शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
2
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
6
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
7
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
8
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
9
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
10
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
11
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
12
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
13
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
14
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
15
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
16
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
17
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
18
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
19
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
20
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा

'ही' ३ महत्त्वाची खाती NCP ला देऊ नका; शिवसेना मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2023 12:36 IST

अजित पवारांसह छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ यांच्यासारखे दिग्गज सरकारमध्ये सहभागी झाल्याने त्यांच्याकडे महत्त्वाची खाती सोपवण्याची चर्चा आहे.

मुंबई – शिवसेना-भाजपा सरकारला १ वर्ष पूर्ण होत असताना दुसरीकडे रविवारी अनपेक्षितपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते सरकारमध्ये सहभागी झाले. अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे ८ दिग्गज नेते सरकारमध्ये आल्यानंतर शिवसेना नेत्यांची कोंडी झाल्याचे पाहायला मिळते. अजित पवारांवर निधी न दिल्याचा आरोप करत मविआ सरकारमधून बाहेर पडलेले शिवसेना आमदार आता अजित पवारांची उपमुख्यमंत्री पदावर नेमणूक झाल्याने नाराज असल्याची चर्चा आहे.

त्यात आज नव्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर कॅबिनेटची पहिलीच बैठक होत आहे. तत्पूर्वी शिवसेना मंत्र्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीतही नाराजीचा सूर उमटला. या बैठकीत मंत्र्यांनी अर्थ, जलसंपदा आणि सार्वजनिक बांधकाम खाते राष्ट्रवादीला देऊ नका अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

अजित पवारांसह छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ यांच्यासारखे दिग्गज सरकारमध्ये सहभागी झाल्याने त्यांच्याकडे महत्त्वाची खाती सोपवण्याची चर्चा आहे. कारण याआधी या मंत्र्यांनी या खात्यांचा कारभार पाहिलेला आहे. परंतु जर अर्थ, जलसंपदा आणि सार्वजनिक बांधकामसारखी महत्त्वाची खाती राष्ट्रवादीला मिळाली तर पुन्हा आपली आर्थिक कोंडी होऊ शकते अशी भीती शिवसेना आमदार, मंत्र्यांना आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादीच्या आमदारांना सर्वाधिक निधी दिला गेला असा आरोप शिवसेना आमदारांनी केला होता.

मविआ सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थ खाते अजित पवारांकडे होते. अजित पवारांनी त्यांच्या पक्षाच्या आमदारांना जास्त निधी दिला. त्याचसोबत शिवसेना आमदाराच्या मतदारसंघात पराभूत झालेल्या राष्ट्रवादी नेत्यांना बळ देण्याचे कामही अजित पवारांनी केले असा आरोप शिवसेना आमदारांनी सातत्याने केला. त्याच अजित पवारांसोबत पुन्हा काम करण्याची वेळ आता सेना आमदारांवर आली आहे. त्यामुळे काहीशी नाराजी पाहायला मिळत आहे.

अर्धी भाकरी मिळाली....

एकनाथ शिंदेंसोबत आम्ही सगळे आलो होतो. राजकारणात हे चालत असते. नाराज होऊन आम्ही काय करणार? जी वस्तूस्थिती आहे ती स्वीकारली पाहिजे. नाराजी चालत राहते. ठीक आहे. ज्याला १ भाकरी मिळाली त्यांना अर्धी भाकरी मिळाली. ज्यांना अर्धी भाकरी मिळाली त्याला पाव मिळाली. सध्यातरी आम्ही खुश आहोत असं म्हणत शिवसेना नेते भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदे