चार वेळा मृत्यूला हुलकावणी
By Admin | Updated: June 4, 2014 01:18 IST2014-06-04T01:18:52+5:302014-06-04T01:18:52+5:30
काळाला बहुदा अपघातातच गोपीनाथराव मुंडे यांची शिकार करायची होती. या आधी चारवेळा मुंडे यांनी मृत्युला हुलकावणी दिली आहे. मात्र, अखेर काळाने दिल्लीत त्यांना गाठले.

चार वेळा मृत्यूला हुलकावणी
>मनाला चटका लावला : मुंबई, सातारा, परभणी, बुलडाण्यातील आठवणी
मुंबई : काळाला बहुदा अपघातातच गोपीनाथराव मुंडे यांची शिकार करायची होती. या आधी चारवेळा मुंडे यांनी मृत्युला हुलकावणी दिली आहे. मात्र, अखेर काळाने दिल्लीत त्यांना गाठले.
1क् डिसेंबर 1998 साली विमान दुर्घटनेतून बालंबाल बचावले होते. त्यावेळी गोपीनाथराव महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते. सातारा जिल्ह्यात विमानाने एक दिवसाच्या दौ:यावर निघाले होते. त्यांच्यासोबत भाजपाचे प्रकाश जावडेकर, स्वीय सहाय्यक माणिक मुंडे, बॉडीगार्ड सुरेंद्र जयस्वाल असे पाच जण होते. राज्य शासनाच्या मालकीचे अॅव्हेरो विमान होते. मुंबई सांताक्रुझ विमानतळावरून विमानाने आकाशात ङोप घेतली. विमान 5क् नॉटीकल (हवाई मैल) उंचीवर असताना हवेच्या दाबाने स्फोटासारखा आवाज होऊन खिडकीची काच फुटली आणि विमान भरकटले. हेलकावे खात ते तीन हजार फूट उंचीर्पयत खाली आले. कोणत्याही क्षणी काहीही घडू शकले असते. पण वैमानिक दिनशॉ यांनी परत सांताक्रुझ विमानतळावर सुखरुप उतरवले. सर्वजण सुरक्षित होते.
1 आक्टोबर 2क्क्4 रोजी गोपीनाथराव हेलिकॉप्टर दुर्घटनेतून बचावले होते. निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू होती. मुंडे यांची चिखली आणि बुलडाण्यात सभा होती आणि ते हेलिकॉप्टरने निघाले होते. हवामान स्वच्छ होते. यावेळी त्यांच्या सोबत जावई अमित पालवे आणि दूरचित्रवाणीचे पत्रकार व कॅमेरामन होते. हेलिकॉप्टर दहा हजार फुट उंचीवर असताना ते वादळी पावसात सापडले. वातावरणामुळे हेलिकॉप्टरचा केंद्राशी असलेला संपर्क तुटला. खाली उतरण्याची सोय नाही? धोधो पाऊस पडतोय पण; अशाही परिस्थितीत पायलटने प्रसंगावधान दावखत एका शेतात हेलिकॉप्टर सुखरुप उतरवले. इकडे लोक सभेसाठी त्यांची वाट पाहात होते. तेही विसरले नव्हते. खाली उतरताच चिखल तुडवत ते हमरस्त्यावर आले. एक ट्रक अडवला आणि चिखली गाठली. जणू काहीच घडले नाही अशा थाटात जोरदार भाषण केले. सभा जिंकली. तोर्पयत हेलिकॉटर भरकटल्याचे, ते अपघातातून बालंबाल बचावल्या वृत्त सर्वत्र वा:यासारखे पसरले होते. सभेला आलेल्या श्रोत्यांनाही ते कळले होते. त्यांनी नेता असावा तर असा अशा भावना व्यक्त करत दाद दिली.
कार अपघातातूनही गोपीनाथ मुंडे एकदा बचावले होते. 30 डिसेंबर 2006 ची ही घटना आहे. बीड जिल्ह्यातलाच एक कार्यक्रम आटोपून ते कारने परळीकडे परतत होते. एका मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात त्यांची कार झाडावर आदळली. याही वेळी आयुष्याची दोरी बळकट ठरली.
परभणी येथे एका कार्यक्रमात स्टेज कोसळल्याने मुंडे जखमी झाले होते. ही घटना 4 फेब्रुवारी 2004 रोजी घडली होती.
कार अपघातातूनही गोपीनाथ मुंडे एकदा बचावले होते. 30 डिसेंबर 2006 ची ही घटना आहे. बीड जिल्ह्यातलाच एक कार्यक्रम आटोपून ते कारने परळीकडे परतत होते. एका मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात त्यांची कार झाडावर आदळली. याही वेळी आयुष्याची दोरी बळकट ठरली. परभणी येथे एका कार्यक्रमात स्टेज कोसळल्याने मुंडे जखमी झाले होते. ही घटना 4 फेब्रुवारी 2004 रोजी घडली होती.