शहरं
Join us  
Trending Stories
1
School Bus Accident: भयानक अपघात! ट्रेन जात असताना स्कूल बस आडवी आली; चिंधड्या उडाल्या, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
2
'मराठी मोर्चा' रोखण्यासाठी पोलिसांची रात्रभर घरात घुसून धरपकड, मीरा भाईंदरमध्ये बंदोबस्त वाढवला
3
अमेरिकेत फिरायला गेले, तिथेच काळाने घाला घातला; आई-वडीलांसह दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू
4
जगात पहिल्यांदाच… ज्याला समजलं जातं कचरा अदानींनी त्यानंच बनवला रस्ता, पाहा डिटेल्स
5
MSRTC: एसटी महामंडळाच्या दैनंदिन फेऱ्या कमी झाल्याने डोंबिवलीहून पनवेलला जाणाऱ्या प्रवाशांचे हाल!
6
चार मुलांची आई कुवेतला जाऊन प्रियकराला घेऊन आली; आपल्याच घरात राहतायत हे पतीला कळताच...
7
डोनाल्ड ट्रम्प यांना आव्हान देणं मस्क यांना महागात? आधी टेस्ला गडगडली, आता संपत्तीला खिंडार!
8
व्यावसायिक गोपाल खेमका हत्या प्रकरण: मुख्य आरोपी एन्काउंटरमध्ये ठार, झाला मोठा खुलासा
9
 F&O नं दिलाय जोरदार झटका, आर्थिक वर्षात गुंतवणूकदारांचे ₹१.०६ लाख कोटी बुडाले; SEBI नं काय म्हटलं?
10
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानी युद्धनौका बंदरातच का नांगरलेल्या होत्या? मोठी माहिती समोर, लढायच्याच स्थितीत नाहीत
11
Stock Market Today: ५५ अंकांच्या घसरणीसह उघडला सेन्सेक्स; या दोन क्षेत्रांवर दबाव, बाजारात तेजी का दिसून येत नाहीये?
12
Mumbai Crime: 'तो' व्हिडीओ अन् तीन कोटी, मुंबईत सीएने आयुष्यच संपवले, सुसाईड नोटमध्ये काय?
13
डॅालर्स नाही लोकल करन्सी… रशियाच्या प्लाननं ट्रम्प यांचा तिळपापड, भारताला होणार का मोठा फायदा?
14
Viral Video: देव न दिसे देवळात, माझे पांडुरंग घरात; वारीतून परतलेल्या बापासाठी लेकीनं केलं असं काही, होतंय कौतुक!
15
बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेली, दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला; पुढे जे झालं ते ऐकून उडेल अंगाचा थरकाप
16
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
17
तुलसी Is Back! १७ वर्षांनी 'क्योंकी सास भी...'चा सीक्वल, स्मृती इराणीची पहिली झलक, 'या' दिवशी सुरू होणार
18
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
19
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
20
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा

प्रचारकाळातच लागली होती विजयाची चाहूल : संगीता गोरंट्याल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2019 15:07 IST

जालना शहरातील विकासामुळेच जनतेने काँग्रेसला प्रचंड मताधिक्य दिल्याचे सौ. गोरंट्याल यांनी सांगितले. तसेच कैलास गोरंट्याल यांचा विकास कामाचा धडाका आणि विविध योजनांचा केलेला पाठपुरावा जनतेने लक्षात ठेवल्याचे त्या म्हणाल्या.

मुंबई - 2014 मध्ये अत्यंत चुरशीची ठरलेली आणि राजकीय वर्तुळात सर्वाधिक चर्चीली गेलेली जालना विधानसभा मतदार संघातील लढत काही प्रमाणात एकतर्फी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. पारंपरिक प्रतिस्पर्धी काँग्रेसनेते कैलास गोरंट्याल आणि शिवसेनेचे अर्जुन खोतकर लढतीत चुरशीची होणार अशी शक्यता व्यक्त होत होती. परंतु गोरंट्याल यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत पुन्हा एकदा विधानसभेत प्रवेश केला. या विजयाची चाहूल आपल्याला निवडणूक प्रचारातच लागली होती, असं आमदार कैलास गोरंट्याल यांच्या पत्नी तथा जालना नगरपालिकेच्या नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी सांगितले. त्यांनी लोकमतशी संवाद साधला.

जालना विधानसभा निवडणुकीतील विजय नेहमीच ग्रामीण मतदारांवर निर्भर राहिलेला आहे. अर्जुन खोतकर यांना ग्रामीण मतदारांची मोठी साथ मिळते. तर शहरी मतदारांची पसंती गोरंट्याल यांना असते. यावेळीही ग्रामीण मतदारांमुळे गोरंट्याल यांना अडचण होणार अशी चर्चा मतदारसंघात होती. परंतु, आधीच्या सर्व निवडणुकीपैकी या निवडणुकीत ग्रामीण मतदारांनी गोरंट्याल यांच्या पारड्यात मत टाकले. त्यामुळे गोरंट्याल यांचा 25 हजारांच्या मताधिक्याने विजय झाला.

जालना शहरातील विकासामुळेच जनतेने काँग्रेसला प्रचंड मताधिक्य दिल्याचे सौ. गोरंट्याल यांनी सांगितले. तसेच कैलास गोरंट्याल यांचा विकास कामाचा धडाका आणि विविध योजनांचा केलेला पाठपुरावा जनतेने लक्षात ठेवल्याचे त्या म्हणाल्या. किंबहुना प्रचाराच्या काळात जनतेतून मिळत असलेला पाठिंबा पाहुनच विधानसभा विजयाची चाहुल लागली होती, असंही त्यांनी नमूद केले.

अक्षयला ग्रामीण प्रश्नांची जाणपरदेशात शिक्षण पूर्ण करून परतल्यानंतर अक्षय लगेच प्रचाराच्या कामात लागला. त्यालाही राजकारणाची आवड आहेच. निवडणूक प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाच्या दिवशीचं अक्षयच्या परिक्षेचा निकाल लागला. त्यात त्याने चांगलेच यश मिळवले आहे. अक्षयने कृषी क्षेत्रात शिक्षण घेतल्यामुळे त्याला ग्रामीण प्रश्न समजून घेण्यास मदत होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

कार्यालयात तिघांपैकी एकजण हजर राहतोचजनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण राजकारणात आहोत. त्यामुळे कार्यालयात भेटायला आलेल्या प्रत्येकाची भेट घेण्यासाठी कुटुंबातील एक व्यक्त कायम कार्यालयात असतोच, असं संगीता गोरंट्याल यांनी सांगितले. त्यामुळे बऱ्याचदा कुटुंबासोबत एकत्र जाणे शक्य होत नाही. पण त्यातून मार्ग काढत काम करतोय. कार्यालयात कामानिमित्त आलेल्या प्रत्येक व्यक्तीला भेटण्याचा कुटुंबाचा वारसाच असल्याचे त्या म्हणाल्या.