शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

राज्यातील २४ जिल्ह्यांमध्ये भीषण दुष्काळाचे संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2019 06:26 IST

५४ टक्के पावसाची तूट जलसाठे अद्याप कोरडे, पेरण्यांवरही संक्रांत

रूपेश उत्तरवार यवतमाळ/मुंबई : जुलै संपत आला तरी पुरेसा पाऊस न झाल्याने राज्यातील २४ जिल्ह्यांवर भीषण दुष्काळाचे संकट येण्याची परिस्थिती आहे. ३५५ तालुक्यांपैकी ४१ तालुक्यात केवळ ४० टक्के तर १५४ तालुक्यांत सरासरीच्या ५० टक्केच पाऊस झाल्याने ऐन पावसाळ्यात जलसंकट ओढावले आहे.

यंदा सरासरीएवढा पाऊस होईल, हा हवामान खात्याचा अंदाज वरुणराजाने साफ खोटा ठरवला. जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलैकडे शेतकऱ्यांनी आशा लावली होती, मात्र या महिन्यात किरकोळ सरी बरसवून पाऊस ढगातच दडून बसला. पाऊस नसल्याने शेतकऱ्यांनी चाड्यावर मूठ धरलीच नाही. खरीप पिकांचे क्षेत्र १४०.६९ लाख हेक्टर असून २२ जुलैपर्यंत १०९.८२ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे, असा कृषी खात्याचा दावा आहे. मात्र पावसाची आकडेवारी पाहाता हा दावा कितपत खरा आहे, याविषयी साशंकता आहे.

मराठवाड्यातील जालना व औरंगाबाद वगळता सहा जिल्हे, उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नाशिक आणि नंदुरबार तर विदर्भातील वर्धा, नागपूर, यवतमाळ, भंडारा, गडचिरोली, गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांत सरासरीच्या ४० ते ५० टक्केच पाऊस झाला आहे. या जिल्ह्यांमध्ये ५४ टक्के पावसाची तूट आहे.

आता उशिरा पाऊस बरसला तरी कपाशी, सोयाबीन या मुख्य पिकांऐवजी शेतकºयांना मका, तूर अशा दुय्यम पिकांची पेरणी करावी लागणार आहे. यामुळे शेतीवरच अवलंबून असलेल्या शेतकºयांच्या अडचणीत वाढ होणार आहे.

आठ दिवसांनी खरीप कर्जवितरण थांबणारदुष्काळी स्थितीने कर्जाची परतफेड करू न शकलेल्या शेतकºयांच्या कर्जाची पुनर्रचना करण्याचा आदेश काढून सरकारने तो राज्यस्तरीय बँकर्स कमिटीला पाठविला. मात्र राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखा कर्ज पुनर्रचनेस तयार नाहीत. तशा तक्रारी शेतकºयांनी संबंधित जिल्हाधिकाºयांकडे केल्या. आता खरीप कर्जवितरणासाठी ३१ जुलैची अंतिम मुदत आहे. त्यानंतर कर्जवितरण थांबणार आहे. तथापि राष्ट्रीयीकृत बँकांचे कर्ज वितरण अद्यापही ३० टक्क्यांपेक्षा पुढे सरकले नाही. यामुळे पुढील आठ दिवसांत उर्वरित कर्ज वितरण होईल काय, असा प्रश्न आहे.

१३०० शेतकºयांच्या आत्महत्या : नापिकी व दुष्काळी स्थितीमुळे ६ महिन्यांत १३०० शेतकºयांनी आत्महत्या केल्या. अमरावती विभागात ४६३ तर औरंगाबाद विभागात ४३४ आत्महत्या झाल्या. बुलडाणा १३४, अमरावती १२२, यवतमाळ ११३, बीड ९६, अहमदनगर ७१, उस्मानाबाद ६६, तर औरंगाबाद ६३ अशी आत्महत्यांची नोंद आहे.

टॅग्स :droughtदुष्काळRainपाऊस