शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

Sambhaji Raje : "उगाच समाजाची दिशाभूल करू नका", स्वतंत्र मागासवर्ग आयोगावरून संभाजीराजेंनी राज्य सरकारला ठणकावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2022 15:08 IST

Sambhaji Raje Chhatrapati : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य सरकारच्या या नवीन मागासवर्ग आयोगाला विरोध केला आहे.

मुंबई :  मराठा समाजाच्या मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी तातडीने स्वतंत्र समर्पित मागासवर्ग आयोग स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी राज्य सरकारच्या या नवीन मागासवर्ग आयोगाला विरोध केला आहे. एक मागासवर्गीय आयोग असताना, मराठा समाजासाठी स्वतंत्र आयोग स्थापन करण्याची कायद्यात, घटनेत तरतूद नाही. उगाच समाजाची दिशाभूल करू नये, अशा शब्दात संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य सरकारला ठणकावले आहे.

मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी संभाजीराजे छत्रपती यांनी मुंबईतील आझाद मैदानात आजपासून उपोषण सुरू केले आहे. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी समाजाला वेठीस धरू नये म्हणून मी एकट्याने आंदोलन करायचा निर्णय घेतला आहे. गेल्या 10 दिवसात महाराष्ट्रातील वातावरण बदलले. मला पाठिंबा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या विचारांना पाठिंबा आहे. शाहू महाराजांनी बहुजन समाजाला आरक्षण दिले. मी अठरा पगड जात,12 बलुतेदार यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहे. गरीब मराठ्यांसाठी माझा लढा आहे. 2007 पासून महाराष्ट्रात फिरतोय, प्रत्येक दौऱ्यात आरक्षण का हवे याबाबत जनजागृती केली. समाजासाठी ज्यांनी बलिदान दिले, त्यांच्या माध्यमातून हे आंदोलन उभे राहिले, असे संभाजीराजे छत्रपती म्हणाले.

याचबरोबर, मराठा समाजाच्या मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी तातडीने स्वतंत्र समर्पित मागासवर्ग आयोग स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या मागासवर्ग आयोगबाबत विचारणा केली असता संभाजीराजे छत्रपती यांनी याला विरोध दर्शविला. एक मागासवर्गीय आयोग असताना, मराठा समाजासाठी स्वतंत्र आयोग स्थापन करण्याची कायद्यात घटनेत तरतूद नाही. उगाच समाजाची दिशाभूल करू नये, अशा शब्दांत ठणकावत संभाजीराजे छत्रपती यांनी मला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे फोन आले होते. मी प्रवासात होतो, बोलणे मात्र झाले नाही, असे सांगितले. 

'मी महाराजांचा वंशज, हा लढा मी लढायलाच हवा'मी महाराजांचा वंशज आहे. हा लढा मी लढायलाच हवा. हा माझा निर्णय आहे. अनेक आंदोलने केली. सरकारकडे मागण्या दिल्या. पण सरकारने शब्द पाळला नाही. शब्द न पाळल्याने मला दुसरा पर्याय राहिला नाही. मी जी चळवळ सुरू केली. त्यात समाज वेठीस धरला जाऊ नये म्हणून मी आमरण उपोषण सुरू केले आहे. 17 जूनला ज्या मागण्या केल्या होत्या. त्याच मागण्या आहेत. त्यात तसूभरही बदल केला नाही. पण सरकारने मागण्या मान्य केल्या नाही, असे संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले. 

'कुंभकोणी काही भलतंच सांगतात'मागण्या फार छोट्या आहेत. आर्थिक महामंडळ मदत वाढवा, आर्थिक तरतूद करा. सारथी संस्था सबलीकरण,सक्षमीकरण करा. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह मागणी केली होती. फक्त ठाण्यात सुरू झाले. मराठा आंदोलनातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले होते. पण अजून गुन्हे मागे घेतले नाही. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या मुलांचा विषय होता. त्यांचे सिलेक्शन झाले त्यांना अजून नियुक्त्या नाही. कोव्हिड कारण सांगून नियुक्ती देत नाहीत. सुपर न्यूमरी पद्धतीने मार्ग काढा. कोर्टाचा संबंध नाही. ते म्हणतात कोर्टाच्या निर्णयाचा भंग होईल. मला माहीत नाही काय भंग होईल. ते महा कुंभ कुंभकोणी काही भलतंच सांगतात, असे म्हणत संभाजीराजे छत्रपती यांनी राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्यावर निशाणा साधाला.  

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीMaratha Reservationमराठा आरक्षण