शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

गोरे बंधूंच्या प्रवेशामुळे माण-खटावमध्ये पेच; युती तुटल्यास 'डायरेक्ट फाईट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2019 12:22 IST

शिवसेना-भाजप युती तुटल्यास, जयकुमार गोरे-शेखर गोरे यांच्यातच लढत रंगणार आहे. या मतदार संघातून जयकुमार गोरे यांना सर्वच आघाड्यांवर टक्कर देण्यास शेखर गोरे यांच्या व्यतिरिक्त दुसरा नेता नाही. त्यामुळे ही लढत लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर सातारा जिल्ह्यात पिछेहाट झालेल्या काँग्रेसच्या उदयाला आता कुठं सुरुवात झाली होती. परंतु, जिल्ह्यातील काँग्रेसचे मान-खटाव मतदार संघातील आमदार जयकुमार गोरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे काँग्रेसला धक्का बसला आहे. तर राष्ट्रवादीसमोरच्या अडचणीही वाढण्याची शक्यता आहे. जयकुमार गोरे यांच्यामुळे राष्ट्रवादीची जिल्ह्यातील सत्तास्थाने धोक्यात येण्याची शक्यता आहेच. शिवाय जयकुमार गोरेंच्या प्रवेशामुळे युतीतही पेच निर्माण होणार आहे.

जयकुमार गोरे यांच्या भाजपप्रवेशामुळे युतीसमोरचा पेच वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे शेखर गोरे यांनी आधीच शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे हा मतदारसंघ गोरे बंधुंपैकी कोणाला मिळणार हे गुलदस्त्यात आहे. दुसरीकडे भाजपच्या सातारा जिल्ह्यातील विस्तारासाठी जयकुमार गोरे हुकमी एक्का ठरू शकतात. साताऱ्यातून राष्ट्रवादी हद्दपार करण्यासाठी गोरेंशिवाय दुसरा नेता नाही. तर शिवसेनेने शेखर गोरेंसाठी फिल्डींग लावण्यास सुरुवात केली आहे.

शिवसेना-भाजपमध्ये युती होणार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रत्येक सभेत सांगत आहेत. अशा स्थितीत, मान-खटाव मतदारसंघ कोणाला द्यायचा हा प्रश्न उपस्थित होणार आहे. मतदारसंघात जयकुमार गोरे यांनी वर्चस्व निर्माण केले आहे. त्यांनी भाजप प्रवेशाला पक्षातून विरोध होत होता. परंतु, केंद्रीयमंत्र्यांच्या उपस्थित प्रवेश होत असल्याने पक्षातील विरोध मावळला. तर गोरेंनी देखील भाजप प्रवेशापूर्वी जिहे-कठापूर योजनेत माण तालुक्यातील दुष्काळी गावांचा सामावेश करून घेत टायमिंग साधले. त्यामुळे गोरे यांचे मतदारसंघातील वजन आणखी वाढले आहे.

दरम्यान शिवसेना-भाजप युती तुटल्यास, जयकुमार गोरे-शेखर गोरे यांच्यातच लढत रंगणार आहे. या मतदार संघातून जयकुमार गोरे यांना सर्वच आघाड्यांवर टक्कर देण्यास शेखर गोरे यांच्या व्यतिरिक्त दुसरा नेता नाही. त्यामुळे ही लढत लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे. यात जयकुमार गोरे विजयी झाल्यास, भाजपला राष्ट्रवादीचे वर्चस्व कमी करून साताऱ्यात पक्षविस्तार करणे सोपं होणार आहे.