शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
2
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
3
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
4
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
5
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
6
ऐकावं ते नवलच! नवरदेवाने हुंडा स्वीकारण्यास दिला नकार, सासऱ्याने मोडलं लग्न; नेमकं काय घडलं?
7
रिलेशनशिपची चर्चा, यशस्वीची ती कथित गर्लफ्रेंड कोण? नात्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट
8
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
9
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
10
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
11
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
12
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
13
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
14
नवा ट्रेंड! मूल नको, पण कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, देशात का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
15
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
16
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
17
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
18
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
19
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली
20
Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त

कंत्राटी सफाई कामगारांना ‘गुलामा’प्रमाणे वागवू नका

By admin | Updated: December 23, 2016 05:22 IST

समाजातील एका वर्गासाठी स्वच्छता राखण्याकरिता दुसऱ्या वर्गाला गुलाम केले जाऊ शकत नाही. शहर स्वच्छ ठेवणे, हे महापालिकेचे

मुंबई : समाजातील एका वर्गासाठी स्वच्छता राखण्याकरिता दुसऱ्या वर्गाला गुलाम केले जाऊ शकत नाही. शहर स्वच्छ ठेवणे, हे महापालिकेचे कर्तव्य आहे तर स्वच्छ वातावरणात वावरणे, हा नागरिकांचा अधिकार आहे. मात्र कर्तव्य आणि अधिकारामध्ये काही लोकांना सन्मानपूर्वक जगण्याच्या अधिकारापासून वंचित ठेवले जाऊ शकत नाही, अशा शब्दांत मुंबई महापालिकेला सुनावत उच्च न्यायालयाने सध्या कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या २७०० सफाई कामगारांना कायमस्वरूपी पद्धतीने घेण्याचा आदेश महापालिकेला दिला. कचरा वाहतूक श्रमिक संघातील २७०० सफाई कामगारांना कायमस्वरूपी कामगार म्हणून सेवेत रुजू करण्याचा आदेश आॅक्टोबर २०१४ मध्ये औद्योगिक लवादाने महापालिकेला दिला. या आदेशाला महापालिकेने उच्च न्यायालयात आव्हान दिले. न्या. नितीन जामदार यांच्या खंडपीठापुढे या अपिलावरील सुनावणी होती.महापालिकेकडे पुरेसा निधी नसल्याने या सर्व कंत्राटी सफाई कामगारांना कायमस्वरूपी करणे शक्य नसल्याचे महापािलकेने उच्च न्यायालयाला सांगितले. तसेच हे कंत्राटी कामगार नसून एका एनजीओचे स्वयंसेवक असल्याचा दावा, महापालिकेने केला. मात्र हा दावा उच्च न्यायालयाने खोडून काढला.‘हे २,७०० सफाई कामगार २८,००० कायमस्वरूपी सफाई कामगारांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. कायमस्वरूपी कामगारांना सर्व लाभ दिले जातात. मात्र कंत्राटी कामगारांना यापासून वंचित ठेवले जाते. त्यांना वर्षातून केवळ चारच सुट्या दिल्या जातात. ते ज्या पद्धतीने राहतात आणि त्यांना ज्याप्रकारे काम करायला भाग पाडले जाते ते निश्चितच सन्मानजनक नाही. त्यांना राहण्यासाठी जागा नाही, वैद्यकीय सुविधा दिल्या जात नाहीत. शौचालय, पाणी यांसारख्या त्यांच्या मूलभूत गरजाही भागवल्या जात नाहीत. ही वागणूक अमानवीय आहे,’ असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले. कंत्राटदार आहे म्हणून कंत्राटी पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जाऊ शकत नाही, असे म्हणता येणार नाही. महापालिका या कामगारांचे व्यवस्थापन करते. त्यामुळे त्यांना कर्तव्यातून सवलत मिळू शकत नाही. निधीच्या अभावामुळे संबंधित कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी करू शकत नाही, ही सबब महापालिका पुढे करू शकत नाही. कारण शहर स्वच्छ ठेवणे, हे महापालिकेचे कर्तव्य आहे आणि त्यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ व अन्य सुविधा उपलब्ध करण्यासाठी महापालिकेने निधी उपलब्ध केलाच पाहिजे, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने महापालिकेला सुनावत संबंधित कामगार महापालिकेच्या सेवेत रुजू झाल्याच्या २४० दिवसांनंतर त्यांना कायमस्वरूपी कामगार म्हणून वागवण्याचे व त्याचे सर्व लाभ पूर्वलक्षित प्रभावाने देण्याचा आदेश महापालिकेला दिला. (प्रतिनिधी)