शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
5
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
6
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
7
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
8
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
9
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
10
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
11
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
12
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
13
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
14
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
15
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
16
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
17
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
18
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
19
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
20
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!

नियोजनाअभावी सांगली, कोल्हापूरमध्ये महापूर; जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2019 00:36 IST

नेरुळ येथे राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीत सरकारवर टीका

नवी मुंबई : सांगली आणि कोल्हापूर येथे आलेल्या महापुराचे कारण म्हणजे अलमट्टी धरण भरले आहे. धरणाचे दरवाजे उघडले तर कोयना धरणातून होणारा विसर्ग अलमट्टीकडे निघून जाईल, एवढे जर सरकारला कळत नसेल तर ही राज्यव्यवस्था सांभाळता कशाला? असा टोला आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारला लगावला आहे. गुरु वारी नेरुळ येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवी मुंबई कार्यकर्ता आढावा बैठकीत ते बोलत होते.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून आमदार संदीप नाईक यांनी पक्षांतर केल्यानंतर माजी मंत्री गणेश नाईकही पक्षांतर करणार असून त्यांच्यासोबत शहरातील अनेक नगरसेवक पक्षांतर करणार आहेत, त्यामुळे शहरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांनी कार्यकर्ता आढावा बैठकीचे आयोजन केले होते. या वेळी आव्हाड यांनी नाईक यांच्यावर निशाणा साधत टीका केली. सत्तेसाठी नेत्यांनी जरी पक्षांतर केले तरी कार्यकर्ते कोठेही जात नसल्याचे आव्हाड म्हणाले.नाईक यांच्याकडून अनेक वेळा अपमान झाला असून, पवारांसाठी मी खूप अपमान सहन केल्याचे त्यांनी सांगितले. नवी मुबई शहराचा कधी इतिहास लिहिला गेला तर वसंतराव नाईक आणि शरद पवार ही नावे पुढे येतील. नवी मुंबईतील नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा इतिहास जागे करण्याचे आवाहन त्यांनी केले. किल्लारी येथे झालेल्या भूकंप दुर्घटनेच्या वेळी राबविण्यात आलेल्या मदतकार्यात सर्व परिस्थिती शरद पवार यांनी हाताळली होती, त्यामुळे अशा परिस्थितीचा त्यांना मोठा अनुभव आहे. उत्तराखंडमध्ये आलेल्या प्रलयानंतर अटलबिहारी वाजपेयी यांनी पवार यांच्यावर डिगास्टर मॅनेजमेंट सांभाळण्याची जबाबदारी दिली होती. त्याचप्रमाणे सातारा, सांगली, कोल्हापूर येथील महापुरात अडकलेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी डिगास्टर मॅनेजमेंट सांभाळण्याची जबाबदारी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पवार यांच्याकडे द्यावी, असे आवाहन आव्हाड यांनी केले.शरद पवार यांनी आजवर अनेक नेते मोठे केले असून त्यांनी पक्षाला सोडल्यानंतरही कार्यकर्ता जागेवरच राहिला असल्याचे आमदार शशिकांत शिंदे यांनी सांगितले. महाराष्ट्रात पुढे जाण्यासाठी राष्ट्रवादीचे ताकदीचे नेते आणि पदाधिकारी फोडले जात आहेत, असे ते म्हणाले. गणेश नाईक यांनी राष्ट्रवादीतच राहण्याचे आवाहन त्यांनी केले. या आढावा बैठकीला राष्ट्रवादीचे नवी मुंबई निरीक्षक प्रशांत पाटील, काँग्रेसचे माजी नगरसेवक संतोष शेट्टी, राष्ट्रवादीचे नगरसेवक शंकर मोरे, नगरसेविका सपना गावडे, संगीता बोºहाडे, माजी नगरसेविका निर्मला गावडे, माजी नगरसेवक दिलीप बोºहाडे, विलास हुले, भालचंद्र नलावडे, भावना घाणेकर आदी मान्यवर आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.सत्तेसाठी नेत्यांनी जरी पक्षांतर केले तरी कार्यकर्ते कोठेही जात नसल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी आढावा बैठकीत स्पष्ट केले.

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरJitendra Awhadजितेंद्र आव्हाड