शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले...
2
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
3
छत्रपती संभाजीनगरात खंडपीठाला बॉम्बने उडवण्याची धमकी; कोर्टात शोध मोहीम, पोलिस अलर्ट
4
'पाच दिवसांत व्हिडीओ काढून टाका...', दिल्ली उच्च न्यायालयाचा रामदेव बाबांना दणका
5
पुन्हा परतला कोरोना, महाराष्ट्राशेजारील या राज्यात एका महिलेच्या मृत्यूने खळबळ, सापडले एवढे रुग्ण
6
रस्त्याच्या कामासाठी लावलेलं लोखंडी बॅरिकेड वृद्ध महिलेवर कोसळलं, थरारक व्हिडिओ व्हायरल!  
7
एक बायको गावात, दुसरी शहरात! नववधूची १५ दिवसांत फसवणूक; पतीने गर्लफ्रेंडशी केलं लग्न
8
कामावरून घरी परतला अन् पत्नीचा मृतदेह पाहून हादरला; विक्रोळीतील खळबळजनक घटना
9
"संसद सर्वोच्च आहे, तिच्या वर कोणीही नाही"; टीकेनंतरही उपराष्ट्रपती जगदीप धनखड मतावर ठाम
10
सोन्याची किंमत पहिल्यांदाच १ लाख रुपयांच्या पुढे! तुमच्या शहरात एका तोळ्याचा भाव काय?
11
'हिंदी भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती', भाजप मनसेमध्ये शिलगला वाद, शिवसेना भवनाच्या अंगणात एकमेकांवर वॉर
12
Chanakyaniti: 'या' तीन गोष्टी कायम गुपित ठेवा, नाहीतर अडचणीत याल!- आचार्य चाणक्य!
13
धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयाच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू? अंजली दमानियांच्या आरोपाने खळबळ 
14
Karnataka Murder: "मानेची नस कापल्यामुळे कसा होतो मृत्यू?"; माजी डीजीपींच्या हत्येपूर्वी पत्नीने फोनवर केलेलं सर्च
15
"मी सर्व मर्यादा पार केल्या", 'त्या' विधानानंतर अनुराग कश्यपने मागितली ब्राह्मण समाजाची माफी
16
₹१,००० ची म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बनवू शकते कोट्यधीश, फक्त करावं लागेल 'हे' काम
17
मनी लाँड्रिंग म्हणजे नेमकं काय? अभिनेता महेश बाबू यांच्या प्रकरणातून समजून घ्या; का आली ईडीची नोटीस?
18
जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना ठरले जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, मिळाला मोठा सन्मान!
19
Palmistry: तळहाताच्या 'या' उंचवट्यावर तीळ, हे तर राजयोग प्राप्त होण्याचे लक्षण!
20
कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी रिकव्हरी एजंट घरी येऊ शकतात का? काय सांगतो कायदा

'...हे गृहमंत्र्यांना माहित आहे का?', बालाजी तांदळेंचा उल्लेख, दमानियांचे फडणवीसांना दोन सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 10:43 IST

Anjali Damania Devendra Fadnavis: संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाबद्दल नाराजी व्यक्त मस्साजोगच्या ग्रामस्थांनी अन्नात्याग उपोषण सुरू केलं आहे. या आंदोलनाकडे अंजली दमानिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले आहे. 

Anjali Damania Devendra Fadnavis News: 'तपास किती अयोग्य पद्धतीने झाला याची माहिती तरी मुख्यमंत्र्यांना आहे का?', असा संतप्त सवाल करत अंजली दमानिया यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या मुद्द्यावरून महायुती सरकारला घेरले आहे. मस्साजोगच्या ग्रामस्थांनी अन्नत्याग उपोषण सुरू केल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दोन सवाल केले आहेत. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

संतोष देशमुख हत्या प्रकरणाला तीन महिने लोटले तरी तपास कोणतीही प्रगती नसल्याचे सांगत देशमुख कुटुंबीय आणि मस्साजोगच्या ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. आठ मागण्या सरकारकडे करण्यात आलेल्या आहेत. मागण्या मान्य न झाल्यास पाणीही न पिण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

२५ फेब्रुवारीपासून मस्साजोगमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू झाले. या आंदोलनाकडे अंजली दमानिया यांनी महायुती सरकारचे लक्ष वेधले आहे. अंजली दमानिया यांनी एक पोस्ट करत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दोन सवाल केले आहेत.  

अंजली दमानियांच्या पोस्टमध्ये काय?

"आज मस्साजोगच्या सगळ्या ग्रामस्थांना अन्नत्याग आंदोलन करताना बघून खूप दुःख होतय. सामान्य माणूस असणं गुन्हा आहे. तुम्ही मंत्री संत्री असाल, तर सगळी यंत्रणा कामाला लागते. तुम्ही साधे सरपंच असाल तर तुमच्या परिवारला न्याय मागण्यासाठी अन्नत्याग आंदोलन करावं लागतं", असा संताप अंजली दमानियांनी व्यक्त केला. 

देवेंद्र फडणवीस यांना दोन सवाल

"आजतागायत पोलिसांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन महाराष्ट्राला माहिती दिली नाही. तीन महिने होत आले, तरी एक आरोपी सापडत नाही. वकिलांची नियुक्ती होत नाही. तपास किती अयोग्य पद्धतीने झाला याची माहिती तरी मुख्यमंत्र्यांना आहे का? बालाजी तांदळेला घेऊन पोलीस फिरत होते, हे गृहमंत्र्यांना माहित आहे का?", असे सवाल करत "कृपाकरून त्या ग्रामस्थांना न्याय द्या", अशी मागणी अंजली दमानियांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. 

आठ मागण्यांसाठी अन्नात्याग आंदोलन

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना मदत करणाऱ्यांना सहआरोपी करणे, ज्या पोलिसांनी मदत केलीये, त्यांना बडतर्फ करून सहआरोपी करणे, दोन सायबर तज्ज्ञांचा चौकशी पथकामध्ये समावेश करणे, उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करणे, कृष्णा आंधळेला लवकरात लवकर अटक करणे यासह आठ मागण्या मस्साजोगच्या ग्रामस्थांच्या आहेत.

टॅग्स :Santosh Deshmukhसंतोष देशमुखanjali damaniaअंजली दमानियाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBeedबीडMaharashtraमहाराष्ट्र