाडीतील सिस्मोग्रॉफ यंत्राच्या नोंदीची माहिती ‘एनसीएस’चे विभागप्रमुखांना सादर करण्यात येईल. या नोंदीच्या आधारे वरिष्ठ शास्त्रज्ञांशी चर्चा होईल. यामधून निष्कर्ष येईल त्याचा अहवाल अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात येईल. याला किती अवधी लागेल हे नेमके आता सांगता येणार नसल्याचे बलवीरसिंह यांनी सांगितले.

 धोकादायक घरांना लाल मार्किंगसाद्राबार्डीत आता स्थिती पुर्ववत झालेली आहे. नागरिक दैनंदिन व्यवहार करू लागले आहेत. विद्यार्थी देखील शाळेत जात आहेत झिल्पी व गावलानडोह येथे प्रत्येकी एक वॉटरप्रुफ तंबू उभारण्यात आलेला आहे. धक्क्यांमुळे ज्या घरांना भेगा पडल्या व धोका आहे. अशा घरांचा सर्वे सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारा करण्यात आला. धोकादायक घरांना लाल मार्कींग करण्यात आले, त्या घरांमध्ये नागरिकांना रात्री राहण्यास मज्जाव केला जात असल्याचे तहसीलदार आदिनाथ गांजरे यांनी सांगितले.

टॅग्स :EarthquakeभूकंपVidarbhaविदर्भ