शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

साद्राबाडीच्या ३५ किमी परिघापर्यंत भूकंपाचीच कंपने

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2018 21:13 IST

‘एनसीएन’ पथकप्रमुखांची माहिती : मध्य प्रदेशातील देडतलाईपर्यंत भूगर्भातील धक्यांची श्रृंखला

गजानन मोहोडअमरावती : भूगर्भातील हालचालीमुळे जाणवणारे धक्के व प्रचंड आवाज केवळ मेळघाटातील साद्राबाडीपर्यंत सीमित न राहता मध्यप्रदेशातील देडतलाईपर्यंत जाणवत आहे. ‘एनसीएस’चे पथकप्रमुख कुलवीरसिंग यांनी ही भूकंपाचीच कंपने असल्याचे स्पष्ट केले. साद्राबाडीपासून ३५ किमीच्या परिघात धक्के बसत असल्याने नवी दिल्ली येथील ‘नॅशनल सेंटर फॉर सिस्मोग्रॉफ’ची चमू २५ ऑगस्टपासून ठाण मांडून आहे. २१ ऑगस्टला दिल्ली केंद्रातील सिस्मोग्राफ यंत्रात २.५ रिश्टरस्केल  नोंद झाल्याचे त्यांनी सांगितले.धारणी तालुक्यातील साद्राबाडी, झिल्पी, खारी, गावलानडोह, सुसर्दा व राणीपिसा  या गावांमध्ये साधारणपणे दोन आठवड्यापासून भूगर्भात हालचाल होत आहे. जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने घेत साद्राबाडी व परिसरातील भूकंपसदृश घटनेचे नेमके कारण व शास्त्रीयदृष्ट्या तपासासाठी ‘जीएसआय’ (जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया) व  एनसीएस (नॅशनल सेंटर फॉर सिस्मोग्राफ) च्या पथकास पाचारण केले. राष्ट्रीय स्तरावरील दिल्ली येथील ‘एनसीएस’ या संस्थेच्या तज्ज्ञांचे पथक साद्राबाडीला २४ ऑगस्टपासून ठाण मांडून आहेत. या पथकाद्वारा तीन ठिकाणी ‘सिस्मोग्रॉफ’ यंत्र बसविण्यात आले व या यंत्राद्वारे नोंदी ठेवण्यात येत आहेत. यामध्ये साद्राबाडी येथील धक्के भूकंपाचेच असल्याचे स्पष्ट झाले. 

तिव्रता कमी होतेयसाद्राबार्डी व परिसरात २१ ऑगस्टला २.५ रिश्टरस्केलपर्यंत भूकंपाची नोंद झाली. त्यानंतर या धक्क्याची तीव्रता कमी होत आहे. चार दिवसांपूर्वी १.५ रिश्टरस्केल, तर बुधवारी सकाळी १.२ रिश्टरस्केलपर्यंत याची नोंद साद्राबाडी येथे बसविलेल्या सिस्मोग्रॉफ यंत्रावर नोंद झाली. या धक्क्यांची तीव्रता दिवसेंदिवस कमी होत असल्याने घाबरण्याचे कोणतेही कारण नसल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

वरिष्ठ शास्त्रज्ञांशी चर्चेनंतर अहवालसाद्राबाडीतील सिस्मोग्रॉफ यंत्राच्या नोंदीची माहिती ‘एनसीएस’चे विभागप्रमुखांना सादर करण्यात येईल. या नोंदीच्या आधारे वरिष्ठ शास्त्रज्ञांशी चर्चा होईल. यामधून निष्कर्ष येईल त्याचा अहवाल अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात येईल. याला किती अवधी लागेल हे नेमके आता सांगता येणार नसल्याचे बलवीरसिंह यांनी सांगितले.

 धोकादायक घरांना लाल मार्किंगसाद्राबार्डीत आता स्थिती पुर्ववत झालेली आहे. नागरिक दैनंदिन व्यवहार करू लागले आहेत. विद्यार्थी देखील शाळेत जात आहेत झिल्पी व गावलानडोह येथे प्रत्येकी एक वॉटरप्रुफ तंबू उभारण्यात आलेला आहे. धक्क्यांमुळे ज्या घरांना भेगा पडल्या व धोका आहे. अशा घरांचा सर्वे सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारा करण्यात आला. धोकादायक घरांना लाल मार्कींग करण्यात आले, त्या घरांमध्ये नागरिकांना रात्री राहण्यास मज्जाव केला जात असल्याचे तहसीलदार आदिनाथ गांजरे यांनी सांगितले.

टॅग्स :EarthquakeभूकंपVidarbhaविदर्भ