शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

समाजात अस्वस्थता पसरविण्याचा प्रयत्न नको -चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 05:41 IST

मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात राज्य सरकारने पुढाकार घेत अनेक निर्णय घेतले. सरकारच्या या निर्णयांवर आणि प्रयत्नांवर मराठा समाज समाधानी आहे. मात्र, काही असंतुष्ट नेते जाणीवपूर्वक समाजात अस्वस्थता निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहेत.

मुंबई - मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात राज्य सरकारने पुढाकार घेत अनेक निर्णय घेतले. सरकारच्या या निर्णयांवर आणि प्रयत्नांवर मराठा समाज समाधानी आहे. मात्र, काही असंतुष्ट नेते जाणीवपूर्वक समाजात अस्वस्थता निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहेत. मराठा समाजाच्या मागण्यांच्या नावाखाली असे प्रकार करणाऱ्या तथाकथित मराठा नेत्यांचा बोलविता धनी कोण, त्यांना कोण पैसा पुरवितो याची सरकारला पूर्ण माहिती आहे. त्यामुळे अशा नेत्यांना वेळीच सावरावे, अशा शब्दांत महसूल मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी गुरुवारी मराठा नेत्यांना तंबी दिली.मराठा समाजाच्या मागण्यांवर राज्य सरकारने केलेल्या कार्यवाहीची माहिती देण्यासाठी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील बोलत होते. मुंबईसह महाराष्ट्रात मराठा समाजाचे ५९ मोर्चे निघाले. समाजाच्या मागण्यांसंदर्भात सरकारने स्वत: पुढाकार घेतला आणि विविध निर्णय घेतले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडली जाईल. मात्र, न्यायालयाच्या निकालाची वाट न पाहता सरकारने समाजातील तरुण-तरुणींच्या शिक्षणासाठी सोयीसुविधा, आर्थिक सवलती, उद्योगांसाठी बिनव्याजाचे कर्ज उपलब्ध करून देण्याचे विविध निर्णय घेतले. सरकारच्या या विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी मराठा नेत्यांनी प्रयत्न करायला हवेत. आम्ही आमच्याच जिल्ह्यात काही करणार नाही आणि वर विरोधाची भाषा बोलणार, हा प्रकार योग्य नाही. मराठा समाजाच्या विकासासाठी केली जाणारी प्रत्येक सकारात्मक सूचना सरकारने स्वीकारली आहे. सरकारच्या प्रयत्नांना मराठा समाजाचा पूर्ण पाठिंबा आहे. मराठा जनाधार तुटण्याच्या भीतीमुळेच नवे नवे नेते जाळपोळ, तोडफोडीची भाषा करत पुढे येत आहेत, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला. अशा नव्या नेत्यांचा बोलविता धनी कोण, त्यांना पैसा कोण पुरवितो याची बितंबातमी सरकारकडे असल्याचा इशाराही पाटील यांनी दिला. मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या फी माफी आणि शिष्यवृत्तीसाठी ईबीसी मर्यादा सरकारने एक लाखावरून आधी सहा आणि नंतर आठ लाखांवर नेली. बार्टीच्या धर्तीवर ‘सारथी’ची स्थापना केली आहे. त्यासाठी नेमलेल्या सदानंद मोरे समितीच्या शिफारशीही सरकारने स्वीकारल्या, असे ते म्हणाले.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारmarathaमराठा