शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
3
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
4
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
5
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
6
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
7
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
8
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
9
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
10
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
11
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
12
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
13
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
14
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
15
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
16
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
17
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
18
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
19
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
20
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?

बारावीच्या परीक्षेवेळी शिक्षक संपावर, ८ डिसेंबरपासून आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 05:58 IST

गेल्या तीन वर्षांपासून शिक्षकांच्या मान्य झालेल्या विविध मागण्यांवर अंमलबजावणी होत नसल्याने कनिष्ठ महाविद्यालयातील ७२ हजार शिक्षकांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे.

मुंबई : गेल्या तीन वर्षांपासून शिक्षकांच्या मान्य झालेल्या विविध मागण्यांवर अंमलबजावणी होत नसल्याने कनिष्ठ महाविद्यालयातील ७२ हजार शिक्षकांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. बारावीच्या परीक्षेदरम्यान म्हणजेच २ फेब्रुवारीला राज्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक संपावर जाणार आहेत. महाराष्ट्र राज्यकनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने मंगळवारी हा निर्णय जाहीर केला आहे.महासंघाचे अध्यक्ष अनिल देशमुख यांनी सांगितले की, नुकत्याच झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या तीन वर्षांत सातत्याने शिक्षकांनी आंदोलने केली. सरकारने प्रत्येक वेळी मागण्या मान्य केल्या व अंमलबजावणीची आश्वासने दिली. मात्र मान्य मागण्यांवर अंमलबजावणी करण्याऐवजी शिक्षकांविरोधी फतवे काढण्याचे काम सरकार करत आहे. परिणामी, शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोषाचे वातावरण आहे. म्हणूनच ‘आश्वासन नको, मान्य मागण्यांचा शासन निर्णय काढा,’ अशी मागणी करत बारावी परीक्षेच्या तोंडावरसर्व कनिष्ठ महाविद्यालये बंद ठेवण्याचा इशारा संघटनेनेदिला आहे.दरम्यान, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी ६ सप्टेंबरच्या बैठकीत दिवाळीपर्यंत शिक्षकांच्या मागण्यांची तातडीने पूर्तता करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, महिना उलटला तरी आश्वासनांची पूर्तता झाली नाही. त्यानंतर १४ नोव्हेंबरला संघटनेने एकदिवसीय इशारा आंदोलन केले. मात्र या आंदोलनाचीही शिक्षण विभागाने कोणतीच दखल घेतली नाही. त्यामुळे आता मागण्यांच्या पूर्ततेचा लढा अधिक तीव्रकरण्याचा निर्णय राज्य महासंघाने घेतला आहे....असे होणार आंदोलन८ डिसेंबरला राज्यातील सर्व तहसीलदार कार्यालयांवर धरणे आंदोलन करत स्थानिक आमदारांना निवेदन देण्यात येईल.१९ डिसेंबरला सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर धरणे आंदोलन करून राज्य शासनालानिवेदन देण्यात येईल.१८ जानेवारीला राज्यातीलआठ शिक्षण विभागांत शिक्षकांचे धडक मोर्चे निघतील.२ फेब्रुवारीला राज्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालये बंद करण्यात येतील.काय आहेत मागण्या?शिक्षकांना निवडश्रेणी आणि वेतनश्रेणीसाठी शाळेच्या ८० टक्के निकालाची अट काढणे.१ नोव्हेंबर २००५नंतरच्या सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करा.विनाअनुदानित शिक्षकांनाअनुदान द्या.२ मे २०१२पासूनच्या शिक्षकांना नियुक्ती मान्यता व वेतन द्या.

टॅग्स :examपरीक्षाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारTeacherशिक्षक