ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून शिवपूरला दंगल
By Admin | Updated: August 27, 2016 18:25 IST2016-08-27T18:25:03+5:302016-08-27T18:25:22+5:30
ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर नंदुरबार येथे दंगल उसळली असून त्यात दोनजण जखमी झाले आहेत

ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून शिवपूरला दंगल
>- ऑनलाइन लोकमत
नंदुरबार, दि. 27 - ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर आता वादविवाद आणि आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. त्याच वादातून शिवपूर, ता.नंदुरबार येथे दंगल उसळली. त्यात दोनजण जखमी झाले आहेत.
सरलाबाई दिपक वळवी याच्या फिर्यादीनुसार, निवडणूक निकालानंतर फटाके फोडल्याचा राग विशाल जसवंत वळवी व त्यांच्या गटाला आला. त्यामुळे त्यांनी जमाव जमवून मारहाण केली. त्यात स्वत: सरलाबाई या जखमी झाल्या. त्यांच्या फिर्यादीवरून विशाल जसवंत वळवी, जसवंत दिवाणजी वळवी, अमोल मालसिंग वळवी, अल्पेश प्रकाश वळवी, स्वप्निल प्रकाश वळवी, मधुकर दिनकर वळवी, विनोद मालसिंग वळवी, अजित अमोल वळवी, नितेश अर्जून वळवी, मुकेश अर्जून वळवी, बहादुरसिंग मालसिंग वळवी सर्व रा.शिवपूर यांच्याविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी फिर्याद अमोल मालसिंग वळवी यांनी दिली. दिपक हरसिंग वळवी यांची पत्नी निवडणुकीत पराभूत झाली. त्याचा वचपा काढण्यासाठी दिपक वळवी यांनी जमाव जमवून अमोल वळवी व इतरांना बेदम मारहाण केली. दिपक हुरसिंग वळवी, सरलाबाई दिपक वळवी, सायलीबाई संजय ठाकरे, संजय गुलाब ठाकरे, हुरसिंग मालजी वळवी सर्व रा.शिवपूर यांच्याविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.