शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

प्रचारकाळातच लागली होती विजयाची चाहूल : संगीता गोरंट्याल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2019 15:07 IST

जालना शहरातील विकासामुळेच जनतेने काँग्रेसला प्रचंड मताधिक्य दिल्याचे सौ. गोरंट्याल यांनी सांगितले. तसेच कैलास गोरंट्याल यांचा विकास कामाचा धडाका आणि विविध योजनांचा केलेला पाठपुरावा जनतेने लक्षात ठेवल्याचे त्या म्हणाल्या.

मुंबई - 2014 मध्ये अत्यंत चुरशीची ठरलेली आणि राजकीय वर्तुळात सर्वाधिक चर्चीली गेलेली जालना विधानसभा मतदार संघातील लढत काही प्रमाणात एकतर्फी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. पारंपरिक प्रतिस्पर्धी काँग्रेसनेते कैलास गोरंट्याल आणि शिवसेनेचे अर्जुन खोतकर लढतीत चुरशीची होणार अशी शक्यता व्यक्त होत होती. परंतु गोरंट्याल यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत पुन्हा एकदा विधानसभेत प्रवेश केला. या विजयाची चाहूल आपल्याला निवडणूक प्रचारातच लागली होती, असं आमदार कैलास गोरंट्याल यांच्या पत्नी तथा जालना नगरपालिकेच्या नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी सांगितले. त्यांनी लोकमतशी संवाद साधला.

जालना विधानसभा निवडणुकीतील विजय नेहमीच ग्रामीण मतदारांवर निर्भर राहिलेला आहे. अर्जुन खोतकर यांना ग्रामीण मतदारांची मोठी साथ मिळते. तर शहरी मतदारांची पसंती गोरंट्याल यांना असते. यावेळीही ग्रामीण मतदारांमुळे गोरंट्याल यांना अडचण होणार अशी चर्चा मतदारसंघात होती. परंतु, आधीच्या सर्व निवडणुकीपैकी या निवडणुकीत ग्रामीण मतदारांनी गोरंट्याल यांच्या पारड्यात मत टाकले. त्यामुळे गोरंट्याल यांचा 25 हजारांच्या मताधिक्याने विजय झाला.

जालना शहरातील विकासामुळेच जनतेने काँग्रेसला प्रचंड मताधिक्य दिल्याचे सौ. गोरंट्याल यांनी सांगितले. तसेच कैलास गोरंट्याल यांचा विकास कामाचा धडाका आणि विविध योजनांचा केलेला पाठपुरावा जनतेने लक्षात ठेवल्याचे त्या म्हणाल्या. किंबहुना प्रचाराच्या काळात जनतेतून मिळत असलेला पाठिंबा पाहुनच विधानसभा विजयाची चाहुल लागली होती, असंही त्यांनी नमूद केले.

अक्षयला ग्रामीण प्रश्नांची जाणपरदेशात शिक्षण पूर्ण करून परतल्यानंतर अक्षय लगेच प्रचाराच्या कामात लागला. त्यालाही राजकारणाची आवड आहेच. निवडणूक प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाच्या दिवशीचं अक्षयच्या परिक्षेचा निकाल लागला. त्यात त्याने चांगलेच यश मिळवले आहे. अक्षयने कृषी क्षेत्रात शिक्षण घेतल्यामुळे त्याला ग्रामीण प्रश्न समजून घेण्यास मदत होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

कार्यालयात तिघांपैकी एकजण हजर राहतोचजनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण राजकारणात आहोत. त्यामुळे कार्यालयात भेटायला आलेल्या प्रत्येकाची भेट घेण्यासाठी कुटुंबातील एक व्यक्त कायम कार्यालयात असतोच, असं संगीता गोरंट्याल यांनी सांगितले. त्यामुळे बऱ्याचदा कुटुंबासोबत एकत्र जाणे शक्य होत नाही. पण त्यातून मार्ग काढत काम करतोय. कार्यालयात कामानिमित्त आलेल्या प्रत्येक व्यक्तीला भेटण्याचा कुटुंबाचा वारसाच असल्याचे त्या म्हणाल्या.