शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
2
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
3
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
4
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
5
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
6
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
7
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
8
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
9
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
10
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
11
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
12
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
13
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
14
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
15
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
16
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
17
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
18
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
19
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
20
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प

कंत्राटी सफाई कामगारांना ‘गुलामा’प्रमाणे वागवू नका

By admin | Updated: December 23, 2016 05:22 IST

समाजातील एका वर्गासाठी स्वच्छता राखण्याकरिता दुसऱ्या वर्गाला गुलाम केले जाऊ शकत नाही. शहर स्वच्छ ठेवणे, हे महापालिकेचे

मुंबई : समाजातील एका वर्गासाठी स्वच्छता राखण्याकरिता दुसऱ्या वर्गाला गुलाम केले जाऊ शकत नाही. शहर स्वच्छ ठेवणे, हे महापालिकेचे कर्तव्य आहे तर स्वच्छ वातावरणात वावरणे, हा नागरिकांचा अधिकार आहे. मात्र कर्तव्य आणि अधिकारामध्ये काही लोकांना सन्मानपूर्वक जगण्याच्या अधिकारापासून वंचित ठेवले जाऊ शकत नाही, अशा शब्दांत मुंबई महापालिकेला सुनावत उच्च न्यायालयाने सध्या कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या २७०० सफाई कामगारांना कायमस्वरूपी पद्धतीने घेण्याचा आदेश महापालिकेला दिला. कचरा वाहतूक श्रमिक संघातील २७०० सफाई कामगारांना कायमस्वरूपी कामगार म्हणून सेवेत रुजू करण्याचा आदेश आॅक्टोबर २०१४ मध्ये औद्योगिक लवादाने महापालिकेला दिला. या आदेशाला महापालिकेने उच्च न्यायालयात आव्हान दिले. न्या. नितीन जामदार यांच्या खंडपीठापुढे या अपिलावरील सुनावणी होती.महापालिकेकडे पुरेसा निधी नसल्याने या सर्व कंत्राटी सफाई कामगारांना कायमस्वरूपी करणे शक्य नसल्याचे महापािलकेने उच्च न्यायालयाला सांगितले. तसेच हे कंत्राटी कामगार नसून एका एनजीओचे स्वयंसेवक असल्याचा दावा, महापालिकेने केला. मात्र हा दावा उच्च न्यायालयाने खोडून काढला.‘हे २,७०० सफाई कामगार २८,००० कायमस्वरूपी सफाई कामगारांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. कायमस्वरूपी कामगारांना सर्व लाभ दिले जातात. मात्र कंत्राटी कामगारांना यापासून वंचित ठेवले जाते. त्यांना वर्षातून केवळ चारच सुट्या दिल्या जातात. ते ज्या पद्धतीने राहतात आणि त्यांना ज्याप्रकारे काम करायला भाग पाडले जाते ते निश्चितच सन्मानजनक नाही. त्यांना राहण्यासाठी जागा नाही, वैद्यकीय सुविधा दिल्या जात नाहीत. शौचालय, पाणी यांसारख्या त्यांच्या मूलभूत गरजाही भागवल्या जात नाहीत. ही वागणूक अमानवीय आहे,’ असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले. कंत्राटदार आहे म्हणून कंत्राटी पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जाऊ शकत नाही, असे म्हणता येणार नाही. महापालिका या कामगारांचे व्यवस्थापन करते. त्यामुळे त्यांना कर्तव्यातून सवलत मिळू शकत नाही. निधीच्या अभावामुळे संबंधित कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी करू शकत नाही, ही सबब महापालिका पुढे करू शकत नाही. कारण शहर स्वच्छ ठेवणे, हे महापालिकेचे कर्तव्य आहे आणि त्यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ व अन्य सुविधा उपलब्ध करण्यासाठी महापालिकेने निधी उपलब्ध केलाच पाहिजे, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने महापालिकेला सुनावत संबंधित कामगार महापालिकेच्या सेवेत रुजू झाल्याच्या २४० दिवसांनंतर त्यांना कायमस्वरूपी कामगार म्हणून वागवण्याचे व त्याचे सर्व लाभ पूर्वलक्षित प्रभावाने देण्याचा आदेश महापालिकेला दिला. (प्रतिनिधी)