दूरसंचार क्षेत्रात जिओमुळे भूकंप!
By Admin | Updated: September 2, 2016 01:25 IST2016-09-02T01:25:22+5:302016-09-02T01:25:22+5:30
रिलायन्स जिओने दूर संचार क्षेत्रात धमाकेदार एंट्री केल्यामुळे विद्यमान दूरसंचार कंपन्यांचे समभाग गडगडले. भारती एअरटेल, आयडिया या कंपन्यांना मोठा फटका बसला. त्यामुळे मुंबई शेअर

दूरसंचार क्षेत्रात जिओमुळे भूकंप!
मुंबई : रिलायन्स जिओने दूर संचार क्षेत्रात धमाकेदार एंट्री केल्यामुळे विद्यमान दूरसंचार कंपन्यांचे समभाग गडगडले. भारती एअरटेल, आयडिया या कंपन्यांना मोठा फटका बसला. त्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी यांच्यात घसरण झाली.
खरे म्हणजे सकाळी सेन्सेक्स तेजीसह उघडला होता. तथापि, रिलायन्स जिओची घोषणा होताच तो घसरला. सत्राच्या अखेरीस २८.६९ अंकांची घसरण नोंदवून सेन्सेक्स २८,४२३.४८ अंकांवर बंद झाला. ५0 कंपन्यांचा समावेश असलेला निफ्टी ११.५५ अंकांनी घसरून ८,७७४.६५ टक्क्यांनी घसरला.
रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी रिलायन्स जिओची घोषणा केल्यानंतर दूरसंचार क्षेत्रात भूकंपच झाला. सर्व विद्यमान दूरसंचार कंपन्यांचे समभाग आपटले. सेन्सेक्समध्ये समाविष्ट असलेल्या भारती एअरटेलचा समभाग ६.३७ टक्क्यांनी घसरून ३१0.७0 रुपयांवर आला. सेन्सेक्समधील ३0 कंपन्यांत एअरटेलची घसरण सर्वांत जास्त ठरली. आयडीया सेल्यूलरचा समभाग १0.४८ टक्क्यांनी घसरून ८३.७0 रुपयांवर आला. हा ५२ आठवड्यांचा नीचांक ठरला आहे.
सेन्सेक्समधील ३0 पैकी १३ कंपन्यांचे समभाग घसरले. १६ कंपन्यांचे समभाग वाढले. अदाणी पोर्ट्स, विप्रो, सन फार्मा, हीरो मोटोकॉर्प, एलअँडटी, एनटीपीसी आणि एशियन पेंट्स, अंबुजा सिमेंट, जयप्रकाश असोसिएट्स, यांचे समभाग घसरले. (प्रतिनिधी)
एअरटेल, आयडिया, रिलायन्सचे मूल्य घटले
समभाग घसरल्यामुळे भारती एअरटेल आणि आयडीयाला २३,९८३ कोटी रुपयांचा फटका बसला आहे. भारती एअरटेलचे बाजार मूल्य तब्बल १२ हजार कोटींनी घसरले आहे. आयडियाचे बाजारमूल्यही २,८00 कोटींनी खाली आले आहे. भारतातील चौथी मोठी कंपनी रिलायन्स कम्युनिकेशन्सचे बाजार मूल्य ५0.४0 कोटींनी घसरले आहे. विशेष म्हणजे रिलायन्स कम्युनिकेशन्स ही कंपनी मुकेश अंबानी यांचे बंधू अनिल अंबानी यांच्या मालकीची आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजचा समभागही २.७३ टक्क्यांनी घसरून १,0२९.१५ टक्क्यांवर आला. सेन्सेक्समधील दुसऱ्या क्रमांकाची घसरण रिलायन्सचीच.