शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

विज्ञान साहित्याकडे दुर्लक्ष करू नये! - डॉ. बाळ फोंडके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 5:16 AM

जैवशास्त्राच्या क्रांतीचे जसे फायदे झाले आहेत, तसेच काही नैतिक, सामाजिक प्रश्नही त्यातून निर्माण होत आहेत. त्याची जाणीव विज्ञान साहित्यातून घडते. त्यामुळे विज्ञान साहित्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही.

- विशेष प्रतिनिधीअलिबाग : जैवशास्त्राच्या क्रांतीचे जसे फायदे झाले आहेत, तसेच काही नैतिक, सामाजिक प्रश्नही त्यातून निर्माण होत आहेत. त्याची जाणीव विज्ञान साहित्यातून घडते. त्यामुळे विज्ञान साहित्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. या पार्श्वभूमीवर यंदाच्या ४३ व्या महानगर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाकरिता माझी निवड केली हा मी माझा नव्हे तर विज्ञान साहित्याचा बहुमान समजतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ संशोधक तथा विज्ञान कथालेखक डॉ. बाळ फोंडके यांनी केले आहे. अलिबागजवळच्या कुरूळ येथील क्षात्रैक्य माळी समाज सभागृहातील डॉ. मा.ना. आचार्य साहित्य नगरीत रविवारी मुंबई मराठी साहित्य संघ आणि साहित्य रसिक अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने ४३ व्या महानगर साहित्य संमेलनाचे आयोजित केले होते. त्यावेळी डॉ.फोंडके बोलत होते.फोंडके म्हणाले की, संपूर्ण जग हे ज्ञानाधिष्ठित उद्योगसंस्कृतीकडे वळले आहे. त्यासाठी लागणारे भांडवल हे नवनिर्मितीच्या ज्ञानाचे आहे आणि असे ज्ञान विज्ञान साहित्यातून मिळते. विज्ञानाच्या आविष्कारांचा मानवी जीवनावर विशेष प्रभाव आहे. माहिती तंत्रज्ञान आणि जैवशास्त्राने मारलेल्या मुसंडीचे परिणाम माणसाच्या ऋणानुबंधावर दिसून येत आहेत. या क्रांतीमुळे जग जरी जवळ आले असले, तरी माणसांमध्ये दुरावादेखील निर्माण झाला आहे. संपर्क माध्यमांतून माणसे भेटतात, पण प्रत्यक्ष भेट होत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.उद्घाटनानंतर दुसºया सत्रात, डॉ.समीरण वाळवेकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘समाज माध्यमे आणि वाचन संस्कृती’ या विषयावरील परिसंवादात राही पाटील, श्रीरंजन आवटे आणि आदित्य दवणे सहभागी झाले होते.दुपारच्या सत्रात ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक सुमित्रा भावे यांची सुनंदा अमरापूरकर यांनी घेतलेली मुलाखत रंगली. कविसंमेलनात अप्पा ठाकूर, नामदेव कोळी, किशोर पाठक,संजय चौधरी,रमेश धनावडे आदींनी कविता सादर केल्या. 

टॅग्स :scienceविज्ञानRaigadरायगड