शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019:निवडणुकीच्या रणधुमाळीत दुष्काळ दुर्लक्षित

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 14:28 IST

नेते मराठवाड्यातील परिस्थितीवर बोलताना दिसत नाही.

मुंबई - विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या असून, उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुद्धा सुरु झाली आहे. तर निवडणूकीत विविध मुद्यांवरून सत्ताधारी पक्ष व विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतांना पाहायला मिळत आहे. मात्र याच निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्यातील विविध भागात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीकडे  दुर्लक्ष केले जात असल्याचे पाहायला मिळत आहे.

सर्वच मतदारसंघात भावी आमदार गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. तर मतदारसंघात राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली असून, गावभेटी आणि प्रचार सुद्धा सुरु झाला आहे. मात्र अशात राज्यातील दुष्काळाग्रस्त भागातील प्रश्नांकडे लक्ष देतांना कुणीच दिसत नाही. महत्वाच्या नेत्यांची एकमेकांवर आरोप होत आहे. मात्र हेच नेते मराठवाड्यातील परिस्थितीवर बोलताना दिसत नाही.

मध्य महाराष्ट्रात धो धो बरसलेल्या मान्सूनची वक्रदृष्टी मराठवाड्यावर कायम राहिली असून, सरासरीपेक्षा ११ टक्के पाऊस कमी झाला आहे़. राज्यातील सरासरीच्या ३३ टक्के जादा पावसाची नोंद झाली असली, तरी १० जिल्ह्यात सरासरीएवढाही पाऊस झालेला नाही. मराठवाड्यातील औरंगाबाद आणि नांदेड वगळता अन्य सर्व ६ जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे़. बीडमध्ये २७ टक्के, लातूरमध्ये २१ टक्के, हिंगोलीत १७ टक्के कमी पाऊस झाला आहे. अशा परिस्थिती मदतीची अपेक्षा असलेल्या दुष्काळग्रस्तांकडे पाहण्यासाठी राजकीय नेत्यांना वेळ मिळत नसल्याचे दिसत आहे.

जालना जिल्ह्यातील अनेक भागात हवा तसा पाऊस झाला नाही. त्यामुळे आमच्या सारखे शेतकरी अडचणीत सापडला आहे. सरकारकडून मदतीची अपेक्षा असताना निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे सत्तधारी किंवा विरोधक सर्वच राजकीय नेते निवडणुकीत व्यस्त असल्याचे दिसत असून, आमच्या मदतीला कुणीच येत नाही. योगेश मोरे ( शेतकरी जालना )