शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

३१ आॅक्टोबरपर्यंत पाणी सोडू नका; ‘पाटबंधारे’चा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2018 04:51 IST

मुळा व भंडारदरा धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्यास औरंगाबाद पाटबंधारे महामंडळानेच अचानक स्थगिती दिली.

अहमदनगर/औरंगाबाद : मुळा व भंडारदरा धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्यास औरंगाबाद पाटबंधारे महामंडळानेच अचानक स्थगिती दिली. नगर जिल्ह्यातील दोन्ही धरणांतून येत्या ३१ आॅक्टोबरपर्यंत पाणी सोडू नका, असा महामंडाचा आदेश सोमवारी दुपारी पाटबंधारे विभागाला प्राप्त झाला़ त्यामुळे पाणी सोडण्याची प्रक्रिया थांबविली आहे.जायकवाडीला मुळा व भंडारदरा धरणातून पाणी सोडण्याची तयारी झाली होती़ सोमवारी १२ वाजता पाणी सोडणार होते़ तत्पूर्वी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सोमवारी पूर्वतयारीचा आढावा घेतला़ जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्माही बैठकीला हजर होते़ या वेळी अकोले तालुक्यातील शेतकरी अगस्ती सेतूवर ठाण मांडून असल्याचे सांगण्यात आले़ पाणी सोडल्यास अनुचित प्रकार घडू नये, यासाठी धुळे व नंदुरबार येथून राज्य राखीव पोलीस दलाची कुमक बोलविण्यात आली़ हे पथक नगरकडे निघाले होते़ पाटबंधारे विभागाचे अधिकारीही मुळा व निळवंडे धरणावर दाखल झाले होते़ आदेश येताच पाणी सोडणार होते़ त्यापूर्वी दुपारी अडीच वाजता औरंगाबाद पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालक अजय कोहिकर यांचे तूर्त पाणी न सोडण्याचे आदेश कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांना मिळाले.सर्वोच्च न्यायालयात ३१ आॅक्टोबरला सुनावणीप्रवरा व उर्ध्व गोदावरी धरण समूहातून मराठवाड्यातील जायकवाडी धरणात पाणी सोेडण्याच्या निर्णयाविरुद्ध डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी व संजीवनी सह. साखर कारखान्यांनी सर्वोच्च दाखल केलेल्या केलेल्या याचिकांवर आता३१ आॅक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबादAhmednagarअहमदनगर