शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

ऊसपट्ट्यात बिबट्याची दहशत

By admin | Updated: April 27, 2015 03:33 IST

राज्याच्या वन विभागाला सध्या भलतीच चिंता सतावत आहे. जंगलात राहणाऱ्या बिबट्याने आता उसाच्या शेतात आपला आश्रय शोधल्याने बिबट्या

संदीप भालेराव, नाशिकराज्याच्या वन विभागाला सध्या भलतीच चिंता सतावत आहे. जंगलात राहणाऱ्या बिबट्याने आता उसाच्या शेतात आपला आश्रय शोधल्याने बिबट्या आणि मानव यांच्यातील संघर्षदेखील वाढला आहे. बिबट्याच्या हल्ल्यानंतर द्याव्या लागणाऱ्या नुकसानभरपाईचा आकडा कोटींच्या घरात पोहचल्याने बिबट्याच्या या वास्तव्याचे करायचे काय, असा प्रश्न वन विभागापुढे निर्माण झाला आहे. नागपूर येथील प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी म्हणे अवघ्या राज्याला बिबट्याच्या शहरातील वास्तव्याचे करायचे काय, यावर अभिप्राय विचारला आहे. शहरालगत आणि ग्रामीण भागातही बिबट्याने आता उसाच्या शेतातच निवारा शोधला आहे. काही वर्षांपूर्वी बिबटे पाणी आणि शिकारीसाठी मळे, शेती आणि रहिवासी क्षेत्रात येत असत आणि परिसरात एकदा दिसलेल्या बिबट्याचे पुन्हा दर्शन घडत नसे; परंतु आता हे चित्र बदलले आहे. बिबट्याने उसाच्या शेतात ठाण मांडणे सुरू केल्याने धोका वाढला आहे.. जंगली प्राण्यांचा हा नैसर्गिक अधिवास नसल्यामुळे मानव आणि प्राणी यांच्यातील जैवसाखळी बिघडण्याचा धोका व्यक्त करण्यात येत आहे. मागील पाच वर्षांत बिबट्याच्या हल्ल्यात मृत अथवा जखमी झालेल्या मानव आणि पाळीव जनावरांवरील नुकसानभरपाईपोटी वन विभागाला कोट्यवधी रुपये मोजावे लागले आहेत. एकट्या नाशिक जिल्ह्यात पाच वर्षांत सुमारे पाच कोटींची भरपाई द्यावी लागली आहे. यावरून इतर जिल्ह्यांची परिस्थितीही लक्षात येते. नुकसानभरपाईपोटी वन विभागाला आर्थिक तोटा सहन करावा लागत असल्याचेदेखील दुखणे आहेच. त्यामुळे कधी नव्हे ते वन विभागाला बिबट्याची चिंंता सतावू लागली आहे. उसाच्या शेतातील बिबट्यांचे वास्तव्य कमी करण्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील, याचा अंदाज प्रधान मुख्य वनसंरक्षक घेत आहेत. त्यांनी आपल्या विभागाला आदेशित करून सर्व संवर्गातील अधिकारी आणि शेतकऱ्यांकडून याबाबतचा अभिप्राय मागविला आहे. यामध्ये उसाच्या शेतीच्या संरक्षणापासून ते शेतमजूर आणि पाळीव प्राण्यांचे संरक्षण कसे करता येऊ शकेल याबाबतचा तोडगाही त्यांनी विचारला आहे. दरम्यान, नाशिक आणि नगर या जिल्ह्यांत बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे, तसेच नाशिक जिल्ह्यात उसाचे क्षेत्रही मोठे असल्याने नाशिकमधून या उपाययोजनेची सुरुवात करण्याचा विचार वन विभाग करीत आहे. नाशिक वन परिक्षेत्राचा विचार केला तर संगमनेर, नगर, नाशिक पश्चिम, नाशिक पूर्व आणि मालेगाव असा बिबट्यांच्या संख्येनुसार क्रमांक लागतो. नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बिबटे आढळून आल्याने त्यांच्या वास्तव्यावर कसे निर्बंध आणता येतील, याचा विचार केला जात आहे. विशेष म्हणजे, उसाच्या शेतात बिबट्या वास्तव्य करणार नाही यासाठी शेतकऱ्यांकडे काही उपाययोजना आहेत का यासाठी काही शेतकऱ्यांनादेखील अभिप्राय कळविण्यास सांगण्यात आले आहे. यासंदर्भातील कामाला सुरुवात झाली असली, तरी प्रत्यक्षात ठोस कोणतेही मुद्दे पुढे आलेले नाहीत. वन कर्मचारीच बिबट्याचा संचार रोखण्याबाबत साशंक आहेत; परंतु साहेबांचा आदेश म्हटल्यावर अभिप्रायाचे कागदे रंगविले जातील इतकेच. यातून बिबट्याच्या वास्तव्याचा गांभीर्याने विचार व्हावा असे अपेक्षित असावे; परंतु समोर आलेल्या काही सूचनांवरून मनोरंजनच होऊ पाहात आहे.