शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
2
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
3
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
4
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
5
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
6
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
7
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
9
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
10
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
11
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
12
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
13
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
14
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
15
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
16
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
17
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
18
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
19
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

दुष्काळग्रस्त अकोले आता झाले पाणीदार!

By admin | Updated: March 1, 2017 00:50 IST

जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून बांधलेल्या सिमेंट तलावात पाणी सोडल्याने गाव पाणीदार झाले आहे.

विजय गायकवाड,अकोले- दुष्काळात अकोले गावाची पाण्याची तहान मिटविण्यासाठी जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून बांधलेल्या सिमेंट तलावात पाणी सोडल्याने गाव पाणीदार झाले आहे. इंदापूर तालुक्यात दुष्काळाच्या अवर्षण क्षेत्रात येणाऱ्या अकोले गावाची ओळख दुष्काळग्रस्त म्हणूनच केली जाते. मात्र, राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेमुळे आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने गावातील पाण्याची खालावलेली पातळी वाढवण्यासाठी दलित वस्ती येथे सिमेंट बंधारा बांधण्यात आला आहे. त्यात खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली गावकऱ्यांच्या मागणीनुसार पिण्यासाठी पाणी सोडण्यात आले आहे. या सोडलेल्या पाण्याचे आज ग्रामस्थांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. चौदा लाख रुपये खर्च करून वीस मीटर रुंद आणि तीनशे मीटर लांबीच्या बांधलेल्या या बंधाऱ्यात आठ सहस्र दशलक्ष घनमीटर पाणी साठले आहे. यामुळे गावातील लोकांसाठी असणाऱ्या बोअरवेल, विहिरी, हातपंप यातील पाण्याची पातळी वाढून ऐन दुष्काळात पाण्याची समस्या मिटण्यास चांगल्या प्रकारे मदत होणार आहे. यामुळे आजूबाजूचा परिसर हिरवागार होणार आहे. दरवर्षी खडकवासला कालव्याचे येणारे आवर्तन वितरिकांद्वारे गावाला देण्यात येत असायचे. मात्र वितरिकांचे पाणी संपून गेल्यावर गावातील लोकांना पाण्याची टंचाई लगेच निर्माण होत असे. मात्र, कृषी विभाग, अकोले ग्रामपंचायत आणि पाटबंधारे खाते यांच्या सहकार्याने आज या सिमेंट बंधाऱ्यात पाणी सोडून बंधरा तुडुंब भरला आहे. त्या पाण्याचे महिलांच्या हस्ते पुष्प अर्पण करून पूजन करण्यात आले. या वेळी सरपंच सुनीता वणवे म्हणाल्या, या बंधाऱ्यात सोडलेल्या पाण्यामुळे गावाच्या आजूबाजूच्या भूजल पातळीत वाढ होऊन हातपंप आणि विहिरींना पाण्याची वाढ होणार आहे. याप्रसंगी सरपंच सुनीता वणवे, उपसरपंच वसंतराव शिंदे, पांडुरंग पाटील व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी खडकवासला पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता बी.डी. ढोले, पी.डी. शिंदे, आर.एल. भोंग , कर्मचारी बाबा कांबळे यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)पाण्याने भरलेल्या बंधाऱ्यामुळे गावातील लोकांना पाण्यासाठी महत्त्वाचे स्रोत असणारे आरोग्य केंद्राजवळ आणि अंकलेश्वर मंदिर येथील हातपंपांची पाण्याची पातळी वाढणार आहे. ऐन उन्हाळ्यात पाण्याची गरज भागणार आहे. या सर्वांच्या सहकार्याने गावकऱ्यांची पाण्याची होणारी वणवण थांबण्यास मदत होणार आहे.