शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

१४0 कोटींचा आराखडा तयार

By admin | Updated: January 9, 2016 00:51 IST

जिल्हा नियोजन : सन २0१६-१७, शासन मंजुरीसाठी सादर करणार

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा नियोजनाचा सन २०१६-१७ साठीचा १४० कोटी रूपयांचा आराखडा लवकरच शासनाला सादर करण्यात येणार आहे. विकासाच्या क्रमवारीत राज्यात २७ व्या क्रमांकावर असणाऱ्या सिंधुदुर्गातील रोजगार निर्मिती वाढणे व सेवा क्षेत्रांमध्ये वाढ होणे यादृष्टीने आराखड्याची बांधणी केली जात आहे. जानेवारी अखेरपर्यंत नियोजन समिती सभेत याला मंजुरी घेऊन तो शासनास सादर केला जाणार आहे. जिल्ह्याला दरवर्षी शासनाकडून ठराविक बजेटचा आराखडा बनविण्याचे निर्देश दिले जातात. त्यानुसार यावर्षीही ७५ कोटी ७७ लाख रूपयांचा आराखडा बनविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र जिल्हा प्रशासनाने ७५ कोटी ७७ लाख, १२५ कोटी व १४० कोटी असे तीन आराखडे बनविले आहेत. जिल्ह्याचा विकास हा त्या जिल्ह्यात असलेल्या कृषी, उद्योग व सेवा क्षेत्रातील योगदानावर अवलंबून असतो. सिंधुदुर्गात कृषी क्षेत्र सर्वाधिक आहे. मात्र हे क्षेत्र केवळ भात पिकापुरतेच मर्यादित आहे. त्यामुळे इतर कृषी क्षेत्र असलेल्या कोल्हापूर सांगलीसारख्या कृषी प्रधान जिल्ह्याची बरोबरी कृषी क्षेत्रातून होवू नाही. तसेच उद्योग व सेवा क्षेत्रातून शासनाला दिले जाणारे योगदानही राज्याच्या तुलनेत १ टक्काही नाही या बाबीचा विचार करता सिंधुदुर्गातील उद्योग, सेवा क्षेत्र वाढावे, रोजगार निर्मिती व्हावी व जिल्ह्यातील तरूणांचे स्थलांतर थांबावे यादृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. म्हणूनच शासनाच्या निर्देशाप्रमाणे ७५ कोटी ७७ लाख रूपयांचा आराखडा बसविण्यात आला आहे. परंतु सिंधुदुर्गाचा विचार करता येथील पायाभूत सेवा सुविधा व पर्यटन उद्योग याचा विचार करता १२५ व १४० कोटी रूपयांचे दोन आराखडे बनविण्यात आले आहेत. पालकमंत्री केसरकर हे या खात्याचे मंत्री आहेत. सिंधुदुर्गाच्या विकासाच्या दृष्टीकोनातून जास्तीत जास्त निधी मंजूर करून घेऊन येथील उद्योग व सेवा क्षेत्राला वाढविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)लोकसंख्या घटली : रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याची गरजदरडोई उत्पन्नामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा आज राज्यात सातव्या क्रमांकावर आहे. येथील रोजगाराच्या स्रोत व संधी पाहता प्रत्येक घरातील एखादी व्यक्ती मुंबई-पुणे या ठिकाणी रोजगार करीत आहे. त्यामुळे जिल्ह्याची लोकसंख्याही घटलेली दिसून येत आहे. ४हीच रोजगाराची संधी जिल्ह्यात उपलब्ध झाल्यास दरडोई उत्पन्नामध्ये आपला जिल्हा यापेक्षाही वरच्या क्रमांकावर येवू शकतो. यासाठी जिल्हा विकास व नियोजनाच्या दृष्टीने जास्तीत जास्त रकमेचा आराखडा मंजूर होणे आवश्यक आहे. जानेवारी अखेर बैठकहा १४० रूपयांचा आराखडा मंजुरीसाठी जानेवारी अखेरपर्यंन नियोजन समितीची बैठक घ्यावी. अशा सूचना शासनाने दिल्या आहेत. त्यानुसार जानेवारी अखेर ही बैठक घेऊन हा आराखडा शासनाच्या मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. या बैठकीमध्ये नियोजन विभागाकडून आराखडा सादरही करण्यात येणार आहे.