शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
5
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
6
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
7
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
8
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
9
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
10
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
11
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
12
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
13
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
14
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
15
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
16
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
17
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
18
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
19
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...

Dr.Amol Kolhe: डॉ. अमोल कोल्हे पक्षांतर करणार? एकांतवासातून बाहेर पडल्यानंतर प्रथमच स्पष्टपणे बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2021 18:52 IST

मी एकांतवासात जाण्याबद्दल शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, सुप्रिया सुळे यांना कल्पना होती.

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी काही दिवसांपूर्वी एकांतवासात जात असल्याची पोस्ट केली होती. या पोस्टनंतर राजकीय चर्चेला उधाण आलं. मात्र अखेर खासदार अमोल कोल्हे समोर आले आहेत. मागील बऱ्याच काळापासून सोशल मीडियात सुरु असलेल्या चर्चेवर अमोल कोल्हे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मानसिक थकवा येणं, सतत धावपळीतून याकडे पाहणं गरजेचे होते. मानसिक थकव्याची जाणीव झाल्यानं मी हा निर्णय घेतला होता असं अमोल कोल्हे(Dr Amol Kolhe) म्हणाले.

याबाबत बीबीसी मराठीच्या मुलाखतीत अमोल कोल्हे म्हणाले की, मी या काळात प्राणायम केले. मानसिक आरोग्य आणि मानसिक आजार हे दोन वेगवेगळे मुद्दे आहेत. मानसिक आरोग्य जपण्यासाठी काही उपाय केले जातात. मानसिक आजारासाठी काऊन्सिलिंगची गरज भासते. लोकांमध्ये मानसिक तणावाबद्दल जनजागृती व्हायला हवी. माझ्या पोस्टकडे खूप निगेटिव्ह दृष्टीकोनातून पाहिलं गेले त्याचे नवल वाटते असं त्यांनी सांगितले.

तसेच मी कुठलाही फेरविचार करत नाही. लोकप्रतिनिधी म्हणून लोकांना दिलेली आश्वासनं, संकल्पना याबाबतही फेरविचार करणं गरजेचे आहे. पुढच्या काळात काही काळात अनेक उलगडा होत जाईल. एकांतवासात गेल्यानंतर ज्या बातम्या झाल्या. त्या प्रतिक्रिया आल्या. मानसिक आरोग्याची गरज आहे का? तर हे असू शकतं. मला राजकारणाचा कंटाळा आला असता तर माझ्या संकल्पना, योजना इतक्या उत्साहाने मांडल्या नसत्या असं अमोल कोल्हे म्हणाले.

पक्ष बदलण्याचा विचार आहे का?

मी एकांतवासात जाण्याबद्दल शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, सुप्रिया सुळे यांना कल्पना होती. मात्र इतरांनी अनेक तर्क वितर्क लावले. मी राजकारण सोडणार? पक्ष बदलणार? याचं मी स्पष्टीकरण काय द्यावं? प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने तर्क लावले. मला विचारमंथन करायचं होतं. येणाऱ्या काळात जे करायचं होतं त्याचा विचार मी एकांतवासात केला. राजकीय सन्यास, पक्षांतर असा कुठलाही अँगल नाही असं स्पष्टपणे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.

अमोल कोल्हेंनी पोस्टमध्ये काय म्हटलं होतं?

सिंहावलोकनाची वेळ - गेल्या काही दिवसांत, महिन्यांत, वर्षांत बेभान होऊन धावत राहिलो, काही टोकाचे निर्णय घेतले, अनपेक्षित पावलं उचलली. पण हे सगळं जुळवताना झालेली ओढाताण, तारेवरची कसरत, वेळेची गणितं, ताणतणाव यामुळे जरा थकवा आलाय..थोडा शारीरिक, बराचसा मानसिक! शारीरिक थकवा आरामाने निघून जाईल पण मानसिक थकवा घालवण्यासाठी हवं- थोडं मनन, थोडं चिंतन! घेतलेल्या निर्णयांचा विचार, आणि कदाचित फेरविचार सुद्धा करणार आहे. त्यासाठीच आपण एकांतवासात जातोय. काही काळ संपर्क होणार नाही! पुन्हा लवकरच भेटू... नव्या जोमाने, नव्या जोशाने!! चिंतनासाठी जातोय, चिंतनशिबिरासाठी नाही, अशी तळटीप सुद्धा त्यांनी लिहिली होती.

टॅग्स :Dr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेNCPराष्ट्रवादी काँग्रेस