शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

सगळ्या पक्षाला संपवून तुम्हाला एकट्याला जिवंत राहायचंय का?; रामदास कदमांचा भाजपाला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2024 08:27 IST

गेल्या काही वर्षांपासून या मतदारसंघावर उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांचा डोळा आहे

मुंबई - Shivsena Ramdas Kadam on BJP ( Marathi News ) आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युती, आघाडीच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. परंतु अजूनही काही जागांवरून रस्सीखेच सुरू आहे. त्यात कोकणातील रत्नागिरी - सिंधुदुर्ग या जागेवर भाजपा-शिवसेना दोन्ही पक्षांनी दावा केला आहे. उदय सामंत यांनी ज्या जागेवर शिवसेनेचा खासदार आहे त्या जागेवर आमचा दावा आहे असं म्हटलं. त्यानंतर नारायण राणेंनी रत्नागिरी सिंधुदुर्ग ही जागा भाजपाची असून इथं भाजपाचा उमेदवार देऊ असं सांगितले. त्यावरून आता रामदास कदमांनी निशाणा साधला आहे. 

शिवसेना नेते रामदास कदम म्हणाले की, रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचे विद्यमान खासदार हे शिवसेनेचे आहेत. तुम्हाला सगळ्या पक्षाला संपवून एकट्या भाजपाला जिवंत राहायचं आहे का? असा निष्कर्ष निघेल. कुठल्याही परिस्थितीत रत्नागिरीची जागा आम्ही सोडणार नाही. आम्ही ती जागा लढवणार. आता जे खासदार आहेत त्यांची शेवटची सभा मी घेतली होती. ही आमच्या हक्काची जागा आहे ती का सोडायची? असा सवाल त्यांनी केला. 

तसेच आमच्यात अजिबात फूट पडणार नाही. प्रत्येकाला माझा पक्ष मोठा झाला पाहिजे असं वाटते. त्यामुळे जमलं तर जमलं असा प्रयत्न करायला कुणाची हरकत नसते. माझे ते माझे आणि तुझे तेही माझे असं कधी होत नसते असा टोलाही रामदास कदमांनी भाजपाला लगावला आहे. 

गेल्या काही वर्षांपासून या मतदारसंघावर उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांचा डोळा आहे. तर राणे पुत्र काही केल्या हा मतदारसंघ सोडायला तयार नाहीत. राज्यसभा निवडणुकीत नारायण राणेंना उमेदवारी न दिल्याने या मतदारसंघातून त्यांनाच उभे केले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. यावरून शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी शिवसेनेचाच हा मतदारसंघ असल्याची वक्तव्ये केली होती. यावर नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिले होते. आता रामदास कदमांनी भाजपाला सवाल केला आहे. 

टॅग्स :Ramdas Kadamरामदास कदमBJPभाजपाratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्गShiv Senaशिवसेना