शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

गोरे बंधूंच्या प्रवेशामुळे माण-खटावमध्ये पेच; युती तुटल्यास 'डायरेक्ट फाईट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2019 12:22 IST

शिवसेना-भाजप युती तुटल्यास, जयकुमार गोरे-शेखर गोरे यांच्यातच लढत रंगणार आहे. या मतदार संघातून जयकुमार गोरे यांना सर्वच आघाड्यांवर टक्कर देण्यास शेखर गोरे यांच्या व्यतिरिक्त दुसरा नेता नाही. त्यामुळे ही लढत लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर सातारा जिल्ह्यात पिछेहाट झालेल्या काँग्रेसच्या उदयाला आता कुठं सुरुवात झाली होती. परंतु, जिल्ह्यातील काँग्रेसचे मान-खटाव मतदार संघातील आमदार जयकुमार गोरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे काँग्रेसला धक्का बसला आहे. तर राष्ट्रवादीसमोरच्या अडचणीही वाढण्याची शक्यता आहे. जयकुमार गोरे यांच्यामुळे राष्ट्रवादीची जिल्ह्यातील सत्तास्थाने धोक्यात येण्याची शक्यता आहेच. शिवाय जयकुमार गोरेंच्या प्रवेशामुळे युतीतही पेच निर्माण होणार आहे.

जयकुमार गोरे यांच्या भाजपप्रवेशामुळे युतीसमोरचा पेच वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे शेखर गोरे यांनी आधीच शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे हा मतदारसंघ गोरे बंधुंपैकी कोणाला मिळणार हे गुलदस्त्यात आहे. दुसरीकडे भाजपच्या सातारा जिल्ह्यातील विस्तारासाठी जयकुमार गोरे हुकमी एक्का ठरू शकतात. साताऱ्यातून राष्ट्रवादी हद्दपार करण्यासाठी गोरेंशिवाय दुसरा नेता नाही. तर शिवसेनेने शेखर गोरेंसाठी फिल्डींग लावण्यास सुरुवात केली आहे.

शिवसेना-भाजपमध्ये युती होणार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रत्येक सभेत सांगत आहेत. अशा स्थितीत, मान-खटाव मतदारसंघ कोणाला द्यायचा हा प्रश्न उपस्थित होणार आहे. मतदारसंघात जयकुमार गोरे यांनी वर्चस्व निर्माण केले आहे. त्यांनी भाजप प्रवेशाला पक्षातून विरोध होत होता. परंतु, केंद्रीयमंत्र्यांच्या उपस्थित प्रवेश होत असल्याने पक्षातील विरोध मावळला. तर गोरेंनी देखील भाजप प्रवेशापूर्वी जिहे-कठापूर योजनेत माण तालुक्यातील दुष्काळी गावांचा सामावेश करून घेत टायमिंग साधले. त्यामुळे गोरे यांचे मतदारसंघातील वजन आणखी वाढले आहे.

दरम्यान शिवसेना-भाजप युती तुटल्यास, जयकुमार गोरे-शेखर गोरे यांच्यातच लढत रंगणार आहे. या मतदार संघातून जयकुमार गोरे यांना सर्वच आघाड्यांवर टक्कर देण्यास शेखर गोरे यांच्या व्यतिरिक्त दुसरा नेता नाही. त्यामुळे ही लढत लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे. यात जयकुमार गोरे विजयी झाल्यास, भाजपला राष्ट्रवादीचे वर्चस्व कमी करून साताऱ्यात पक्षविस्तार करणे सोपं होणार आहे.