शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
2
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
3
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
4
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
5
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
6
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
7
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
8
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
9
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
10
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
11
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
12
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
13
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
14
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
15
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
16
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
17
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
18
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
19
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
20
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  

बारावीच्या परीक्षेवेळी शिक्षक संपावर, ८ डिसेंबरपासून आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 05:58 IST

गेल्या तीन वर्षांपासून शिक्षकांच्या मान्य झालेल्या विविध मागण्यांवर अंमलबजावणी होत नसल्याने कनिष्ठ महाविद्यालयातील ७२ हजार शिक्षकांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे.

मुंबई : गेल्या तीन वर्षांपासून शिक्षकांच्या मान्य झालेल्या विविध मागण्यांवर अंमलबजावणी होत नसल्याने कनिष्ठ महाविद्यालयातील ७२ हजार शिक्षकांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. बारावीच्या परीक्षेदरम्यान म्हणजेच २ फेब्रुवारीला राज्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक संपावर जाणार आहेत. महाराष्ट्र राज्यकनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने मंगळवारी हा निर्णय जाहीर केला आहे.महासंघाचे अध्यक्ष अनिल देशमुख यांनी सांगितले की, नुकत्याच झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या तीन वर्षांत सातत्याने शिक्षकांनी आंदोलने केली. सरकारने प्रत्येक वेळी मागण्या मान्य केल्या व अंमलबजावणीची आश्वासने दिली. मात्र मान्य मागण्यांवर अंमलबजावणी करण्याऐवजी शिक्षकांविरोधी फतवे काढण्याचे काम सरकार करत आहे. परिणामी, शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोषाचे वातावरण आहे. म्हणूनच ‘आश्वासन नको, मान्य मागण्यांचा शासन निर्णय काढा,’ अशी मागणी करत बारावी परीक्षेच्या तोंडावरसर्व कनिष्ठ महाविद्यालये बंद ठेवण्याचा इशारा संघटनेनेदिला आहे.दरम्यान, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी ६ सप्टेंबरच्या बैठकीत दिवाळीपर्यंत शिक्षकांच्या मागण्यांची तातडीने पूर्तता करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, महिना उलटला तरी आश्वासनांची पूर्तता झाली नाही. त्यानंतर १४ नोव्हेंबरला संघटनेने एकदिवसीय इशारा आंदोलन केले. मात्र या आंदोलनाचीही शिक्षण विभागाने कोणतीच दखल घेतली नाही. त्यामुळे आता मागण्यांच्या पूर्ततेचा लढा अधिक तीव्रकरण्याचा निर्णय राज्य महासंघाने घेतला आहे....असे होणार आंदोलन८ डिसेंबरला राज्यातील सर्व तहसीलदार कार्यालयांवर धरणे आंदोलन करत स्थानिक आमदारांना निवेदन देण्यात येईल.१९ डिसेंबरला सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर धरणे आंदोलन करून राज्य शासनालानिवेदन देण्यात येईल.१८ जानेवारीला राज्यातीलआठ शिक्षण विभागांत शिक्षकांचे धडक मोर्चे निघतील.२ फेब्रुवारीला राज्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालये बंद करण्यात येतील.काय आहेत मागण्या?शिक्षकांना निवडश्रेणी आणि वेतनश्रेणीसाठी शाळेच्या ८० टक्के निकालाची अट काढणे.१ नोव्हेंबर २००५नंतरच्या सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करा.विनाअनुदानित शिक्षकांनाअनुदान द्या.२ मे २०१२पासूनच्या शिक्षकांना नियुक्ती मान्यता व वेतन द्या.

टॅग्स :examपरीक्षाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारTeacherशिक्षक