शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
4
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
5
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
6
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
7
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
8
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
9
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
10
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
11
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
12
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
13
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
14
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
15
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
16
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
17
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
18
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
19
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
20
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

"अहो, मी पंतप्रधानपदाचं स्वप्न बघू की नको"; उद्धव ठाकरेंची कोपरखळी, लोकही हसले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2024 14:10 IST

आज आपण इथं संवाद साधतोय, त्याचवेळी या मोदी सरकारनं त्यांचा शेवटचा अर्थसंकल्प सादर केला आहे असा टोला ठाकरेंनी लगावला.

रायगड - Uddhav Thackeray on BJP ( Marathi News ) आम्ही लढतोय, अनंत गीतेंनी माझी पंचाईत केली. उद्धव ठाकरेंच पुन्हा मुख्यमंत्री होणार. अहो मी, पंतप्रधानपदाचे स्वप्न बघू की नको असा प्रश्न पडलाय अशी कोपरखळी उद्धव ठाकरे यांनी सभेत मांडली तेव्हा लोकही हसले. रायगडच्या पेण येथे उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभा घेत भाजपासह स्थानिक खासदार सुनील तटकरे यांच्यावरही निशाणा साधला. 

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, मला अशी स्वप्न पडत नाहीत. ना मुख्यमंत्रिपदाचे पडले होते ना पंतप्रधानपदाचे स्वप्न स्वप्नातही पडत नाही. मला फक्त दिसतोय माझा देश, माझी भारतमाता आणि या भारतमातेच्या बाजूला असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं संविधान, घटना ते आम्हाला वाचवायचं आहे. कोणालाही मतदान करायचं म्हणून मत द्यायचे नाही. हे मत तुम्ही स्वत: तुमच्या पुढच्या पिढीसाठी देणार आहात. पुढच्या पिढी भलेही तुरुंगात नाही टाकल्या तरी संपूर्ण देशाचा तुरुंग झाला तर त्या वातावरणात तुमच्या पिढीने जगावं अशी तुमची इच्छा असेल तर जरुर तुम्ही हुकुमशाहीला मतदान करा. नाहीतर इंडिया आघाडी जी देशभक्तांची आघाडी आहे तिला तुम्ही मतदान करा असं आवाहन त्यांनी केले. 

तसेच  आज मी काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेलो, शेकाप आपल्या सोबत आहे. अनंत गीते यांचा गेल्यावेळी पराभव झाला. परंतु मी रायगडला धन्यवाद देतो, कारण त्यावेळीही रायगड मोदीलाटेत वाहून गेला नाही. आत निवडून आलेला मोदी  लाटेत गेला परंतु आमचा रायगड तिथेच आहे. आज रायगडकर खुश झालेत. आता तर आपण हुकुमशाहीविरोधात उभे राहिलो आहोत. रायगडमध्ये जास्त प्रचार करण्याचीही गरज भासणार नाही. गेल्यावेळी इतके करूनही रायगडकरांनी मोदींविरोधात मतदान केले होते. यावेळी तर मोदींविरोधात त्सुनामीने मतदान होणार आहे अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी खासदार सुनील तटकरेंना टोला लगावला. 

दरम्यान, आज आपण इथं संवाद साधतोय, त्याचवेळी या मोदी सरकारनं त्यांचा शेवटचा अर्थसंकल्प सादर केला आहे. निर्मला सीतारामन यांचे मी आभार मानतो, यापुढे आम्ही देशात चार जातींसाठी काम करणार, गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी असं त्या बोलल्या. त्यांनी मोठे धाडस केले आहे. पंतप्रधानासमोर हे बोलण्याचे धाडस दाखवले म्हणून सीतारामन यांचं कौतुक आहे. निवडणुका आल्या म्हणून तुमच्या सूटबूटातील मित्रांव्यतिरिक्त देश आहे हे कळाले. गेल्या १० वर्षापासून या वर्गावर तुमचे लक्ष नव्हते. महिलांकडे लक्ष देता मग मणिपूरमध्ये का जात नाही. निवडणुकीत महिलांची मते हवीत म्हणून आता महिलांसाठी काम करतो हे बोलले जाते. उत्तरेकडील शेतकऱ्यांनी थंडी, ऊन वारा पाऊस कशाची पर्वा न करता सहा महिने आंदोलन केले. तेव्हा तुम्ही त्यांना अतिरेकी ठरवलं आणि आता निवडणूक आल्यावर ते शेतकरी झाले. या सर्व भूलथापा आणि थोतांड आहे. अजूनही जादूचे प्रयोग होत असतील. पण पाहिले नसतील तर दिल्लीत अजून जादूचे प्रयोग सुरू आहेत. अर्थसंकल्प म्हणजे जनतेला टोपी घालण्याचा प्रकार आहे. मतदान झाल्यानंतर सिलेंडरच्या किंमती दुपटीने वाढवतील. गेल्या १० वर्षात तरुणांना नोकरी का दिली नाही. १० वर्ष तुम्ही काय केले? आम्हाला आता तुमच्या फसव्या अर्थसंकल्पाची गरज नाही अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारच्या अर्थसंकल्पावर केली.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपा