शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
3
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
4
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
5
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
6
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
7
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
8
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
9
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
10
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
11
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
12
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
13
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
14
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
15
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
16
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

CoronaVirus: लाखो भाडेकरुंना मिळणार दिलासा; ठाकरे सरकारची घरमालकांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2020 18:03 IST

coronavirus गृहनिर्माण विभागाची घरमालकांना सूचना; बिकट परिस्थिती लाखो कुटुंबांना दिलासा

मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशभरात लॉकडाऊन सुरू असल्यानं अनेक उद्योगधंदे ठप्प आहेत. लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका असंघटित क्षेत्रातल्या व्यक्तींना आणि हातावर पोट असलेल्या कामगारांना बसला आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी गृहनिर्माण विभागानं एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. घरभाडं वसुली तीन महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात यावी, अशी सूचना विभागानं राज्यातल्या घरमालकांना केली आहे.लॉकडाऊनमुळे अनेकांसमोर उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. स्वत:चं घर नसलेल्या कुटुंबांसमोर तर दुहेरी संकट उभं ठाकलं आहे. त्यामुळे भाडेकरूंना दिलासा देण्यासाठी गृहनिर्माण विभाग पुढे सरसावला आहे. सध्याच्या बिकट आर्थिक परिस्थितीत घर भाडं वसुली पुढील तीन महिने पुढे ढकलावी. भाडं थकल्यानं कोणत्याही भाडेकरूंना घरांमधून बाहेर काढलं जाऊ नये, अशा सूचना राज्यातल्या सर्व घरमालकांना देण्यात आल्या आहेत.पुढचा काळ अतिशय कठीण आहे. त्यामुळे या परिस्थितीत गरिबांच्या मागे उभं राहायला हवं, अशी भूमिका गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मांडली. लॉकडाऊनमुळे अनेकांचे हाल होत आहेत. भाडेकरू म्हणून राहणाऱ्या कुटुंबांसमोरील संकट तर अतिशय मोठं आहे. त्यामुळेच पुढील तीन महिने भाडेवसुली केली जाऊ नये, अशा सूचना सर्व घरमालकांना देण्यात आल्या आहेत. याचा अर्थ भाडं द्यायचंच नाही असा होत नाही. हातावर पोट असणाऱ्यांसमोर सध्या खायचं काय, भाडं द्यायचं कुठून असे प्रश्न निर्माण झाले आहेत. यातला घरभाड्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न गृहनिर्माण विभाग करत असल्याचं ते म्हणाले.

महाराष्ट्र मोठ्या मनाचा आहे. त्यामुळे या परिस्थितीत घरमालक भाडेकरुंच्या पाठिशी उभी राहतील आणि भाड्यासाठी तगादा लावणार नाहीत, असा विश्वास आव्हाड यांनी व्यक्त केला. काही घरमालकांचं कुटुंब घर भाड्यातून येणाऱ्या पैशांवर चालतं, याची कल्पना आहे. मात्र कोरोनाविरुद्धच्या लढाईत प्रत्येक जण आपलं योगदान देत आहे. त्याप्रमाणे समाज व्यवस्था सांभाळण्यासाठी घरमालक योगदान देतील, अशी अपेक्षा त्यांनी बोलून दाखवली. 

CoronaVirus नोकरीवरून काढून टाकाल तर याद राखा! पंतप्रधान नरेंद्र मोदींची नजर आहे

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसJitendra Awhadजितेंद्र आव्हाड