शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

पालघरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरजन्य परिस्थिती, वाहून गेलेल्या 5 जणांपैकी तिघांचे सापडले मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2017 14:26 IST

पालघर जिल्ह्यात मंगळवारपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. यामुळे काही ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान पुरामध्ये वाहून गेलेल्या 5 जणांपैकी 3 जणांचे मृतदेह हाती लागल्याची माहिती समोर आली आहे. तर दोन जण अजूनही बेपत्ता आहेत.  

पालघर, दि. 30 - पालघर जिल्ह्यात मंगळवारपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. यामुळे काही ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान पुरामध्ये वाहून गेलेल्या 5 जणांपैकी 3 जणांचे मृतदेह हाती लागल्याची माहिती समोर आली आहे. तर दोन जण अजूनही बेपत्ता आहेत.  मृत व्यक्तींचं नावं 1. तनिष्का राम बालशी (वय 5 वर्ष), पालघर2. नैना  गहला (वय 50 वर्ष)  3. राजेश नायर, बोईसरतनिष्का राम बालशी ही पाच वर्षांची मुलगी पालघरमीधल वेवूर येथील रहिवासी होती. नैना गहला (50 वर्ष) या डहाणूतील आंबेसरी येथील रहिवासी होत्या. तर राजेश नायर हे बोईसर येथील राहणारे होते. 

बेपत्ता व्यक्तींची नावं1. सुरोत्तम झा ( वय 25 वर्ष, नवली पालघर)2. नरु वळवी ( वय 45 वर्ष,  डहाणू) 

विक्रोळीत इमारत कोसळून एकाचा तर दरड कोसळल्याने दोघांचा मृत्यूदरम्यान, मंगळवारी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसाचा फटका अनेकांना बसला असून विक्रोळीत इमारत कोसळल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. विक्रोळीच्या वर्षानगर भागातील ही इमारत आहे. दोन मजली इमारत कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दुसरीकडे विक्रोळीत दरडही कोसळली असून दोघांचा मृत्यू झाला आहे. विक्रोळीमधील सूर्यानगर येथे ही दरड कोसळली आहे .  दरम्यान, आज बुधवारीही (30 ऑगस्ट) पावसाचा जोर कायम राहील, असा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे. अनेक सखल भागात अद्यापही पाणी तुंबलेले आहे. जेथे अशी धोकादायक ठिकाणे आहेत, तेथे एनडीआरएफचे जवान लोकांच्या मदतीसाठी तैनात करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

घराबाहेर न पडण्याचं आवाहन

येत्या २४ तासांत मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे जिल्हा येथे मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. नागरिकांनी महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये तसेच मच्छीमार बांधवांनीही समुद्रात जाऊ नये, असे आवाहन मंत्रालय, नियंत्रण कक्षाकडून करण्यात आले आहे. एकंदरीतच मंगळवारी मुंबईकरांना झोडपून काढलेला पाऊस बुधवारीही मुंबईकरांना धडकीच भरविणार असल्याचे चित्र असून नेहमी धावणारी मुंबई संथगतीने सुरु आहे.

मुसळधार पावसामुळे कोलमडलेली मुंबई आता हळूहळू पुर्वपदावर येऊ लागली आहे. मात्र मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेकांना घरी पोहोचताच आलं नाही. पाऊस रौद्र रुप धारण करत असल्याचं लक्षात येताच अनेकांनी ऑफिसमधून लवकर घरी जाणं पसंद केलं. मात्र पाऊस इतका मुसळधार सुरु होता की, स्टेशनला पोहोचल्यानंतर रेल्वे ठप्प असल्याने तिथेच रात्र घालवावी लागली. या पावसामध्ये मुंबईकरांचं पोट भरणारे डबेवालेही अडकून पडले होते. दोन वेळचं जेवण मिळावं म्हणून धावणा-या मुंबईकराचं पोट भरण्याचं काम करणा-या डबेवाल्यांना संपुर्ण रात्र लोकल ट्रेनमध्येच घालवावी लागली. त्यामुळे आज डबेवाल्यांनी आपली सेवा बंद ठेवली आहे.