शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळग्रस्त अकोले आता झाले पाणीदार!

By admin | Updated: March 1, 2017 00:50 IST

जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून बांधलेल्या सिमेंट तलावात पाणी सोडल्याने गाव पाणीदार झाले आहे.

विजय गायकवाड,अकोले- दुष्काळात अकोले गावाची पाण्याची तहान मिटविण्यासाठी जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून बांधलेल्या सिमेंट तलावात पाणी सोडल्याने गाव पाणीदार झाले आहे. इंदापूर तालुक्यात दुष्काळाच्या अवर्षण क्षेत्रात येणाऱ्या अकोले गावाची ओळख दुष्काळग्रस्त म्हणूनच केली जाते. मात्र, राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेमुळे आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने गावातील पाण्याची खालावलेली पातळी वाढवण्यासाठी दलित वस्ती येथे सिमेंट बंधारा बांधण्यात आला आहे. त्यात खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली गावकऱ्यांच्या मागणीनुसार पिण्यासाठी पाणी सोडण्यात आले आहे. या सोडलेल्या पाण्याचे आज ग्रामस्थांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. चौदा लाख रुपये खर्च करून वीस मीटर रुंद आणि तीनशे मीटर लांबीच्या बांधलेल्या या बंधाऱ्यात आठ सहस्र दशलक्ष घनमीटर पाणी साठले आहे. यामुळे गावातील लोकांसाठी असणाऱ्या बोअरवेल, विहिरी, हातपंप यातील पाण्याची पातळी वाढून ऐन दुष्काळात पाण्याची समस्या मिटण्यास चांगल्या प्रकारे मदत होणार आहे. यामुळे आजूबाजूचा परिसर हिरवागार होणार आहे. दरवर्षी खडकवासला कालव्याचे येणारे आवर्तन वितरिकांद्वारे गावाला देण्यात येत असायचे. मात्र वितरिकांचे पाणी संपून गेल्यावर गावातील लोकांना पाण्याची टंचाई लगेच निर्माण होत असे. मात्र, कृषी विभाग, अकोले ग्रामपंचायत आणि पाटबंधारे खाते यांच्या सहकार्याने आज या सिमेंट बंधाऱ्यात पाणी सोडून बंधरा तुडुंब भरला आहे. त्या पाण्याचे महिलांच्या हस्ते पुष्प अर्पण करून पूजन करण्यात आले. या वेळी सरपंच सुनीता वणवे म्हणाल्या, या बंधाऱ्यात सोडलेल्या पाण्यामुळे गावाच्या आजूबाजूच्या भूजल पातळीत वाढ होऊन हातपंप आणि विहिरींना पाण्याची वाढ होणार आहे. याप्रसंगी सरपंच सुनीता वणवे, उपसरपंच वसंतराव शिंदे, पांडुरंग पाटील व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी खडकवासला पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता बी.डी. ढोले, पी.डी. शिंदे, आर.एल. भोंग , कर्मचारी बाबा कांबळे यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)पाण्याने भरलेल्या बंधाऱ्यामुळे गावातील लोकांना पाण्यासाठी महत्त्वाचे स्रोत असणारे आरोग्य केंद्राजवळ आणि अंकलेश्वर मंदिर येथील हातपंपांची पाण्याची पातळी वाढणार आहे. ऐन उन्हाळ्यात पाण्याची गरज भागणार आहे. या सर्वांच्या सहकार्याने गावकऱ्यांची पाण्याची होणारी वणवण थांबण्यास मदत होणार आहे.