शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

नवाब मलिकांवरून महायुतीत वादळ; फडणवीसांचं पत्र अन् राजकीय चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2023 08:56 IST

त्यांना सोबत घेऊ शकत नाही; फडणवीस यांचे अजित पवारांना पत्र, नवाब मलिक सत्ताधारी बाकावर बसल्याने विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आक्षेप घेतला.

नागपूर - देशद्रोहाच्या आरोपानंतर तब्बल पाच अधिवेशनानंतर परतलेले माजी मंत्री नवाब मलिक थेट सत्ताधारी बाकावर बसल्याने महायुतीत वादळ उठले. विरोधी पक्षांनी आक्षेप घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून मलिक यांना महायुतीत घेण्यास विरोध केला. देशद्रोहाचे आरोप असताना मलिक यांना महायुतीचा भाग करणे योग्य होणार नाही, अशी भूमिका फडणवीस यांनी पत्रात मांडली आहे.

नवाब मलिक सत्ताधारी बाकावर बसल्याने विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आक्षेप घेतला. यावेळी झालेल्या खडाजंगीत फडणवीस यांनी विरोधकांना देशद्रोहाचा आरोप झाल्यानंतर  मालिकांना मंत्रिपदावरून का काढले नाही, असा सडेतोड सवाल केला. अधिवेशनाचे कामकाज संपल्यानंतर  अजित पवार यांना पत्र लिहून मलिकांना महायुतीत घेण्यास फडणवीस यांनी  विरोध दर्शविला.

देवेंद्र फडणवीस पत्रात नेमके काय म्हणाले?नवाब मलिक हे आज विधिमंडळ परिसरात येऊन कामकाजात सहभागी झाले. विधानसभा सदस्य म्हणून त्यांचा तो अधिकारसुद्धा आहे. त्यांच्याबाबत आमची वैयक्तिक शत्रूता अथवा आकस अजिबात नाही, हे मी प्रारंभीच स्पष्ट करतो. परंतु ज्या पद्धतीचे आरोप त्यांच्यावर आहेत, ते पाहता, त्यांना महायुतीमध्ये घेणे योग्य ठरणार नाही, असे आमचे मत आहे. सत्ता येते आणि जाते. पण सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा आहे. सध्या ते केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळाल्याने बाहेर आहेत. त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचे जरूर स्वागत करावे. 

आपल्या पक्षात कोणाला घ्यायचे. हा सर्वस्वी आपला अधिकार आहे, हे मान्यच आहे. परंतु महायुतीला बाधा पोहोचणार नाही, याचा विचारही करावा लागतो. त्यामुळे आमचा या गोष्टीला विरोध आहे, असे फडणवीस यांनी या पत्रात स्पष्ट केले आहे.वैद्यकीय आधारावर जामिनावर तुरुंगातून बाहेर आलेल्या माजी मंत्री नवाब मलिक यांनी तब्बल पाच अधिवेशनानंतर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात उपस्थिती दर्शविली.

महविकास आघाडीच्या विचारांशी सहमत नाही त्यांना देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झाली तरी त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवणाऱ्या तत्कालिन मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारच्या विचारांशी आम्ही सहमती दाखवू शकणार नसल्याचे सांगत फडणवीसांनी विरोध दर्शविला आहे.

विधान परिषदेत खडाजंगी विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माहितीच्या मुद्द्याद्वारे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मलिक सत्ताधारी पक्षांच्या बाकावर बसल्याने प्रश्न उपस्थित केला. सभागृहात एक आमदार सत्ताधाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत, ज्यांच्यावर दाऊद इब्राहिम सोबत संबंध असल्याचे आरोप करण्यात आले होते. त्यामुळे आता गृहमंत्र्यांनी यावर आपली भूमिका मांडावी, असे दानवे म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांचे प्रत्युत्तर

दानवे यांच्या आक्षेपावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले,  ज्यांच्या नेत्यांनी प्रत्यक्ष जेलमध्ये असताना देखील (नवाब मलिक) आम्ही मंत्रिपदावरून काढणार नाही, अशी भूमिका घेतली होती ते आता इथे आता ही बाब मांडत आहेत, याचे आश्चर्य आहे. आम्ही कोणाच्याही मांडीला मांडी लावून बसलेलो नाही. मी आणि मुख्यमंत्री मांडीला मांडी लावून बसलो आहोत. आमच्या बाजूला अजितदादा मांडीला मांडी लावून बसले आहेत, त्यांच्या बाजूला भुजबळ साहेब बसले आहेत. त्यामुळे आमची काळजी करू नका. पहिल्यांदा तुम्हाला हे उत्तर द्यावं लागेल की, देशद्रोहाचा आरोप झाल्यानंतर ते जेलमध्ये असताना तुम्ही त्यांना मंत्रिपदावरून का काढलं नाही? याचं उत्तर आधी द्या, असेफडणवीस यांनी सुनावले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारnawab malikनवाब मलिक