शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

नियोजनाअभावी सांगली, कोल्हापूरमध्ये महापूर; जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2019 00:36 IST

नेरुळ येथे राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीत सरकारवर टीका

नवी मुंबई : सांगली आणि कोल्हापूर येथे आलेल्या महापुराचे कारण म्हणजे अलमट्टी धरण भरले आहे. धरणाचे दरवाजे उघडले तर कोयना धरणातून होणारा विसर्ग अलमट्टीकडे निघून जाईल, एवढे जर सरकारला कळत नसेल तर ही राज्यव्यवस्था सांभाळता कशाला? असा टोला आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारला लगावला आहे. गुरु वारी नेरुळ येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवी मुंबई कार्यकर्ता आढावा बैठकीत ते बोलत होते.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून आमदार संदीप नाईक यांनी पक्षांतर केल्यानंतर माजी मंत्री गणेश नाईकही पक्षांतर करणार असून त्यांच्यासोबत शहरातील अनेक नगरसेवक पक्षांतर करणार आहेत, त्यामुळे शहरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांनी कार्यकर्ता आढावा बैठकीचे आयोजन केले होते. या वेळी आव्हाड यांनी नाईक यांच्यावर निशाणा साधत टीका केली. सत्तेसाठी नेत्यांनी जरी पक्षांतर केले तरी कार्यकर्ते कोठेही जात नसल्याचे आव्हाड म्हणाले.नाईक यांच्याकडून अनेक वेळा अपमान झाला असून, पवारांसाठी मी खूप अपमान सहन केल्याचे त्यांनी सांगितले. नवी मुबई शहराचा कधी इतिहास लिहिला गेला तर वसंतराव नाईक आणि शरद पवार ही नावे पुढे येतील. नवी मुंबईतील नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा इतिहास जागे करण्याचे आवाहन त्यांनी केले. किल्लारी येथे झालेल्या भूकंप दुर्घटनेच्या वेळी राबविण्यात आलेल्या मदतकार्यात सर्व परिस्थिती शरद पवार यांनी हाताळली होती, त्यामुळे अशा परिस्थितीचा त्यांना मोठा अनुभव आहे. उत्तराखंडमध्ये आलेल्या प्रलयानंतर अटलबिहारी वाजपेयी यांनी पवार यांच्यावर डिगास्टर मॅनेजमेंट सांभाळण्याची जबाबदारी दिली होती. त्याचप्रमाणे सातारा, सांगली, कोल्हापूर येथील महापुरात अडकलेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी डिगास्टर मॅनेजमेंट सांभाळण्याची जबाबदारी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पवार यांच्याकडे द्यावी, असे आवाहन आव्हाड यांनी केले.शरद पवार यांनी आजवर अनेक नेते मोठे केले असून त्यांनी पक्षाला सोडल्यानंतरही कार्यकर्ता जागेवरच राहिला असल्याचे आमदार शशिकांत शिंदे यांनी सांगितले. महाराष्ट्रात पुढे जाण्यासाठी राष्ट्रवादीचे ताकदीचे नेते आणि पदाधिकारी फोडले जात आहेत, असे ते म्हणाले. गणेश नाईक यांनी राष्ट्रवादीतच राहण्याचे आवाहन त्यांनी केले. या आढावा बैठकीला राष्ट्रवादीचे नवी मुंबई निरीक्षक प्रशांत पाटील, काँग्रेसचे माजी नगरसेवक संतोष शेट्टी, राष्ट्रवादीचे नगरसेवक शंकर मोरे, नगरसेविका सपना गावडे, संगीता बोºहाडे, माजी नगरसेविका निर्मला गावडे, माजी नगरसेवक दिलीप बोºहाडे, विलास हुले, भालचंद्र नलावडे, भावना घाणेकर आदी मान्यवर आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.सत्तेसाठी नेत्यांनी जरी पक्षांतर केले तरी कार्यकर्ते कोठेही जात नसल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी आढावा बैठकीत स्पष्ट केले.

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरJitendra Awhadजितेंद्र आव्हाड