शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

रुग्णदुपटीचा कालावधी ५४ वरून ६१ दिवसांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2020 07:17 IST

मुंबईकरांना दिलासा; ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम ठरते आहे प्रभावी 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गणेशोत्सवानंतर रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्यामुळे मुंबईतील रुग्णदुपटीचा कालावधी ९३ दिवसांवरून ५४ दिवसांवर आला होता. मात्र १५ सप्टेंबरपासून राज्यस्तरावर सुरू झालेली ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम मुंबईत प्रभावी ठरत असल्याचे दिसून येत आहे. घरोघरी जाऊन तापमान व प्राणवायूची तपासणी, बाधित रुग्णांच्या संपर्कातील लोकांचा शोध आणि अन्य प्रभावी उपाययोजनांमुळे आता ६१ दिवसांनंतर कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होत आहे. 

आॅगस्ट महिन्यापर्यंत मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे नियंत्रणात आल्याचे चित्र होते. मात्र लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर तसेच गणेशोत्सव काळात नागरिकांचा सार्वजनिक ठिकाणी वावर वाढला. परिणामी, १ सप्टेंबरपासून रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत गेली. त्यामुळे रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी दिवसेंदिवस कमी होत चालला होता. तसेच दैनंदिन वाढ ०.७५ वरून १.२८ टक्क्यांपर्यंत पोहोचली. त्यामुळे घरोघरी जाऊन तपासणी, ज्येष्ठ नागरिकांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवणे, दररोज १५ हजारांहून अधिक चाचण्या करण्यात येत आहेत.‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत पालिका कर्मचारी व दोन स्वयंसेवक असे सुमारे पाच हजार कर्मचारी घरोघरी जाऊन लोकांची आरोग्य तपासणी, त्यांच्यातील प्राणवायूचे प्रमाण तपासणे, सर्वेक्षण, मार्गदर्शन आणि आवश्यक कार्यवाही करीत आहेत. या मोहिमेत बाधितांच्या जवळच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्याचे प्रमाणही वाढविल्याने त्याचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत.

असा होईल मोहिमेचा फायदाप्रत्येक कुटुंबाशी संपर्क साधताना मिळालेली माहिती राज्य सरकारद्वारे या मोहिमेसाठी तयार करण्यात आलेल्या अ‍ॅण्ड्रॉईड आधारित मोबाइल अ‍ॅपमध्ये जतन केली जाईल. त्यामुळे उपलब्ध होणाऱ्या सर्व माहितीचे जलद गतीने विश्लेषण करणे शक्य होईल. परिणामी, कोविड नियंत्रण विषयक उपाययोजनांची अंमलबजावणी शक्य होईल.बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध : मोहिमेअंतर्गत बाधित रुग्णाच्या जवळच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्याचे प्रमाण१० हजारांवरून २० हजारांपर्यंत आले. सर्व उपाययोजनांनंतर १५ सप्टेंबरला ५४ दिवसांवर असलेल्या रुग्णदुपटीचा काळ बुधवारी ६१ दिवसांवर आला.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या