शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
2
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
3
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
4
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
5
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
6
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
7
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
8
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
9
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
10
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
11
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
12
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
13
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
14
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
15
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
16
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
17
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
18
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
19
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
20
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!

१ डिसेंबरपासून देशभरात ई-टोल - नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2017 3:42 AM

देशभरातील ३७८ टोल प्लाझांवर येत्या १ डिसेंबरपासून ई-टोल वसुली सुरू करण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे पत्रपरिषदेत केली.

मुंबई : देशभरातील ३७८ टोल प्लाझांवर येत्या १ डिसेंबरपासून ई-टोल वसुली सुरू करण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे पत्रपरिषदेत केली. गडकरी म्हणाले की, एखादे वाहन टोल नाक्यावर आल्यानंतर त्यावर असलेले स्टिकर जे ई-पेमेंटशी जोडलेले असेल त्यावरून टोलची वसुली केली जाईल आणि वाहन न थांबता पुढे जाऊ शकेल. यापुढे नवीन वाहनांवर असे नवे स्टिकर लावूनच ती बाजारात येतील. साडेसात लाख वाहनांना आतापर्यंत अशी स्टिकर्स पुरविण्यात आली आहेत. त्यांच्या खरेदीदाराच्या बँक खात्याशी ई-टोल संलग्न असेल. १ डिसेंबरपासून टोल नाक्यांवर वाहनांच्या रांगा दिसणार नाहीत त्यामुळे वाहनधारकांना ताटकळावे लागणार नाही. जुन्या वाहनांसाठीदेखील ही सुविधा पुरविण्यात येणार आहे.मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाचे काम सहा महिन्यांत सुरूमनमाड-इंदूर या महत्त्वाकांक्षी रेल्वेमार्गाचे काम येत्या सहा महिन्यांत सुरू करण्यात येईल, असे गडकरी यांनी जाहीर केले. या रेल्वेमार्गाच्या उभारणीसाठी ६ हजार कोटी रुपये खर्चाची जबाबदारी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट उचलेल. या रेल्वेमार्गाची उभारणी इंडियन पोर्ट रेल कॉर्पोरेशन करेल. आधी या मार्गासाठीच्या खर्चाचा भार महाराष्ट्र, मध्य प्रदेश सरकार व आपले मंत्रालय उचलणार होते. मात्र आता आपले मंत्रालय तो भार उचलेल, असे ते म्हणाले.सांगली, नाशकात ड्रायपोर्टसिंदी (जि. वर्धा) आणि जालना येथे ड्रायपोर्ट उभारणीचे काम सुरू करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर सांगली आणि नाशिक येथे ड्रायपोर्टची उभारणी करून तेथून कृषी, औद्योगिक मालाची निर्यात केली जाईल, असे गडकरी यांनी सांगितले. सांगलीसाठी २ हजार एकर तर नाशिकसाठी ३०० एकर जमीन निश्चित करण्यात आली आहे, असे गडकरी यांनी सांगितले.वसईच्या खाडीतून माल थेट पोर्ट ट्रस्टमध्ये नेणार!मुंबईला वसई-विरारहून ट्रक-कंटेनरने येणारा माल भिवंडीला नेला जातो. त्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी होते आणि प्रदूषणही मोठ्या प्रमाणात होते. हे टाळण्यासाठी हा माल वसईच्या खाडीत धक्का निर्माण करून तेथे उतरवावा आणि तो समुद्रमार्गे थेट मुंबई पोर्ट ट्रस्टपर्यंत न्यावा, असा नवा उपाय नितीन गडकरी यांनी आज सुचविला. ते म्हणाले की, याबाबतचा प्रस्ताव मी कालच गोव्यात झालेल्या बैठकीत दिलेला आहे. वसई खाडीतील जागा त्यासाठी मिळाल्यास वाहतूक खर्च, प्रदूषण कमी होईल आणि वाहतूककोंडीही फुटेल.

टॅग्स :Nitin Gadakriनितिन गडकरी