शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पावरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

"अहो, मी पंतप्रधानपदाचं स्वप्न बघू की नको"; उद्धव ठाकरेंची कोपरखळी, लोकही हसले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2024 14:10 IST

आज आपण इथं संवाद साधतोय, त्याचवेळी या मोदी सरकारनं त्यांचा शेवटचा अर्थसंकल्प सादर केला आहे असा टोला ठाकरेंनी लगावला.

रायगड - Uddhav Thackeray on BJP ( Marathi News ) आम्ही लढतोय, अनंत गीतेंनी माझी पंचाईत केली. उद्धव ठाकरेंच पुन्हा मुख्यमंत्री होणार. अहो मी, पंतप्रधानपदाचे स्वप्न बघू की नको असा प्रश्न पडलाय अशी कोपरखळी उद्धव ठाकरे यांनी सभेत मांडली तेव्हा लोकही हसले. रायगडच्या पेण येथे उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभा घेत भाजपासह स्थानिक खासदार सुनील तटकरे यांच्यावरही निशाणा साधला. 

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, मला अशी स्वप्न पडत नाहीत. ना मुख्यमंत्रिपदाचे पडले होते ना पंतप्रधानपदाचे स्वप्न स्वप्नातही पडत नाही. मला फक्त दिसतोय माझा देश, माझी भारतमाता आणि या भारतमातेच्या बाजूला असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं संविधान, घटना ते आम्हाला वाचवायचं आहे. कोणालाही मतदान करायचं म्हणून मत द्यायचे नाही. हे मत तुम्ही स्वत: तुमच्या पुढच्या पिढीसाठी देणार आहात. पुढच्या पिढी भलेही तुरुंगात नाही टाकल्या तरी संपूर्ण देशाचा तुरुंग झाला तर त्या वातावरणात तुमच्या पिढीने जगावं अशी तुमची इच्छा असेल तर जरुर तुम्ही हुकुमशाहीला मतदान करा. नाहीतर इंडिया आघाडी जी देशभक्तांची आघाडी आहे तिला तुम्ही मतदान करा असं आवाहन त्यांनी केले. 

तसेच  आज मी काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेलो, शेकाप आपल्या सोबत आहे. अनंत गीते यांचा गेल्यावेळी पराभव झाला. परंतु मी रायगडला धन्यवाद देतो, कारण त्यावेळीही रायगड मोदीलाटेत वाहून गेला नाही. आत निवडून आलेला मोदी  लाटेत गेला परंतु आमचा रायगड तिथेच आहे. आज रायगडकर खुश झालेत. आता तर आपण हुकुमशाहीविरोधात उभे राहिलो आहोत. रायगडमध्ये जास्त प्रचार करण्याचीही गरज भासणार नाही. गेल्यावेळी इतके करूनही रायगडकरांनी मोदींविरोधात मतदान केले होते. यावेळी तर मोदींविरोधात त्सुनामीने मतदान होणार आहे अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी खासदार सुनील तटकरेंना टोला लगावला. 

दरम्यान, आज आपण इथं संवाद साधतोय, त्याचवेळी या मोदी सरकारनं त्यांचा शेवटचा अर्थसंकल्प सादर केला आहे. निर्मला सीतारामन यांचे मी आभार मानतो, यापुढे आम्ही देशात चार जातींसाठी काम करणार, गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी असं त्या बोलल्या. त्यांनी मोठे धाडस केले आहे. पंतप्रधानासमोर हे बोलण्याचे धाडस दाखवले म्हणून सीतारामन यांचं कौतुक आहे. निवडणुका आल्या म्हणून तुमच्या सूटबूटातील मित्रांव्यतिरिक्त देश आहे हे कळाले. गेल्या १० वर्षापासून या वर्गावर तुमचे लक्ष नव्हते. महिलांकडे लक्ष देता मग मणिपूरमध्ये का जात नाही. निवडणुकीत महिलांची मते हवीत म्हणून आता महिलांसाठी काम करतो हे बोलले जाते. उत्तरेकडील शेतकऱ्यांनी थंडी, ऊन वारा पाऊस कशाची पर्वा न करता सहा महिने आंदोलन केले. तेव्हा तुम्ही त्यांना अतिरेकी ठरवलं आणि आता निवडणूक आल्यावर ते शेतकरी झाले. या सर्व भूलथापा आणि थोतांड आहे. अजूनही जादूचे प्रयोग होत असतील. पण पाहिले नसतील तर दिल्लीत अजून जादूचे प्रयोग सुरू आहेत. अर्थसंकल्प म्हणजे जनतेला टोपी घालण्याचा प्रकार आहे. मतदान झाल्यानंतर सिलेंडरच्या किंमती दुपटीने वाढवतील. गेल्या १० वर्षात तरुणांना नोकरी का दिली नाही. १० वर्ष तुम्ही काय केले? आम्हाला आता तुमच्या फसव्या अर्थसंकल्पाची गरज नाही अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारच्या अर्थसंकल्पावर केली.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपा