शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

राज्यातील २४ जिल्ह्यांमध्ये भीषण दुष्काळाचे संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2019 06:26 IST

५४ टक्के पावसाची तूट जलसाठे अद्याप कोरडे, पेरण्यांवरही संक्रांत

रूपेश उत्तरवार यवतमाळ/मुंबई : जुलै संपत आला तरी पुरेसा पाऊस न झाल्याने राज्यातील २४ जिल्ह्यांवर भीषण दुष्काळाचे संकट येण्याची परिस्थिती आहे. ३५५ तालुक्यांपैकी ४१ तालुक्यात केवळ ४० टक्के तर १५४ तालुक्यांत सरासरीच्या ५० टक्केच पाऊस झाल्याने ऐन पावसाळ्यात जलसंकट ओढावले आहे.

यंदा सरासरीएवढा पाऊस होईल, हा हवामान खात्याचा अंदाज वरुणराजाने साफ खोटा ठरवला. जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलैकडे शेतकऱ्यांनी आशा लावली होती, मात्र या महिन्यात किरकोळ सरी बरसवून पाऊस ढगातच दडून बसला. पाऊस नसल्याने शेतकऱ्यांनी चाड्यावर मूठ धरलीच नाही. खरीप पिकांचे क्षेत्र १४०.६९ लाख हेक्टर असून २२ जुलैपर्यंत १०९.८२ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे, असा कृषी खात्याचा दावा आहे. मात्र पावसाची आकडेवारी पाहाता हा दावा कितपत खरा आहे, याविषयी साशंकता आहे.

मराठवाड्यातील जालना व औरंगाबाद वगळता सहा जिल्हे, उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नाशिक आणि नंदुरबार तर विदर्भातील वर्धा, नागपूर, यवतमाळ, भंडारा, गडचिरोली, गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांत सरासरीच्या ४० ते ५० टक्केच पाऊस झाला आहे. या जिल्ह्यांमध्ये ५४ टक्के पावसाची तूट आहे.

आता उशिरा पाऊस बरसला तरी कपाशी, सोयाबीन या मुख्य पिकांऐवजी शेतकºयांना मका, तूर अशा दुय्यम पिकांची पेरणी करावी लागणार आहे. यामुळे शेतीवरच अवलंबून असलेल्या शेतकºयांच्या अडचणीत वाढ होणार आहे.

आठ दिवसांनी खरीप कर्जवितरण थांबणारदुष्काळी स्थितीने कर्जाची परतफेड करू न शकलेल्या शेतकºयांच्या कर्जाची पुनर्रचना करण्याचा आदेश काढून सरकारने तो राज्यस्तरीय बँकर्स कमिटीला पाठविला. मात्र राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखा कर्ज पुनर्रचनेस तयार नाहीत. तशा तक्रारी शेतकºयांनी संबंधित जिल्हाधिकाºयांकडे केल्या. आता खरीप कर्जवितरणासाठी ३१ जुलैची अंतिम मुदत आहे. त्यानंतर कर्जवितरण थांबणार आहे. तथापि राष्ट्रीयीकृत बँकांचे कर्ज वितरण अद्यापही ३० टक्क्यांपेक्षा पुढे सरकले नाही. यामुळे पुढील आठ दिवसांत उर्वरित कर्ज वितरण होईल काय, असा प्रश्न आहे.

१३०० शेतकºयांच्या आत्महत्या : नापिकी व दुष्काळी स्थितीमुळे ६ महिन्यांत १३०० शेतकºयांनी आत्महत्या केल्या. अमरावती विभागात ४६३ तर औरंगाबाद विभागात ४३४ आत्महत्या झाल्या. बुलडाणा १३४, अमरावती १२२, यवतमाळ ११३, बीड ९६, अहमदनगर ७१, उस्मानाबाद ६६, तर औरंगाबाद ६३ अशी आत्महत्यांची नोंद आहे.

टॅग्स :droughtदुष्काळRainपाऊस