शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

नवाब मलिकांवरून महायुतीत वादळ; फडणवीसांचं पत्र अन् राजकीय चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2023 08:56 IST

त्यांना सोबत घेऊ शकत नाही; फडणवीस यांचे अजित पवारांना पत्र, नवाब मलिक सत्ताधारी बाकावर बसल्याने विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आक्षेप घेतला.

नागपूर - देशद्रोहाच्या आरोपानंतर तब्बल पाच अधिवेशनानंतर परतलेले माजी मंत्री नवाब मलिक थेट सत्ताधारी बाकावर बसल्याने महायुतीत वादळ उठले. विरोधी पक्षांनी आक्षेप घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून मलिक यांना महायुतीत घेण्यास विरोध केला. देशद्रोहाचे आरोप असताना मलिक यांना महायुतीचा भाग करणे योग्य होणार नाही, अशी भूमिका फडणवीस यांनी पत्रात मांडली आहे.

नवाब मलिक सत्ताधारी बाकावर बसल्याने विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आक्षेप घेतला. यावेळी झालेल्या खडाजंगीत फडणवीस यांनी विरोधकांना देशद्रोहाचा आरोप झाल्यानंतर  मालिकांना मंत्रिपदावरून का काढले नाही, असा सडेतोड सवाल केला. अधिवेशनाचे कामकाज संपल्यानंतर  अजित पवार यांना पत्र लिहून मलिकांना महायुतीत घेण्यास फडणवीस यांनी  विरोध दर्शविला.

देवेंद्र फडणवीस पत्रात नेमके काय म्हणाले?नवाब मलिक हे आज विधिमंडळ परिसरात येऊन कामकाजात सहभागी झाले. विधानसभा सदस्य म्हणून त्यांचा तो अधिकारसुद्धा आहे. त्यांच्याबाबत आमची वैयक्तिक शत्रूता अथवा आकस अजिबात नाही, हे मी प्रारंभीच स्पष्ट करतो. परंतु ज्या पद्धतीचे आरोप त्यांच्यावर आहेत, ते पाहता, त्यांना महायुतीमध्ये घेणे योग्य ठरणार नाही, असे आमचे मत आहे. सत्ता येते आणि जाते. पण सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा आहे. सध्या ते केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळाल्याने बाहेर आहेत. त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचे जरूर स्वागत करावे. 

आपल्या पक्षात कोणाला घ्यायचे. हा सर्वस्वी आपला अधिकार आहे, हे मान्यच आहे. परंतु महायुतीला बाधा पोहोचणार नाही, याचा विचारही करावा लागतो. त्यामुळे आमचा या गोष्टीला विरोध आहे, असे फडणवीस यांनी या पत्रात स्पष्ट केले आहे.वैद्यकीय आधारावर जामिनावर तुरुंगातून बाहेर आलेल्या माजी मंत्री नवाब मलिक यांनी तब्बल पाच अधिवेशनानंतर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात उपस्थिती दर्शविली.

महविकास आघाडीच्या विचारांशी सहमत नाही त्यांना देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झाली तरी त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवणाऱ्या तत्कालिन मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारच्या विचारांशी आम्ही सहमती दाखवू शकणार नसल्याचे सांगत फडणवीसांनी विरोध दर्शविला आहे.

विधान परिषदेत खडाजंगी विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माहितीच्या मुद्द्याद्वारे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मलिक सत्ताधारी पक्षांच्या बाकावर बसल्याने प्रश्न उपस्थित केला. सभागृहात एक आमदार सत्ताधाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत, ज्यांच्यावर दाऊद इब्राहिम सोबत संबंध असल्याचे आरोप करण्यात आले होते. त्यामुळे आता गृहमंत्र्यांनी यावर आपली भूमिका मांडावी, असे दानवे म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांचे प्रत्युत्तर

दानवे यांच्या आक्षेपावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले,  ज्यांच्या नेत्यांनी प्रत्यक्ष जेलमध्ये असताना देखील (नवाब मलिक) आम्ही मंत्रिपदावरून काढणार नाही, अशी भूमिका घेतली होती ते आता इथे आता ही बाब मांडत आहेत, याचे आश्चर्य आहे. आम्ही कोणाच्याही मांडीला मांडी लावून बसलेलो नाही. मी आणि मुख्यमंत्री मांडीला मांडी लावून बसलो आहोत. आमच्या बाजूला अजितदादा मांडीला मांडी लावून बसले आहेत, त्यांच्या बाजूला भुजबळ साहेब बसले आहेत. त्यामुळे आमची काळजी करू नका. पहिल्यांदा तुम्हाला हे उत्तर द्यावं लागेल की, देशद्रोहाचा आरोप झाल्यानंतर ते जेलमध्ये असताना तुम्ही त्यांना मंत्रिपदावरून का काढलं नाही? याचं उत्तर आधी द्या, असेफडणवीस यांनी सुनावले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारnawab malikनवाब मलिक