शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

राम मंदिराचे ई-भूमिपूजन करा - मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2020 06:46 IST

शिवसेनेच्या मुखपत्रासाठी खा. संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत 'राममंदिराच्या भूमीपूजनाला जाणार का?’, या प्रश्नावर ठाकरे म्हणाले, अजूनही अधिकृत तारीख आलेली नाही. अधिकृत कार्यक्रम कसा असेल त्याची कल्पना नाही. तो कार्यक्रम आल्यानंतर आपण ते ठरवू, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ आॅगस्टला अयोध्येतील राम मंदिराच्या भूमीपूजनचा कार्यक्रम होणार आहे. मात्र, कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ई-भूमीपूजन करावे, असा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्याने नव्याने चर्चेला तोंड फुटले आहे.

शिवसेनेच्या मुखपत्रासाठी खा. संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत 'राममंदिराच्या भूमीपूजनाला जाणार का?’, या प्रश्नावर ठाकरे म्हणाले, अजूनही अधिकृत तारीख आलेली नाही. अधिकृत कार्यक्रम कसा असेल त्याची कल्पना नाही. तो कार्यक्रम आल्यानंतर आपण ते ठरवू, पण लाखो लोकांची जी भावना आहे की तिकडे उपस्थित राहावे. त्यांना तुम्ही कसे अडवणार? कारण तिकडे तो शरयूचा काठच महत्त्वाचा आहे. कारण राममंदिराच्या आंदोलनात तेव्हा शरयूसुद्धा लाल झाली होती, रामभक्तांच्या रक्ताने. राममंदिर हा भावनेचा विषय आहे. ज्या लाखो रामभक्तांना तिथे उपस्थित राहायचे आहे. त्यांचे काय करणार? त्यांना अडवणार की, येऊ देणार? त्यांच्या कळत नकळत कोरोनाचा प्रसार झाला तर? त्यासाठी तुम्ही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ई-भूमीपूजन करू शकता, असा सल्ला ठाकरे यांनी दिला. सध्या आपल्याकडे कोरोनाचं संकट आहे. त्यामुळे सर्व मंदिरांमध्ये जाण्या-येण्याला बंदी आहे. मी अयोध्येला जाऊन येईन पण लाखो रामभक्त जे उपस्थित राहू इच्छितात, त्यांचं तुम्ही काय करणार, असा सवाल मुख्यमंत्री ठाकरे यांनी केला.

या सरकारचे भवितव्य विरोधी पक्षनेत्यावर अवलंबून नाही. सरकार पाडायचे तर जरूर पाडा. मी काय फेविकॉल लावून बसलेलो नाही. तुम्हाला पाडापाडी करण्यात आनंद मिळतोय ना. काही जणांना घडवण्यात आनंद असतो, काही जणांना बिघडवण्यात आनंद मिळतो. काहीजण म्हणतायत आॅगस्ट - सप्टेंबरमध्ये सरकार पाडणार. पण मी म्हणतो वाट कशाला बघता? आजच पाडा, अशा शब्दात मुख्यमंत्री ठाकरे यांनी विरोधकांना एकप्रकारे आव्हानच दिले.मुंबई-नागपूर अशी बुलेट ट्रेन हवीराज्याला बुलेट ट्रेनची आवश्यकता असेल तर मुंबई-नागपूर अशी बुलेट ट्रेन हवी. राजधानी आणि उपराजधानीला जोडणारी बुलेट ट्रेन द्या, जेणेकरून विदर्भाच्या मनात कारण नसताना निर्माण केलेला दुरावा तरी नष्ट होईल, असे सांगत मुख्यमंत्री ठाकरे यांनी प्रस्तावित मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला विरोध केला.ज्याची कुवत कमी लेखली, तोच मुख्यमंत्री झाला!साठाव्या वर्षी मी मुख्यमंत्री झालो असलो तरी याच‘साठी’ केला होता अट्टहास असं नाहीए! हा निव्वळ योगायोग आहे. मला वाटतं, जगात माझंच एकमेव उदाहरण असेल की, ज्याची कुवत सगळ्यात कमी लेखली गेली, तो पक्षाचा सर्वोच्च नेता आणि राज्याचा मुख्यमंत्री झाला, असा टोला ठाकरे यांनी विरोधकांना लगावला.आमचे तीनचाकी तर तुमचे सरकार ३० चाकी!राज्यात तीनचाकी सरकार असले तरी या सरकारचे स्टेअरिंग माझ्याच हातात आहे. आमचे सरकार तीन चाकी असले तरी ते गरीबांचे वाहन आहे. बुलेट ट्रेन की रिक्षा यात निवड करायची झाली, तर मी रिक्षाच निवडेन. मी गरीबांच्या मागे उभा राहीन.शिवाय, तीनचाकी सरकार एका दिशेने चालत आहे, मग तुमच्या पोटात का दुखत आहे. केंद्रात किती चाके आहेत. मी जेव्हा गेल्यावेळी एनडीएच्या बैठकीला गेलो होतो; तेव्हा तर ३०-३५ चाके होती. म्हणजे रेल्वेगाडीच! असा टोला ठाकरे यांनी भाजपला लगावला. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेRam Mandirराम मंदिर