शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दरबारातही भक्तांची बनवाबनवी!दानपेटीत मिळाल्या रद्द झालेल्या नोटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2017 15:03 IST

लालबागच्या राजाप्रमाणे पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दरबारातही भक्तांनी बनवाबनवी केल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देदानपेटी उघडल्यानंतर त्यात पाचशे, हजार रुपयांच्या चलनातून रद्द झालेल्या नोटा सापडल्या आहेत.पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा पुन्हा जमा करण्यासाठी एक मुदत दिली होती.

पुणे, दि. 11 - लालबागच्या राजाप्रमाणे पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दरबारातही भक्तांनी बनवाबनवी केल्याचे समोर आले आहे. मंडळाने गणपतीसमोर ठेवलेली दानपेटी उघडल्यानंतर त्यात पाचशे, हजार रुपयांच्या चलनातून रद्द झालेल्या नोटा सापडल्या आहेत. जुन्या नोटांमधील रक्कम 25 हजाराच्या घरात आहे. एबीपी माझा वाहिनीने हे वृत्त दिले आहे. 

यंदा दगडूशेठ हलवाई गणपतीला साडेतीन कोटी रुपयांचे दान आले. मागच्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर रद्द झालेल्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा पुन्हा जमा करण्यासाठी एक मुदत दिली होती. ज्यांना ठरलेल्या मुदतीत ही रक्कम जमा करता आली नाही अशा भक्तांनी स्वत:कडे राहिलेल्या नोटा गणेशाच्या चरणी अर्पण केल्या आहेत. 

दोन दिवसांपूर्वी लालबागच्या राजासमोर ठेवण्यात आलेली दानपेटी उघडल्यानंतही असाच प्रकार समोर आला होता. लालबागचा राजा गणपतीच्या दानपेटीत चलनातून बाद करण्यात आलेल्या एक हजाराच्या ११० जुन्या नोटा सापडल्या. ज्या नोटांचं एकुण मुल्य १ लाख १० हजार इतकं आहे.

दानपेटीत तब्बल 5 कोटी 80 लाखांची रोकड25 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या गणेशोत्सवाच्या काळात, लालबागच्या राजाच्या दानपेटीत तब्बल 5 कोटी 80 लाखांची रोकड जमा झाली आहे. त्यापैकी 1 लाख 10 हजार जुन्या हजारांच्या नोटांच्या स्वरुपात आहेत.

गेल्या वर्षीपेक्षा कमी दानयंदा लालबागच्या दानपेटीत 5 कोटी 80 लाखांची रोकड जमा झाली असली, तरी ती गेल्या वर्षीपेक्षा कमी आहे. कारण गेल्यावर्षी ही रक्कम तब्बल 8 कोटी इतकी होती. यावर्षी 29 ऑगस्टला झालेल्या तुफान पावसामुळे भाविकांनी घरी राहणंच पसंत केलं होतं. त्यामुळे यंदा रोख रक्कम कमी जमा झाल्याचं सांगण्यात येत आहे. तसंच नोटाबंदीचाही परिणाम झाल्याचा अंदाज आहे.

5.8 कोटी रुपये, 5.5 किलो सोनं, 70 किलो चांदीलालबागच्या दरबारात भक्तांनी भरभरुन दान दिलं आहे. यामध्ये रोख रकमेसह तब्बल 5.5 किलो सोनं आणि 70 किलो चांदीचा समावेश आहे.

लालबागच्या राजाला अर्पण केलेल्या सोन्याच्या वीटेला मिळाली 31 लाख 25 हजारांची किंमतलालबागच्या राजाच्या दरबारातील अलंकारांचा लिलाव शनिवारी दहाच्या सुमारास संपला .एकूण 82 लहान-मोठ्या अंलकारांचा लिलाव करण्यात आला. लिलाव करण्यात आलेल्या अलंकारांचे एकूण मूल्य 98 लाख 48 हजार एवढे आहे. सोन्याच्या वीटेला सर्वाधिक म्हणजेच 31 लाख 25 हजारांची किंमत मिळाली तर सोन्याच्या गणेशमूर्तीला 14 लाख 50 हजार एवढी किमत मिळाल्याची माहिती सुधीर साळवी यांनी दिली. 

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव