मंदाताईंमुळे दारूबंदी आंदोलनाला बळ
By Admin | Updated: September 2, 2014 02:10 IST2014-09-02T02:10:40+5:302014-09-02T02:10:40+5:30
उत्पादन शुल्क विभाग व पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जिल्ह्यात दारूबंदीची सर्रास पायमल्ली होत आहे.

मंदाताईंमुळे दारूबंदी आंदोलनाला बळ
गडचिरोली : उत्पादन शुल्क विभाग व पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जिल्ह्यात दारूबंदीची सर्रास पायमल्ली होत आहे. दारूने अनेकांचे जीव घेतल्यानंतर आता गावागावातील महिलांनीच दारूबंदीसाठी पुढाकार घेतला आहे. दोन दिवसांपूर्वी ज्येष्ठ सामाजिक कार्यकत्र्या डॉ. मंदाकिनी आमटे यांनी शेकडो महिलांसह भामरागडसारख्या दुर्गम भागात दारूविक्रेत्यांवर धाडी घालून अवैध मद्यसाठा जप्त करण्यास पोलिसांना भाग पाडले. मंदाताईंचे हे आंदोलन गडचिरोलीसह चंद्रपूर जिल्ह्यातील कार्यकत्र्यासाठी प्रेरणादायी ठरले आहे.
महाराष्ट्रात वर्धा व गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी आहे. मात्र गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर चंद्रपूर, गोंदिया जिल्ह्याच्या हद्दीत 3क् ते 35 दारूदुकांनाचा वेढा पडला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील व्यापारी येथे राजरोसपणो माल पुरवितात. गडचिरोली जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात दुकाने थाटण्यासाठी नव्याने परवाने देण्यात येत आहेत. गडचिरोली जिल्ह्यात पोलीस प्रशासनावर नक्षलविरोधी मोहिमेची जबाबदारी असल्याने त्यांच्याकडून दारूबंदी मोहीम व्यापक प्रमाणावर राबविण्यात अडचणी आहेत. मात्र उत्पादन शुल्क विभाग कारवाईत मागे का, असा सवाल उपस्थित होत आहे. पोळ्याच्या दिवशी आरमोरी तालुक्याच्या वनखी गावात एका तरुणाचा विषारी दारूमुळे मृत्यू झाला.
भामरागड गावात पुन्हा खुलेआम दारू विक्री सुरू झाल्याने डॉ. मंदाकिनी आमटे यांच्यासह शेकडो महिलांनी गावातील दारूविक्रेत्यांवर धाड मारली आणि पोलिसांना साडेचार लाखांची दारू जप्त करण्यास भाग पाडले. मंदाताईंच्या दारूबंदीविषयक भूमिकेमुळे आंदोलक महिलांना बळ मिळाले आहे. (प्रतिनिधी)