शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
3
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
4
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
5
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
6
विमान प्रवास स्वस्त होणार! इंधन भरण्याचा त्रास संपणार, पहिल्यांदाच 'या' तंत्रज्ञानाचा वापर करुन विमान उड्डाण करणार
7
IND vs ENG: ऋषभ पंतची दोन डावात दोन शतकं, पण ICC ने केली कारवाई, कारण काय?
8
इराणच्या हल्ल्यात प्रचंड वित्तहानी, आयरन डोमच्या मर्यादा उघड, युद्धातून इस्राइलला मिळाले हे पाच धडे 
9
Raigad Boat Capsizes: रायगडमध्ये सावित्री नदीत बोट उलटली; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर!
10
कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 
11
ड्रॅगनची वळवळ; पँगाँग सरोवराजवळ चीन नेमकं करतोय काय? सॅटेलाईट फोटोंमधून झाली पोलखोल  
12
Raipur Crime: रायपूरमध्ये 'नीळ्या ड्रम'सारखी घटना, सुटकेसमध्ये सिमेंट भरुन गोठवला तरुणाचा मृतदेह
13
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
14
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
15
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
16
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
17
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
18
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!
19
आठ महिन्यांत चौघांची हत्या; २० वर्षांच्या गँगस्टरचा एन्काऊंटरमध्ये खात्मा, VIDEO आला समोर
20
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल

नियोजनाअभावी सांगली, कोल्हापूरमध्ये महापूर; जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2019 00:36 IST

नेरुळ येथे राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीत सरकारवर टीका

नवी मुंबई : सांगली आणि कोल्हापूर येथे आलेल्या महापुराचे कारण म्हणजे अलमट्टी धरण भरले आहे. धरणाचे दरवाजे उघडले तर कोयना धरणातून होणारा विसर्ग अलमट्टीकडे निघून जाईल, एवढे जर सरकारला कळत नसेल तर ही राज्यव्यवस्था सांभाळता कशाला? असा टोला आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारला लगावला आहे. गुरु वारी नेरुळ येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवी मुंबई कार्यकर्ता आढावा बैठकीत ते बोलत होते.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून आमदार संदीप नाईक यांनी पक्षांतर केल्यानंतर माजी मंत्री गणेश नाईकही पक्षांतर करणार असून त्यांच्यासोबत शहरातील अनेक नगरसेवक पक्षांतर करणार आहेत, त्यामुळे शहरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांनी कार्यकर्ता आढावा बैठकीचे आयोजन केले होते. या वेळी आव्हाड यांनी नाईक यांच्यावर निशाणा साधत टीका केली. सत्तेसाठी नेत्यांनी जरी पक्षांतर केले तरी कार्यकर्ते कोठेही जात नसल्याचे आव्हाड म्हणाले.नाईक यांच्याकडून अनेक वेळा अपमान झाला असून, पवारांसाठी मी खूप अपमान सहन केल्याचे त्यांनी सांगितले. नवी मुबई शहराचा कधी इतिहास लिहिला गेला तर वसंतराव नाईक आणि शरद पवार ही नावे पुढे येतील. नवी मुंबईतील नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा इतिहास जागे करण्याचे आवाहन त्यांनी केले. किल्लारी येथे झालेल्या भूकंप दुर्घटनेच्या वेळी राबविण्यात आलेल्या मदतकार्यात सर्व परिस्थिती शरद पवार यांनी हाताळली होती, त्यामुळे अशा परिस्थितीचा त्यांना मोठा अनुभव आहे. उत्तराखंडमध्ये आलेल्या प्रलयानंतर अटलबिहारी वाजपेयी यांनी पवार यांच्यावर डिगास्टर मॅनेजमेंट सांभाळण्याची जबाबदारी दिली होती. त्याचप्रमाणे सातारा, सांगली, कोल्हापूर येथील महापुरात अडकलेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी डिगास्टर मॅनेजमेंट सांभाळण्याची जबाबदारी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पवार यांच्याकडे द्यावी, असे आवाहन आव्हाड यांनी केले.शरद पवार यांनी आजवर अनेक नेते मोठे केले असून त्यांनी पक्षाला सोडल्यानंतरही कार्यकर्ता जागेवरच राहिला असल्याचे आमदार शशिकांत शिंदे यांनी सांगितले. महाराष्ट्रात पुढे जाण्यासाठी राष्ट्रवादीचे ताकदीचे नेते आणि पदाधिकारी फोडले जात आहेत, असे ते म्हणाले. गणेश नाईक यांनी राष्ट्रवादीतच राहण्याचे आवाहन त्यांनी केले. या आढावा बैठकीला राष्ट्रवादीचे नवी मुंबई निरीक्षक प्रशांत पाटील, काँग्रेसचे माजी नगरसेवक संतोष शेट्टी, राष्ट्रवादीचे नगरसेवक शंकर मोरे, नगरसेविका सपना गावडे, संगीता बोºहाडे, माजी नगरसेविका निर्मला गावडे, माजी नगरसेवक दिलीप बोºहाडे, विलास हुले, भालचंद्र नलावडे, भावना घाणेकर आदी मान्यवर आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.सत्तेसाठी नेत्यांनी जरी पक्षांतर केले तरी कार्यकर्ते कोठेही जात नसल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी आढावा बैठकीत स्पष्ट केले.

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरJitendra Awhadजितेंद्र आव्हाड