शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

Dr.Amol Kolhe: डॉ. अमोल कोल्हे पक्षांतर करणार? एकांतवासातून बाहेर पडल्यानंतर प्रथमच स्पष्टपणे बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2021 18:52 IST

मी एकांतवासात जाण्याबद्दल शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, सुप्रिया सुळे यांना कल्पना होती.

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी काही दिवसांपूर्वी एकांतवासात जात असल्याची पोस्ट केली होती. या पोस्टनंतर राजकीय चर्चेला उधाण आलं. मात्र अखेर खासदार अमोल कोल्हे समोर आले आहेत. मागील बऱ्याच काळापासून सोशल मीडियात सुरु असलेल्या चर्चेवर अमोल कोल्हे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मानसिक थकवा येणं, सतत धावपळीतून याकडे पाहणं गरजेचे होते. मानसिक थकव्याची जाणीव झाल्यानं मी हा निर्णय घेतला होता असं अमोल कोल्हे(Dr Amol Kolhe) म्हणाले.

याबाबत बीबीसी मराठीच्या मुलाखतीत अमोल कोल्हे म्हणाले की, मी या काळात प्राणायम केले. मानसिक आरोग्य आणि मानसिक आजार हे दोन वेगवेगळे मुद्दे आहेत. मानसिक आरोग्य जपण्यासाठी काही उपाय केले जातात. मानसिक आजारासाठी काऊन्सिलिंगची गरज भासते. लोकांमध्ये मानसिक तणावाबद्दल जनजागृती व्हायला हवी. माझ्या पोस्टकडे खूप निगेटिव्ह दृष्टीकोनातून पाहिलं गेले त्याचे नवल वाटते असं त्यांनी सांगितले.

तसेच मी कुठलाही फेरविचार करत नाही. लोकप्रतिनिधी म्हणून लोकांना दिलेली आश्वासनं, संकल्पना याबाबतही फेरविचार करणं गरजेचे आहे. पुढच्या काळात काही काळात अनेक उलगडा होत जाईल. एकांतवासात गेल्यानंतर ज्या बातम्या झाल्या. त्या प्रतिक्रिया आल्या. मानसिक आरोग्याची गरज आहे का? तर हे असू शकतं. मला राजकारणाचा कंटाळा आला असता तर माझ्या संकल्पना, योजना इतक्या उत्साहाने मांडल्या नसत्या असं अमोल कोल्हे म्हणाले.

पक्ष बदलण्याचा विचार आहे का?

मी एकांतवासात जाण्याबद्दल शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, सुप्रिया सुळे यांना कल्पना होती. मात्र इतरांनी अनेक तर्क वितर्क लावले. मी राजकारण सोडणार? पक्ष बदलणार? याचं मी स्पष्टीकरण काय द्यावं? प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने तर्क लावले. मला विचारमंथन करायचं होतं. येणाऱ्या काळात जे करायचं होतं त्याचा विचार मी एकांतवासात केला. राजकीय सन्यास, पक्षांतर असा कुठलाही अँगल नाही असं स्पष्टपणे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.

अमोल कोल्हेंनी पोस्टमध्ये काय म्हटलं होतं?

सिंहावलोकनाची वेळ - गेल्या काही दिवसांत, महिन्यांत, वर्षांत बेभान होऊन धावत राहिलो, काही टोकाचे निर्णय घेतले, अनपेक्षित पावलं उचलली. पण हे सगळं जुळवताना झालेली ओढाताण, तारेवरची कसरत, वेळेची गणितं, ताणतणाव यामुळे जरा थकवा आलाय..थोडा शारीरिक, बराचसा मानसिक! शारीरिक थकवा आरामाने निघून जाईल पण मानसिक थकवा घालवण्यासाठी हवं- थोडं मनन, थोडं चिंतन! घेतलेल्या निर्णयांचा विचार, आणि कदाचित फेरविचार सुद्धा करणार आहे. त्यासाठीच आपण एकांतवासात जातोय. काही काळ संपर्क होणार नाही! पुन्हा लवकरच भेटू... नव्या जोमाने, नव्या जोशाने!! चिंतनासाठी जातोय, चिंतनशिबिरासाठी नाही, अशी तळटीप सुद्धा त्यांनी लिहिली होती.

टॅग्स :Dr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेNCPराष्ट्रवादी काँग्रेस