शहरं
Join us  
Trending Stories
1
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
2
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
3
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
4
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
5
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
6
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
7
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
8
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
9
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
10
स्वाती मालिवाल यांच्यासोबत गैरवर्तन झालं, AAP ने दिली कबुली, दोषींवर केजरीवाल करणार कठोर कारवाई
11
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
12
T20 World Cup मध्ये भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी! ICC च्या नियमामुळे गोंधळ 
13
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
14
लवंगाचे पाणी आरोग्यासाठी रामबाण, मिळतील आश्चर्यकारक फायदे!
15
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
16
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."
17
Narendra Modi : "केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला
18
सैन्यातील नोकरी सोडून गाझातल्या लोकांच्या मदतीसाठी धावले; इस्रायलच्या हल्ल्यात वैभव काळेंचा मृत्यू
19
Akhilesh Yadav : "भाजपाने Google वर 100 कोटींचा प्रचार करण्याचा रेकॉर्ड केला... हा जनतेचा पैसा"
20
यामिनी जाधव, वायकरांना उमेदवारी का दिली? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'त्यांची चूक असती तर मी...'

चिंता नको; पाऊस गाठणार सरासरी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 3:41 AM

कमी दाबाचा पट्टा मध्यप्रदेश, गुजरातकडे सरकल्याने राज्यात पावसाने ओढ दिली असली तरी चिंता करण्याचे कारण नाही. देशभरात सप्टेंबरपर्यंत सरासरी ९४ ते १०६ टक्के पाऊस पडेल, असा सुधारित दीर्घकालीन अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.

पुणे : कमी दाबाचा पट्टा मध्यप्रदेश, गुजरातकडे सरकल्याने राज्यात पावसाने ओढ दिली असली तरी चिंता करण्याचे कारण नाही. देशभरात सप्टेंबरपर्यंत सरासरी ९४ ते १०६ टक्के पाऊस पडेल, असा सुधारित दीर्घकालीन अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. आॅगस्टमध्येदेखील सरासरीच्या ९९ टक्के पाऊस पडेल.जूनमध्ये वाट बघायला लावणाºया पावसाने जुलैमध्ये कसर भरुन काढली. राज्यात सर्वदूर धो-धो बरसलेल्या आषाढसरींनी रखडलेल्या पेरण्या पूर्ण झाल्या. परंतु, श्रावण सुरू झाल्यानंतर पुन्हा एकदा पावसाने दांडी मारली आहे. अजून दहा दिवस तरी पाऊस विश्रांती घेईल, असा अंदाज आहे. त्यामुळे काहिसे चिंतेचे ढग जमा झाले असतानाच या सुधारित अंदाजाने दिलासा मिळाला आहे.राज्यात गेल्या नऊ दिवसांत नागपूर आणि भंडारा जिल्हा वगळता औरंगाबाद, अमरावती, पुणे आणि नाशिक विभागात सरासरीच्या २० टक्के देखील पाऊस झालेला नाही. कोकण विभागात सर्वाधिक ४० टक्के पावसाची नोंद झाली आहे. मराठवाड्यातील पावसाची ओढ अधिक चिंताजनक आहे. औरंगाबाद विभागाची अ‍ॅगस्टमधील पहिल्या नऊ दिवसाची सरासरी ५७.३ मिलिमीटर असून, त्या तुलनेत केवळ ५.१ (८.९ टक्के) मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. अमरावती विभागातही केवळ ७.९ (१३ टक्के) मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.