शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

जायकवाडीतून पाणी सोडलेच नाही, अफवेमुळे गोदाकाठच्या गावांमध्ये भीती तर प्रशासनास डोकेदुखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2017 21:19 IST

पैठण येथील जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडून पाणी सोडण्यात आल्याची अफवा पसरल्याने गोदावरी नदीकाठच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

औरंगाबाद, दि. 19 : पैठण येथील जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडून पाणी सोडण्यात आल्याची अफवा पसरल्याने गोदावरी नदीकाठच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. जायकवाडी प्रशासनास मंगळवारी दिवसभर लोकांनी फोन करून याबाबत विचारणा केली. त्यामुळे धरण प्रशासनाने सायंंकाळी अधिकृत प्रेसनोट काढून पाणी सोडले नसल्याचा खुलासा केला आहे.या बाबत धरण अभियंता अशोक चव्हाण यांनी सांगितले की, मंगळवारी प्रकल्पाचे एक ही गेट उघडले नाही. ह्यजायकवाडी धरणाचे दरवाजे उघडून गोदावरी नदीत पाणी सोडलेह्ण अशी बातमी सोशल मीडियावरून पसरविली जात आहे ती पूर्णपणे खोटी आहे. अशा अफवांवर लोकांनी विश्वास ठेऊ नये.धरणामध्ये मंगळवारी ६७.५३ टीएमसी म्हणजे ८८.१० टक्के जलसाठा असून आवाक ४३०० क्युसेक होती. नाशिककडून येणाºया पाण्याची आवाक मंदावली असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. पाणी सोडल्याच्या अफवांमुळे गोदाकाठच्या अनेक गावांत एकच गोंधळ उडाला. पूराच्या भीतीने गावकºयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. वाढता साठा पाहता जायकवाडीतून पाणी सोडण्यात येणार असल्याची मागच्या आठवड्यापासून जोरदार चर्चा सुरू आहे.गेल्या आठवड्यात लोकमतशी बोलताना लाभक्षेत्र विकास प्राधिकरण (कडा) कार्यालयाचे अधीक्षक अभियंता व प्रशासक बी. एस. स्वामी यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला होता. ते म्हणाले, जायकवाडीतील पाणी पातळी ९४ टक्क्यांपेक्षा अधिक झाल्यानंतर पाण्याचा विसर्ग करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.

टॅग्स :Damधरण