शहरं
Join us  
Trending Stories
1
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
2
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
3
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
4
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
5
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
6
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
7
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
8
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
9
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
10
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
11
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम
12
चातुर्मासातील पहिली कामिका एकादशी: श्रीविष्णूंचे ‘या’ स्वरुपात करा पूजन; पाहा, सोपा व्रतविधी
13
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
14
कुत्रा चावलाच नाही, तरीही अख्ख्या गावाने घेतले रेबीजचे इंजेक्शन, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
15
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
16
MRI मशीनने व्यक्तीला एका झटक्यात गिळले, तडफडून मृत्यू, एक छोटीशी चूक ठरली जीवघेणी  
17
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
18
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
19
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
20
Beed: प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव

ऊसपट्ट्यात बिबट्याची दहशत

By admin | Updated: April 27, 2015 03:33 IST

राज्याच्या वन विभागाला सध्या भलतीच चिंता सतावत आहे. जंगलात राहणाऱ्या बिबट्याने आता उसाच्या शेतात आपला आश्रय शोधल्याने बिबट्या

संदीप भालेराव, नाशिकराज्याच्या वन विभागाला सध्या भलतीच चिंता सतावत आहे. जंगलात राहणाऱ्या बिबट्याने आता उसाच्या शेतात आपला आश्रय शोधल्याने बिबट्या आणि मानव यांच्यातील संघर्षदेखील वाढला आहे. बिबट्याच्या हल्ल्यानंतर द्याव्या लागणाऱ्या नुकसानभरपाईचा आकडा कोटींच्या घरात पोहचल्याने बिबट्याच्या या वास्तव्याचे करायचे काय, असा प्रश्न वन विभागापुढे निर्माण झाला आहे. नागपूर येथील प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी म्हणे अवघ्या राज्याला बिबट्याच्या शहरातील वास्तव्याचे करायचे काय, यावर अभिप्राय विचारला आहे. शहरालगत आणि ग्रामीण भागातही बिबट्याने आता उसाच्या शेतातच निवारा शोधला आहे. काही वर्षांपूर्वी बिबटे पाणी आणि शिकारीसाठी मळे, शेती आणि रहिवासी क्षेत्रात येत असत आणि परिसरात एकदा दिसलेल्या बिबट्याचे पुन्हा दर्शन घडत नसे; परंतु आता हे चित्र बदलले आहे. बिबट्याने उसाच्या शेतात ठाण मांडणे सुरू केल्याने धोका वाढला आहे.. जंगली प्राण्यांचा हा नैसर्गिक अधिवास नसल्यामुळे मानव आणि प्राणी यांच्यातील जैवसाखळी बिघडण्याचा धोका व्यक्त करण्यात येत आहे. मागील पाच वर्षांत बिबट्याच्या हल्ल्यात मृत अथवा जखमी झालेल्या मानव आणि पाळीव जनावरांवरील नुकसानभरपाईपोटी वन विभागाला कोट्यवधी रुपये मोजावे लागले आहेत. एकट्या नाशिक जिल्ह्यात पाच वर्षांत सुमारे पाच कोटींची भरपाई द्यावी लागली आहे. यावरून इतर जिल्ह्यांची परिस्थितीही लक्षात येते. नुकसानभरपाईपोटी वन विभागाला आर्थिक तोटा सहन करावा लागत असल्याचेदेखील दुखणे आहेच. त्यामुळे कधी नव्हे ते वन विभागाला बिबट्याची चिंंता सतावू लागली आहे. उसाच्या शेतातील बिबट्यांचे वास्तव्य कमी करण्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील, याचा अंदाज प्रधान मुख्य वनसंरक्षक घेत आहेत. त्यांनी आपल्या विभागाला आदेशित करून सर्व संवर्गातील अधिकारी आणि शेतकऱ्यांकडून याबाबतचा अभिप्राय मागविला आहे. यामध्ये उसाच्या शेतीच्या संरक्षणापासून ते शेतमजूर आणि पाळीव प्राण्यांचे संरक्षण कसे करता येऊ शकेल याबाबतचा तोडगाही त्यांनी विचारला आहे. दरम्यान, नाशिक आणि नगर या जिल्ह्यांत बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे, तसेच नाशिक जिल्ह्यात उसाचे क्षेत्रही मोठे असल्याने नाशिकमधून या उपाययोजनेची सुरुवात करण्याचा विचार वन विभाग करीत आहे. नाशिक वन परिक्षेत्राचा विचार केला तर संगमनेर, नगर, नाशिक पश्चिम, नाशिक पूर्व आणि मालेगाव असा बिबट्यांच्या संख्येनुसार क्रमांक लागतो. नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बिबटे आढळून आल्याने त्यांच्या वास्तव्यावर कसे निर्बंध आणता येतील, याचा विचार केला जात आहे. विशेष म्हणजे, उसाच्या शेतात बिबट्या वास्तव्य करणार नाही यासाठी शेतकऱ्यांकडे काही उपाययोजना आहेत का यासाठी काही शेतकऱ्यांनादेखील अभिप्राय कळविण्यास सांगण्यात आले आहे. यासंदर्भातील कामाला सुरुवात झाली असली, तरी प्रत्यक्षात ठोस कोणतेही मुद्दे पुढे आलेले नाहीत. वन कर्मचारीच बिबट्याचा संचार रोखण्याबाबत साशंक आहेत; परंतु साहेबांचा आदेश म्हटल्यावर अभिप्रायाचे कागदे रंगविले जातील इतकेच. यातून बिबट्याच्या वास्तव्याचा गांभीर्याने विचार व्हावा असे अपेक्षित असावे; परंतु समोर आलेल्या काही सूचनांवरून मनोरंजनच होऊ पाहात आहे.