शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

गोरे बंधूंच्या प्रवेशामुळे माण-खटावमध्ये पेच; युती तुटल्यास 'डायरेक्ट फाईट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2019 12:22 IST

शिवसेना-भाजप युती तुटल्यास, जयकुमार गोरे-शेखर गोरे यांच्यातच लढत रंगणार आहे. या मतदार संघातून जयकुमार गोरे यांना सर्वच आघाड्यांवर टक्कर देण्यास शेखर गोरे यांच्या व्यतिरिक्त दुसरा नेता नाही. त्यामुळे ही लढत लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर सातारा जिल्ह्यात पिछेहाट झालेल्या काँग्रेसच्या उदयाला आता कुठं सुरुवात झाली होती. परंतु, जिल्ह्यातील काँग्रेसचे मान-खटाव मतदार संघातील आमदार जयकुमार गोरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे काँग्रेसला धक्का बसला आहे. तर राष्ट्रवादीसमोरच्या अडचणीही वाढण्याची शक्यता आहे. जयकुमार गोरे यांच्यामुळे राष्ट्रवादीची जिल्ह्यातील सत्तास्थाने धोक्यात येण्याची शक्यता आहेच. शिवाय जयकुमार गोरेंच्या प्रवेशामुळे युतीतही पेच निर्माण होणार आहे.

जयकुमार गोरे यांच्या भाजपप्रवेशामुळे युतीसमोरचा पेच वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे शेखर गोरे यांनी आधीच शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे हा मतदारसंघ गोरे बंधुंपैकी कोणाला मिळणार हे गुलदस्त्यात आहे. दुसरीकडे भाजपच्या सातारा जिल्ह्यातील विस्तारासाठी जयकुमार गोरे हुकमी एक्का ठरू शकतात. साताऱ्यातून राष्ट्रवादी हद्दपार करण्यासाठी गोरेंशिवाय दुसरा नेता नाही. तर शिवसेनेने शेखर गोरेंसाठी फिल्डींग लावण्यास सुरुवात केली आहे.

शिवसेना-भाजपमध्ये युती होणार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रत्येक सभेत सांगत आहेत. अशा स्थितीत, मान-खटाव मतदारसंघ कोणाला द्यायचा हा प्रश्न उपस्थित होणार आहे. मतदारसंघात जयकुमार गोरे यांनी वर्चस्व निर्माण केले आहे. त्यांनी भाजप प्रवेशाला पक्षातून विरोध होत होता. परंतु, केंद्रीयमंत्र्यांच्या उपस्थित प्रवेश होत असल्याने पक्षातील विरोध मावळला. तर गोरेंनी देखील भाजप प्रवेशापूर्वी जिहे-कठापूर योजनेत माण तालुक्यातील दुष्काळी गावांचा सामावेश करून घेत टायमिंग साधले. त्यामुळे गोरे यांचे मतदारसंघातील वजन आणखी वाढले आहे.

दरम्यान शिवसेना-भाजप युती तुटल्यास, जयकुमार गोरे-शेखर गोरे यांच्यातच लढत रंगणार आहे. या मतदार संघातून जयकुमार गोरे यांना सर्वच आघाड्यांवर टक्कर देण्यास शेखर गोरे यांच्या व्यतिरिक्त दुसरा नेता नाही. त्यामुळे ही लढत लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे. यात जयकुमार गोरे विजयी झाल्यास, भाजपला राष्ट्रवादीचे वर्चस्व कमी करून साताऱ्यात पक्षविस्तार करणे सोपं होणार आहे.