शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

"अहो, मी पंतप्रधानपदाचं स्वप्न बघू की नको"; उद्धव ठाकरेंची कोपरखळी, लोकही हसले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2024 14:10 IST

आज आपण इथं संवाद साधतोय, त्याचवेळी या मोदी सरकारनं त्यांचा शेवटचा अर्थसंकल्प सादर केला आहे असा टोला ठाकरेंनी लगावला.

रायगड - Uddhav Thackeray on BJP ( Marathi News ) आम्ही लढतोय, अनंत गीतेंनी माझी पंचाईत केली. उद्धव ठाकरेंच पुन्हा मुख्यमंत्री होणार. अहो मी, पंतप्रधानपदाचे स्वप्न बघू की नको असा प्रश्न पडलाय अशी कोपरखळी उद्धव ठाकरे यांनी सभेत मांडली तेव्हा लोकही हसले. रायगडच्या पेण येथे उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभा घेत भाजपासह स्थानिक खासदार सुनील तटकरे यांच्यावरही निशाणा साधला. 

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, मला अशी स्वप्न पडत नाहीत. ना मुख्यमंत्रिपदाचे पडले होते ना पंतप्रधानपदाचे स्वप्न स्वप्नातही पडत नाही. मला फक्त दिसतोय माझा देश, माझी भारतमाता आणि या भारतमातेच्या बाजूला असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं संविधान, घटना ते आम्हाला वाचवायचं आहे. कोणालाही मतदान करायचं म्हणून मत द्यायचे नाही. हे मत तुम्ही स्वत: तुमच्या पुढच्या पिढीसाठी देणार आहात. पुढच्या पिढी भलेही तुरुंगात नाही टाकल्या तरी संपूर्ण देशाचा तुरुंग झाला तर त्या वातावरणात तुमच्या पिढीने जगावं अशी तुमची इच्छा असेल तर जरुर तुम्ही हुकुमशाहीला मतदान करा. नाहीतर इंडिया आघाडी जी देशभक्तांची आघाडी आहे तिला तुम्ही मतदान करा असं आवाहन त्यांनी केले. 

तसेच  आज मी काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेलो, शेकाप आपल्या सोबत आहे. अनंत गीते यांचा गेल्यावेळी पराभव झाला. परंतु मी रायगडला धन्यवाद देतो, कारण त्यावेळीही रायगड मोदीलाटेत वाहून गेला नाही. आत निवडून आलेला मोदी  लाटेत गेला परंतु आमचा रायगड तिथेच आहे. आज रायगडकर खुश झालेत. आता तर आपण हुकुमशाहीविरोधात उभे राहिलो आहोत. रायगडमध्ये जास्त प्रचार करण्याचीही गरज भासणार नाही. गेल्यावेळी इतके करूनही रायगडकरांनी मोदींविरोधात मतदान केले होते. यावेळी तर मोदींविरोधात त्सुनामीने मतदान होणार आहे अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी खासदार सुनील तटकरेंना टोला लगावला. 

दरम्यान, आज आपण इथं संवाद साधतोय, त्याचवेळी या मोदी सरकारनं त्यांचा शेवटचा अर्थसंकल्प सादर केला आहे. निर्मला सीतारामन यांचे मी आभार मानतो, यापुढे आम्ही देशात चार जातींसाठी काम करणार, गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी असं त्या बोलल्या. त्यांनी मोठे धाडस केले आहे. पंतप्रधानासमोर हे बोलण्याचे धाडस दाखवले म्हणून सीतारामन यांचं कौतुक आहे. निवडणुका आल्या म्हणून तुमच्या सूटबूटातील मित्रांव्यतिरिक्त देश आहे हे कळाले. गेल्या १० वर्षापासून या वर्गावर तुमचे लक्ष नव्हते. महिलांकडे लक्ष देता मग मणिपूरमध्ये का जात नाही. निवडणुकीत महिलांची मते हवीत म्हणून आता महिलांसाठी काम करतो हे बोलले जाते. उत्तरेकडील शेतकऱ्यांनी थंडी, ऊन वारा पाऊस कशाची पर्वा न करता सहा महिने आंदोलन केले. तेव्हा तुम्ही त्यांना अतिरेकी ठरवलं आणि आता निवडणूक आल्यावर ते शेतकरी झाले. या सर्व भूलथापा आणि थोतांड आहे. अजूनही जादूचे प्रयोग होत असतील. पण पाहिले नसतील तर दिल्लीत अजून जादूचे प्रयोग सुरू आहेत. अर्थसंकल्प म्हणजे जनतेला टोपी घालण्याचा प्रकार आहे. मतदान झाल्यानंतर सिलेंडरच्या किंमती दुपटीने वाढवतील. गेल्या १० वर्षात तरुणांना नोकरी का दिली नाही. १० वर्ष तुम्ही काय केले? आम्हाला आता तुमच्या फसव्या अर्थसंकल्पाची गरज नाही अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारच्या अर्थसंकल्पावर केली.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपा