शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण
2
जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
3
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
4
पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार
5
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
6
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले
7
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
8
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
9
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
10
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
11
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
12
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
13
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
14
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
15
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात
16
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
17
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
18
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
19
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
20
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास

संघर्ष पर्वाचा अस्त! मानवलोकचे द्वारकादास लोहिया यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2018 23:55 IST

येथील ज्येष्ठ समाजसेवक तथा मानवलोकचे संस्थापक डॉ. द्वारकादास शालीग्रामजी लोहिया (८१) यांचे शुक्र वारी रात्री १०.४५ वाजता राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले.

अंबाजोगाई (जि. बीड) : येथील ज्येष्ठ समाजसेवक तथा मानवलोकचे संस्थापक डॉ. द्वारकादास शालीग्रामजी लोहिया (८१) यांचे शुक्र वारी रात्री १०.४५ वाजता राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. मागील बारा दिवसांपासुन ते आजारी होते. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी २ वाजता मानवलोक मुख्य कार्यालय परिसरात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात प्रा. अभिजीत लोहिया, मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया, मुलगी प्रा. अरूंधती पाटील, सुना, नातवंडे, जावई असा परिवार आहे.राष्ट्रसेवादल, सानेगुरूजी आरोग्य मंडळ, सोशालिस्ट पार्टी आदी व्यापक संघटनामध्ये स्वत:ला झोकून देत जनसामान्यांच्या दु:खावर फुंकर घालून त्यांचे सत्व जपणारे व संघर्षाची प्रेरणा देणारे व्यक्तीमत्व म्हणून त्यांची संपुर्ण महाराष्ट्राला ओळख होती. मानवलोकच्या माध्यमातून अंबाजोगाईचे नाव त्यांनी जगाच्या नकाशावर पोहोचविले. सामान्य माणसांचा आधारवड म्हणून त्यांचा सर्वत्र लौकीक होता. मानवलोक या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी साडेचार दशके विविध सामाजिक उपक्र म राबविले. मनस्विनी प्रकल्पाच्या माध्यमातून वंचित व परित्यक्त्या महिलांना आधार दिला. गरिब व निराधारांचाही ते आधार होते.डॉ. द्वारकादास लोहिया यांचा जन्म ममदापूर पाटोदा या खेड्यातील पारंपारिक राजस्थानी कुटुंबात ७ सप्टेंबर १९३८ मध्ये झाला. त्यांचे वडील बंधू कै. अ‍ॅड. भगवानसा लोहिया हे हैदराबादमध्ये शिक्षण घेत असताना रझाकार विरोधी चळवळीत सहभागी झाले. त्यामुळे डॉ. लोहियांवर लहानपणापासूनच सामाजिक संस्कार झाले. १९६२ च्या दशकात ते धुळे येथील सेवादल सैनिक, अ‍ॅड. शंकरराव व शंकुतला परांजपे यांची मुलगी शैला परांजपे यांच्याशी विवाहबद्ध झाले. १९६० ते १०९६२ या काळात त्यांनी हडपसर येथील महाराष्ट्र आरोग्य मंडळाच्या साने गुरुजी रुग्णालयात काम केले. आपला बीड जिल्हा सर्वस्वी मागासलेला आहे. नेहमीच दुष्काळग्रस्त असतो याची जाणीव ठेवून २४ डिसेंबर १९६२ साली त्यांनी अंबाजोगाई येथे दवाखाना सुरू केला ते आणि त्याचा गट विविध प्रश्नांवर चिनी आक्रमण, हिंदू-मुस्लिम दंगे, जातीयता, दलितांना होणारा त्रास या प्रश्नांवर सतत संघर्ष करीत व लोकांचे प्रबोधन करीत सातत्याने काम करण्याच्या व बोलत राहण्याच्या उपक्रमामुळे बाबरी मशीद, मुंबई बॉम्ब स्फोट, मराठवाडा विद्यापिठाचे नामांतरण या संघर्षाच्या काळात अंबाजोगाई परिसर व मानवलोकचे काम ज्या भागात आहे ती खेडी येथे शांतता राहिली. त्यांचा जातीयतेवर कधीच विश्वास नव्हता.१५ आॅगस्ट १९७४ मध्ये डॉ. लोहियांनी खाजगी दवाखाना बंद केला व महाराष्ट्र आरोग्य मंडळ, हडपसरची शाखा अंबाजोगाई येथे सुरू केली. तेथे डॉक्टर म्हणून डॉ. लोहिया पूर्ण वेळ काम करू लागले. १९७५ च्या जून मध्ये आणिबाणी जाहिर झाली. १९७० ते १९७५ च्या काळात विविध मागण्यांसाठी केलेला संघर्ष, मोर्च यामुळे त्याां पहिल्याच दिवशी अटक झाली. १९ महिने ते नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात मिसाबंदी म्हणून होते. १९७७ मध्ये सुटका झाल्यावर त्यांनी भावठाणा येथे ग्रामीण लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने कामास सुरुवात केली. पुढील कामासाठी जेथे रस्ते नाहीत, शाळा नाहीत, नाल्यावर पूल नाहीत अशा डोंगर भागात काम करण्याचे ठरविले व त्यासाठी पुढील सर्व आयुष्य देण्याचे ठरविले. शैला लोहिया या १९७० साली स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयात अध्यापक म्हणून त्या काम करू लागल्या. मुलांचे शिक्षण व घर खचार्ची जबाबदारी त्यांनी उचलून डॉ. लोहियांना संपूर्ण जीवन सामाजिक कामाला देण्यासाठी प्रेरणा दिली. कला पथकातून साठलेल्या पैशातून घेतलेल्या जागेमध्ये नवी संस्था सुरू करण्याचे ठरविले. १ एप्रिल १९८२ रोजी डॉ. द्वारकादास लोहिया यांच्या नेतृत्वाखाली गेले अनेक वर्षे त्यांच्या सोबत काम करणाऱ्या सामाजिक गटाने मराठवाडा नवनिर्माण लोकायत (मानवलोक) ही संस्था स्थापन केली. संस्थेची पूर्णवेळ सेवक म्हणून जबाबदारी डॉ. लोहियांनी स्वीकारली. गेल्या २६ वर्षात सुमारे १५० खेडयांमध्ये ही संस्था काम करीत आहे. या डोंगर परिसरात बंजारा, हाटकर, वंजारी, ठाकर असे अनेक जाती जमातींचे गट राहतात. त्यांच्या सर्वांगिण उन्नतीसाठी मानवलोक काम करीत आहे.

टॅग्स :BeedबीडMaharashtraमहाराष्ट्र