शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

'...हे गृहमंत्र्यांना माहित आहे का?', बालाजी तांदळेंचा उल्लेख, दमानियांचे फडणवीसांना दोन सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 10:43 IST

Anjali Damania Devendra Fadnavis: संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाबद्दल नाराजी व्यक्त मस्साजोगच्या ग्रामस्थांनी अन्नात्याग उपोषण सुरू केलं आहे. या आंदोलनाकडे अंजली दमानिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले आहे. 

Anjali Damania Devendra Fadnavis News: 'तपास किती अयोग्य पद्धतीने झाला याची माहिती तरी मुख्यमंत्र्यांना आहे का?', असा संतप्त सवाल करत अंजली दमानिया यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या मुद्द्यावरून महायुती सरकारला घेरले आहे. मस्साजोगच्या ग्रामस्थांनी अन्नत्याग उपोषण सुरू केल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दोन सवाल केले आहेत. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

संतोष देशमुख हत्या प्रकरणाला तीन महिने लोटले तरी तपास कोणतीही प्रगती नसल्याचे सांगत देशमुख कुटुंबीय आणि मस्साजोगच्या ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. आठ मागण्या सरकारकडे करण्यात आलेल्या आहेत. मागण्या मान्य न झाल्यास पाणीही न पिण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

२५ फेब्रुवारीपासून मस्साजोगमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू झाले. या आंदोलनाकडे अंजली दमानिया यांनी महायुती सरकारचे लक्ष वेधले आहे. अंजली दमानिया यांनी एक पोस्ट करत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दोन सवाल केले आहेत.  

अंजली दमानियांच्या पोस्टमध्ये काय?

"आज मस्साजोगच्या सगळ्या ग्रामस्थांना अन्नत्याग आंदोलन करताना बघून खूप दुःख होतय. सामान्य माणूस असणं गुन्हा आहे. तुम्ही मंत्री संत्री असाल, तर सगळी यंत्रणा कामाला लागते. तुम्ही साधे सरपंच असाल तर तुमच्या परिवारला न्याय मागण्यासाठी अन्नत्याग आंदोलन करावं लागतं", असा संताप अंजली दमानियांनी व्यक्त केला. 

देवेंद्र फडणवीस यांना दोन सवाल

"आजतागायत पोलिसांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन महाराष्ट्राला माहिती दिली नाही. तीन महिने होत आले, तरी एक आरोपी सापडत नाही. वकिलांची नियुक्ती होत नाही. तपास किती अयोग्य पद्धतीने झाला याची माहिती तरी मुख्यमंत्र्यांना आहे का? बालाजी तांदळेला घेऊन पोलीस फिरत होते, हे गृहमंत्र्यांना माहित आहे का?", असे सवाल करत "कृपाकरून त्या ग्रामस्थांना न्याय द्या", अशी मागणी अंजली दमानियांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. 

आठ मागण्यांसाठी अन्नात्याग आंदोलन

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना मदत करणाऱ्यांना सहआरोपी करणे, ज्या पोलिसांनी मदत केलीये, त्यांना बडतर्फ करून सहआरोपी करणे, दोन सायबर तज्ज्ञांचा चौकशी पथकामध्ये समावेश करणे, उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करणे, कृष्णा आंधळेला लवकरात लवकर अटक करणे यासह आठ मागण्या मस्साजोगच्या ग्रामस्थांच्या आहेत.

टॅग्स :Santosh Deshmukhसंतोष देशमुखanjali damaniaअंजली दमानियाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBeedबीडMaharashtraमहाराष्ट्र