शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

प्रचारकाळातच लागली होती विजयाची चाहूल : संगीता गोरंट्याल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2019 15:07 IST

जालना शहरातील विकासामुळेच जनतेने काँग्रेसला प्रचंड मताधिक्य दिल्याचे सौ. गोरंट्याल यांनी सांगितले. तसेच कैलास गोरंट्याल यांचा विकास कामाचा धडाका आणि विविध योजनांचा केलेला पाठपुरावा जनतेने लक्षात ठेवल्याचे त्या म्हणाल्या.

मुंबई - 2014 मध्ये अत्यंत चुरशीची ठरलेली आणि राजकीय वर्तुळात सर्वाधिक चर्चीली गेलेली जालना विधानसभा मतदार संघातील लढत काही प्रमाणात एकतर्फी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. पारंपरिक प्रतिस्पर्धी काँग्रेसनेते कैलास गोरंट्याल आणि शिवसेनेचे अर्जुन खोतकर लढतीत चुरशीची होणार अशी शक्यता व्यक्त होत होती. परंतु गोरंट्याल यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत पुन्हा एकदा विधानसभेत प्रवेश केला. या विजयाची चाहूल आपल्याला निवडणूक प्रचारातच लागली होती, असं आमदार कैलास गोरंट्याल यांच्या पत्नी तथा जालना नगरपालिकेच्या नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी सांगितले. त्यांनी लोकमतशी संवाद साधला.

जालना विधानसभा निवडणुकीतील विजय नेहमीच ग्रामीण मतदारांवर निर्भर राहिलेला आहे. अर्जुन खोतकर यांना ग्रामीण मतदारांची मोठी साथ मिळते. तर शहरी मतदारांची पसंती गोरंट्याल यांना असते. यावेळीही ग्रामीण मतदारांमुळे गोरंट्याल यांना अडचण होणार अशी चर्चा मतदारसंघात होती. परंतु, आधीच्या सर्व निवडणुकीपैकी या निवडणुकीत ग्रामीण मतदारांनी गोरंट्याल यांच्या पारड्यात मत टाकले. त्यामुळे गोरंट्याल यांचा 25 हजारांच्या मताधिक्याने विजय झाला.

जालना शहरातील विकासामुळेच जनतेने काँग्रेसला प्रचंड मताधिक्य दिल्याचे सौ. गोरंट्याल यांनी सांगितले. तसेच कैलास गोरंट्याल यांचा विकास कामाचा धडाका आणि विविध योजनांचा केलेला पाठपुरावा जनतेने लक्षात ठेवल्याचे त्या म्हणाल्या. किंबहुना प्रचाराच्या काळात जनतेतून मिळत असलेला पाठिंबा पाहुनच विधानसभा विजयाची चाहुल लागली होती, असंही त्यांनी नमूद केले.

अक्षयला ग्रामीण प्रश्नांची जाणपरदेशात शिक्षण पूर्ण करून परतल्यानंतर अक्षय लगेच प्रचाराच्या कामात लागला. त्यालाही राजकारणाची आवड आहेच. निवडणूक प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाच्या दिवशीचं अक्षयच्या परिक्षेचा निकाल लागला. त्यात त्याने चांगलेच यश मिळवले आहे. अक्षयने कृषी क्षेत्रात शिक्षण घेतल्यामुळे त्याला ग्रामीण प्रश्न समजून घेण्यास मदत होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

कार्यालयात तिघांपैकी एकजण हजर राहतोचजनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण राजकारणात आहोत. त्यामुळे कार्यालयात भेटायला आलेल्या प्रत्येकाची भेट घेण्यासाठी कुटुंबातील एक व्यक्त कायम कार्यालयात असतोच, असं संगीता गोरंट्याल यांनी सांगितले. त्यामुळे बऱ्याचदा कुटुंबासोबत एकत्र जाणे शक्य होत नाही. पण त्यातून मार्ग काढत काम करतोय. कार्यालयात कामानिमित्त आलेल्या प्रत्येक व्यक्तीला भेटण्याचा कुटुंबाचा वारसाच असल्याचे त्या म्हणाल्या.