शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
3
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
4
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
5
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
6
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
7
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
8
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
9
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
10
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
11
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
12
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
13
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
14
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
15
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
16
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
17
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
18
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
19
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
20
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...

ऊसपट्ट्यात बिबट्याची दहशत

By admin | Updated: April 27, 2015 03:33 IST

राज्याच्या वन विभागाला सध्या भलतीच चिंता सतावत आहे. जंगलात राहणाऱ्या बिबट्याने आता उसाच्या शेतात आपला आश्रय शोधल्याने बिबट्या

संदीप भालेराव, नाशिकराज्याच्या वन विभागाला सध्या भलतीच चिंता सतावत आहे. जंगलात राहणाऱ्या बिबट्याने आता उसाच्या शेतात आपला आश्रय शोधल्याने बिबट्या आणि मानव यांच्यातील संघर्षदेखील वाढला आहे. बिबट्याच्या हल्ल्यानंतर द्याव्या लागणाऱ्या नुकसानभरपाईचा आकडा कोटींच्या घरात पोहचल्याने बिबट्याच्या या वास्तव्याचे करायचे काय, असा प्रश्न वन विभागापुढे निर्माण झाला आहे. नागपूर येथील प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी म्हणे अवघ्या राज्याला बिबट्याच्या शहरातील वास्तव्याचे करायचे काय, यावर अभिप्राय विचारला आहे. शहरालगत आणि ग्रामीण भागातही बिबट्याने आता उसाच्या शेतातच निवारा शोधला आहे. काही वर्षांपूर्वी बिबटे पाणी आणि शिकारीसाठी मळे, शेती आणि रहिवासी क्षेत्रात येत असत आणि परिसरात एकदा दिसलेल्या बिबट्याचे पुन्हा दर्शन घडत नसे; परंतु आता हे चित्र बदलले आहे. बिबट्याने उसाच्या शेतात ठाण मांडणे सुरू केल्याने धोका वाढला आहे.. जंगली प्राण्यांचा हा नैसर्गिक अधिवास नसल्यामुळे मानव आणि प्राणी यांच्यातील जैवसाखळी बिघडण्याचा धोका व्यक्त करण्यात येत आहे. मागील पाच वर्षांत बिबट्याच्या हल्ल्यात मृत अथवा जखमी झालेल्या मानव आणि पाळीव जनावरांवरील नुकसानभरपाईपोटी वन विभागाला कोट्यवधी रुपये मोजावे लागले आहेत. एकट्या नाशिक जिल्ह्यात पाच वर्षांत सुमारे पाच कोटींची भरपाई द्यावी लागली आहे. यावरून इतर जिल्ह्यांची परिस्थितीही लक्षात येते. नुकसानभरपाईपोटी वन विभागाला आर्थिक तोटा सहन करावा लागत असल्याचेदेखील दुखणे आहेच. त्यामुळे कधी नव्हे ते वन विभागाला बिबट्याची चिंंता सतावू लागली आहे. उसाच्या शेतातील बिबट्यांचे वास्तव्य कमी करण्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील, याचा अंदाज प्रधान मुख्य वनसंरक्षक घेत आहेत. त्यांनी आपल्या विभागाला आदेशित करून सर्व संवर्गातील अधिकारी आणि शेतकऱ्यांकडून याबाबतचा अभिप्राय मागविला आहे. यामध्ये उसाच्या शेतीच्या संरक्षणापासून ते शेतमजूर आणि पाळीव प्राण्यांचे संरक्षण कसे करता येऊ शकेल याबाबतचा तोडगाही त्यांनी विचारला आहे. दरम्यान, नाशिक आणि नगर या जिल्ह्यांत बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे, तसेच नाशिक जिल्ह्यात उसाचे क्षेत्रही मोठे असल्याने नाशिकमधून या उपाययोजनेची सुरुवात करण्याचा विचार वन विभाग करीत आहे. नाशिक वन परिक्षेत्राचा विचार केला तर संगमनेर, नगर, नाशिक पश्चिम, नाशिक पूर्व आणि मालेगाव असा बिबट्यांच्या संख्येनुसार क्रमांक लागतो. नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बिबटे आढळून आल्याने त्यांच्या वास्तव्यावर कसे निर्बंध आणता येतील, याचा विचार केला जात आहे. विशेष म्हणजे, उसाच्या शेतात बिबट्या वास्तव्य करणार नाही यासाठी शेतकऱ्यांकडे काही उपाययोजना आहेत का यासाठी काही शेतकऱ्यांनादेखील अभिप्राय कळविण्यास सांगण्यात आले आहे. यासंदर्भातील कामाला सुरुवात झाली असली, तरी प्रत्यक्षात ठोस कोणतेही मुद्दे पुढे आलेले नाहीत. वन कर्मचारीच बिबट्याचा संचार रोखण्याबाबत साशंक आहेत; परंतु साहेबांचा आदेश म्हटल्यावर अभिप्रायाचे कागदे रंगविले जातील इतकेच. यातून बिबट्याच्या वास्तव्याचा गांभीर्याने विचार व्हावा असे अपेक्षित असावे; परंतु समोर आलेल्या काही सूचनांवरून मनोरंजनच होऊ पाहात आहे.