शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

आम्ही दोघे भाऊ एकत्र आल्याने कुणाला काही प्रॉब्लेम आहे का? त्यांची पोटदुखी त्यांनी सांभाळावी: उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 11:42 IST

आम्ही दोघे मिळून महाराष्ट्राचे स्वप्न साकार करू. योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ, असे उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या मुखपत्राला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले.

मुंबई : ‘‘आम्ही दोघे भाऊ एकत्र आल्याने कुणाला काही प्रॉब्लेम आहे का? त्यांची पोटदुखी त्यांनी सांभाळाव्यात. आम्ही दोघे मिळून महाराष्ट्राचे स्वप्न साकार करू. योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ, असे उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या मुखपत्राला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का? या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही भूमिका मांडली. आमच्या एकत्र येण्यामुळे केवळ मराठी माणसांनाच नाही, तर इतर भाषिकांनासुद्धा आनंद झाला. अगदी मुसलमान बांधवांनादेखील आनंद झाला. ते जाहीरपणाने आनंद व्यक्त करताहेत. गुजराती आणि हिंदी इतर भाषिकसुद्धा म्हणाले, ‘अच्छा किया आपने’. त्यांना झालेला हा आनंद मी बघतो. पण कोणाला पोटशूळ झालाच असेल तर तो पोटशूळ त्याच्याकडे. त्याकडे मी दुर्लक्ष करतो. आता मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्यासाठी कोणाची माय व्यायली आहे बघूच, असा इशारा त्यांनी दिला.

मंत्र्यांच्या भानगडी मोडीत काढा; मुख्यमंत्र्यांना सल्ला   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकाऱ्यांच्या आणि मंत्र्यांच्या भानगडी, लफडी बाहेर येत आहेत, ते मुख्यमंत्र्यांनी मोडीत काढायला हवे. हे मी त्यांना आमचे कधी काळीचे राजकीय मित्र म्हणून सांगतो. त्यांनी हे माझे मत टोमणा म्हणून नाही, तर सल्ला म्हणून घ्यावे, असेही ठाकरे म्हणाले.  हे आधीच स्पष्ट करतो. ते नीती वगैरे सगळ्या गोष्टी पाळत असतील, तर हे जे काही आजूबाजूला चाललेले आहे, ते त्यांच्या प्रतिमेला तडा देण्याचे काम आहे. कुठे ३ हजार कोटींची चोरी सर्वोच्च न्यायालय पकडून देत आहे. हे सगळे जे काही चालले आहे, याचे प्रमुख म्हणून बदनाम फडणवीस होत आहेत, असे ठाकरे एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले. 

‘कदाचित शिंदे-ठाकरेही मिठी मारतील’ राज ठाकरेंनी शिवसेना सोडल्यानंतर हे दोघे एकमेकांकडे बघत नव्हते, बोलत नव्हते. ५ जुलैला आलिंगन घातले. कदाचित हाच प्रसंग भविष्यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातही  होऊ शकतो, असे शिंदेसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले. 

‘...तेव्हाच ठाकरे ब्रँड संपलेला आहे’ बाळासाहेब ठाकरे होते, तेव्हाची गोष्ट वेगळी होती. मात्र, काही जण जेव्हा काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले, तेव्हाच ठाकरे ब्रँड संपलेला आहे. प्रश्न यांचेच, उत्तरे यांचीच ही कसली मुलाखत? अशी टीका जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केली.

काचेच्या घरात राहणाऱ्यांनी इतरांवर दगड मारू नये; शिंदेंनी दिला इशारा

काचेच्या घरात राहणाऱ्यांनी इतरांवर दगड मारू नये, असा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धवसेनेला दिला. उद्धवसेनेच्या नेत्यांनी शिंदेसेनेचे रामदास कदम आणि गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर अधिवेशनात आरोप केले होते. याचा एकनाथ शिंदे यांनी रविवारी समाचार घेतला. गोरेगावमधील नेस्को येथे ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत सिद्धेश कदम यांनी आयोजित केलेल्या विशेष शिबिरात ते बोलत होते. 

त्यांच्या पोटात दुखते!शिंदे म्हणाले, निवडणुका आल्या की काही लोक बदनामीची खेळी खेळतात. त्यांच्या पोटात दुखते कारण त्यांनी इतकी वर्षे मराठी माणसांसाठी काही केले नाही. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते की ४० लाख घरे मराठी माणसाला मिळायला हवीत. आम्ही हे स्वप्न पुढे नेत आहोत. ३५ लाख घरे उभारण्याचे काम सुरू केले आहे. मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही; पण प्रत्येकाच्या हातात तो देण्याची माझी इच्छा आहे, असेही शिंदे म्हणाले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेनाinterviewमुलाखत