शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेबद्दल साशंकता; रामदास आठवलेंनी दिलेला सल्ला ऐकणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2023 19:01 IST

भाजपा-शिवसेना-आरपीआय युती झाली तेव्हा खऱ्या अर्थाने तिला शिवशक्ती-भीमशक्ती युती म्हणता येईल. वंचित-शिवसेना ठाकरे गट युतीने फार काही फरक पडणार नाही असं त्यांनी सांगितले. 

मुंबई -  उद्धव ठाकरेंशी युती केल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांवर टीका केली त्यानंतर महाविकास आघाडीत धुसफूस आहे. प्रकाश आंबेडकरांच्या टीकेवर मी सहमत नाही. पवारांनी वेळोवेळी फुले-शाहू आंबेडकरांबद्दल त्यांनी भूमिका स्पष्टपणे त्यांनी मांडली आहे. एकाबाजूला शरद पवारांवर टीका करतात. दुसऱ्या बाजूला संजय राऊतांवर टीका करतात. प्रकाश आंबेडकरांची भूमिका याबद्दल मी सांशकता आहे असं विधान केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी केले आहे. 

रामदास आठवले म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र राहतील असे वाटत नाही. भविष्यात उद्धव ठाकरेंना काँग्रेस-राष्ट्रवादीला सोडून प्रकाश आंबेडकरांसोबत राहावं लागेल किंवा प्रकाश आंबेडकरांना सोडावं लागेल. प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना उद्धव ठाकरे एकत्र आले असले तरी त्यांना शिवशक्ती-भीमशक्ती म्हणता येणार नाही. कारण शिवशक्ती-भीमशक्ती ही बाळासाहेबांच्या उपस्थितीत आम्ही एकत्र आलो. शिवसेना-भाजपा एकत्र होते. त्याला युती म्हणत होते. २०१२ महापालिका निवडणुकीत भाजपा-शिवसेना-आरपीआय युती झाली तेव्हा खऱ्या अर्थाने तिला शिवशक्ती-भीमशक्ती युती म्हणता येईल. वंचित-शिवसेना ठाकरे गट युतीने फार काही फरक पडणार नाही असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत काँग्रेस पक्षाने त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. प्रकाश आंबेडकरांची युती शिवसेना ठाकरेंशी युती केलीय महाविकास आघाडीशी संबंध नाही असं काँग्रेसनं म्हटलं. महाविकास आघाडीसोबत जायचं की नाही हे ठरवण्याचा अधिकार प्रकाश आंबेडकरांचा आहे. राजकारणात मतभिन्नता, वेगवेगळी प्रणाली असते. पण काही मुद्द्यावर एकत्र येऊन राजकारणात यशस्वी होणे गरजेचे असते असंही आठवले म्हणाले. 

दरम्यान, नरेंद्र मोदींचे नेतृत्व सर्वसमावेशक आहे. आर्थिक दुर्बळतेवर प्रचंड घाव घालून आत्मनिर्भर भारत उभारण्याचं आहे. प्रकाश आंबेडकरांना असं वाटत असेल तर त्यांनी उद्धव ठाकरेंसोबत युती तोडावी आणि भाजपासोबत येण्यास हरकत नाही. राजकारणात यशस्वी व्हायचं असेल तर त्यांनी भाजपासोबत आले पाहिजे असा सल्लाही रामदास आठवलेंनी प्रकाश आंबेडकरांना दिला.  

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरUddhav Thackerayउद्धव ठाकरे