शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

दुष्काळग्रस्त अकोले आता झाले पाणीदार!

By admin | Updated: March 1, 2017 00:50 IST

जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून बांधलेल्या सिमेंट तलावात पाणी सोडल्याने गाव पाणीदार झाले आहे.

विजय गायकवाड,अकोले- दुष्काळात अकोले गावाची पाण्याची तहान मिटविण्यासाठी जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून बांधलेल्या सिमेंट तलावात पाणी सोडल्याने गाव पाणीदार झाले आहे. इंदापूर तालुक्यात दुष्काळाच्या अवर्षण क्षेत्रात येणाऱ्या अकोले गावाची ओळख दुष्काळग्रस्त म्हणूनच केली जाते. मात्र, राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेमुळे आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने गावातील पाण्याची खालावलेली पातळी वाढवण्यासाठी दलित वस्ती येथे सिमेंट बंधारा बांधण्यात आला आहे. त्यात खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली गावकऱ्यांच्या मागणीनुसार पिण्यासाठी पाणी सोडण्यात आले आहे. या सोडलेल्या पाण्याचे आज ग्रामस्थांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. चौदा लाख रुपये खर्च करून वीस मीटर रुंद आणि तीनशे मीटर लांबीच्या बांधलेल्या या बंधाऱ्यात आठ सहस्र दशलक्ष घनमीटर पाणी साठले आहे. यामुळे गावातील लोकांसाठी असणाऱ्या बोअरवेल, विहिरी, हातपंप यातील पाण्याची पातळी वाढून ऐन दुष्काळात पाण्याची समस्या मिटण्यास चांगल्या प्रकारे मदत होणार आहे. यामुळे आजूबाजूचा परिसर हिरवागार होणार आहे. दरवर्षी खडकवासला कालव्याचे येणारे आवर्तन वितरिकांद्वारे गावाला देण्यात येत असायचे. मात्र वितरिकांचे पाणी संपून गेल्यावर गावातील लोकांना पाण्याची टंचाई लगेच निर्माण होत असे. मात्र, कृषी विभाग, अकोले ग्रामपंचायत आणि पाटबंधारे खाते यांच्या सहकार्याने आज या सिमेंट बंधाऱ्यात पाणी सोडून बंधरा तुडुंब भरला आहे. त्या पाण्याचे महिलांच्या हस्ते पुष्प अर्पण करून पूजन करण्यात आले. या वेळी सरपंच सुनीता वणवे म्हणाल्या, या बंधाऱ्यात सोडलेल्या पाण्यामुळे गावाच्या आजूबाजूच्या भूजल पातळीत वाढ होऊन हातपंप आणि विहिरींना पाण्याची वाढ होणार आहे. याप्रसंगी सरपंच सुनीता वणवे, उपसरपंच वसंतराव शिंदे, पांडुरंग पाटील व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी खडकवासला पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता बी.डी. ढोले, पी.डी. शिंदे, आर.एल. भोंग , कर्मचारी बाबा कांबळे यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)पाण्याने भरलेल्या बंधाऱ्यामुळे गावातील लोकांना पाण्यासाठी महत्त्वाचे स्रोत असणारे आरोग्य केंद्राजवळ आणि अंकलेश्वर मंदिर येथील हातपंपांची पाण्याची पातळी वाढणार आहे. ऐन उन्हाळ्यात पाण्याची गरज भागणार आहे. या सर्वांच्या सहकार्याने गावकऱ्यांची पाण्याची होणारी वणवण थांबण्यास मदत होणार आहे.