शहरं
Join us  
Trending Stories
1
CM फडणवीसांची नितेश राणेंना कठोर शब्दांत समज; म्हणाले, “तुमच्या मनात काही असले तरी...”
2
...अन् १४ चिनी नागरिकांचा जीव वाचला; चीननं मानले भारतीय नौदल आणि मुंबई कोस्ट गार्डचे आभार
3
जग बेलआऊटवर बेलआऊट पॅकेज देतेय, पाकिस्तानी सैन्य ते पैसे खातेय; वर्ल्ड बँकेनेच पाकिस्तानला उघडे केले...
4
हनिमून ते राजाची हत्या...; मेघालय पोलिसांनी विचारलेल्या 'या' १३ प्रश्नांनी उडवली सोनमची झोप!
5
MS धोनीसंदर्भात व्यक्त होताना शास्त्रींना आठवला 'पाकीटमार'; म्हणाले... (VIDEO)
6
सात जन्मांची साथ..., हत्या केल्यानंतर सोनमने राजाच्या अकाउंवरून शेअर केली अशी पोस्ट, पण ती एक चूक नडली, पोलिसांना आला संशय
7
खतरनाक! सोशल मीडियावर प्रसिद्ध होणं बेतलं १९ वर्षीय मुलीच्या जीवावर; काय आहे डस्टिंग चॅलेंज?
8
विजेच्या धक्क्याने बाप गेलाच, दोन्ही मुलं पाणी घेऊन आली अन् त्यांचेही आयुष्य संपलं!
9
तुरुंगात जाणार हे माहित होते, सोनम हत्येपर्यंत का गेली? राजापासून वेगळे होण्याचे हे सोपे मार्ग होते..., पण...
10
'सोनम रघुवंशी म्हणत होती बिझी आहे, त्याला समजलंच नाही...!'; राजा रघुवंशीच्या मित्रानं केला मोठा खुलासा
11
Jyeshtha Purnima 2025: यंदा ज्येष्ठ पौर्णिमा विभागून;धनसंपत्तीत वाढीसाठी बुधवारी करा 'हे' उपाय!
12
राजा रघुवंशी हत्या प्रकरणी मोठा खुलासा; हत्येनंतर सोनम इंदूरला पोहचली होती अन् त्याठिकाणी...
13
मोठा दावा...! संकटात आलाय भारतातील हा मोठा व्यवसाय...! ५७७००० नोकऱ्या गेल्याचा अंदाज 
14
Raj Kushwaha : "राजचं नाव ऐकलं अन्..."; पोलिसांच्या एका ट्रिकने फेल झाला सोनमचा 'तो' प्लॅन
15
जयंत पाटील म्हणाले, मला सगळ्या जबाबदारीतून मुक्त करा; CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
16
गेम खेळण्यासाठी मोबाईल देणं नाकारलं; आईवडिलांवर चिडलेल्या मुलीनं स्वतःलाच संपवलं!
17
सेन्सेक्स घसरला, निफ्टीची नाममात्र वाढ! 'या' शेअर्सनी केली कमाल, बाजारातून मोठे संकेत!
18
सोनं, चांदी, रोख रक्कम नाही तर हुंड्यात मागितली किडनी, नकार दिला तेव्हा...
19
रस्त्यानं चालताना पाय घसरून पडला, पाठीमागून येणाऱ्या बेस्ट बसनं चिरडलं, गोवंडीतील घटना!
20
Austria Shooting: बंदूक घेऊन विद्यार्थी थेट शाळेत घुसला, केला अंदाधुंद गोळीबार; ९ जणांचा मृत्यू, स्वतःलाही संपवलं

काँग्रेसच्या काळात चेलेचपाटे, चमचे यांची गरिबी हटली; गडकरींचे काँग्रेसला खडेबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2024 13:23 IST

भाजपचे सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील उमेदवार आमदार सुभाष देशमुख यांच्या प्रचारार्थ गडकरींची सभा झाली.

सोलापूर : काँग्रेस सरकारच्या काळात गरीब, शेतकऱ्यांची नव्हे तर त्यांचे नेते, कार्यकर्ते, चेलेचपाटे, चमचे यांची गरिबी हटली, अशी टीका केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी केली.

भाजपचे सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील उमेदवार आमदार सुभाष देशमुख यांच्या प्रचारार्थ गडकरींची सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते.

गडकरी म्हणाले, काँग्रेसच्या धोरणांमध्ये ग्रामीण विकासाचा समावेश नव्हता. काँग्रेसच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे आणि भ्रष्ट कारभारामुळे देशाचा सत्यानाश झाला. त्या काळात सरकारने एअर इंडिया, कर्नाटकमध्ये साेन्याची फॅक्टरी टाकली. पण सर्वकाही नुकसानीत गेले. त्या काळात प्रत्येक गावाला रस्ता, सिंचनाची सुविधा, शाळा, दवाखाने असते तर देशातील लोक मागास राहिले नसते. अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात आम्ही प्रधानमंत्री ग्रामसडक योजना सुरू केली. या योजनेतून साडेतीन लाख किलोमीटरचे रस्ते तयार केले. काँग्रेसच्या काळात नियोजन चुकले. काँग्रेसने गरिबी हटावचा नारा दिला. वीस कलमी, चाळीस कलमी कार्यक्रमाच्या घोषणा केल्या, त्या स्थितीची आठवण करा. 

गडकरी म्हणाले, काँग्रेसच्या स्थितीची आज आठवण करा. गावात शाळेची बिल्डिंग होती, पण शिक्षक नव्हते. शिक्षक होते तर बिल्डिंग नव्हती. दवाखान्यांची अवस्था वाईट होती. काँग्रेसने आपल्या नेत्यांना इंजिनिअरिंग कॉज, मेडिकल, डीएड कॉलेज वाटले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४western maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024solapur-city-central-acसोलापूर शहर मध्यNitin Gadkariनितीन गडकरी