शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

'ही' ३ महत्त्वाची खाती NCP ला देऊ नका; शिवसेना मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2023 12:36 IST

अजित पवारांसह छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ यांच्यासारखे दिग्गज सरकारमध्ये सहभागी झाल्याने त्यांच्याकडे महत्त्वाची खाती सोपवण्याची चर्चा आहे.

मुंबई – शिवसेना-भाजपा सरकारला १ वर्ष पूर्ण होत असताना दुसरीकडे रविवारी अनपेक्षितपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते सरकारमध्ये सहभागी झाले. अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे ८ दिग्गज नेते सरकारमध्ये आल्यानंतर शिवसेना नेत्यांची कोंडी झाल्याचे पाहायला मिळते. अजित पवारांवर निधी न दिल्याचा आरोप करत मविआ सरकारमधून बाहेर पडलेले शिवसेना आमदार आता अजित पवारांची उपमुख्यमंत्री पदावर नेमणूक झाल्याने नाराज असल्याची चर्चा आहे.

त्यात आज नव्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर कॅबिनेटची पहिलीच बैठक होत आहे. तत्पूर्वी शिवसेना मंत्र्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीतही नाराजीचा सूर उमटला. या बैठकीत मंत्र्यांनी अर्थ, जलसंपदा आणि सार्वजनिक बांधकाम खाते राष्ट्रवादीला देऊ नका अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

अजित पवारांसह छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ यांच्यासारखे दिग्गज सरकारमध्ये सहभागी झाल्याने त्यांच्याकडे महत्त्वाची खाती सोपवण्याची चर्चा आहे. कारण याआधी या मंत्र्यांनी या खात्यांचा कारभार पाहिलेला आहे. परंतु जर अर्थ, जलसंपदा आणि सार्वजनिक बांधकामसारखी महत्त्वाची खाती राष्ट्रवादीला मिळाली तर पुन्हा आपली आर्थिक कोंडी होऊ शकते अशी भीती शिवसेना आमदार, मंत्र्यांना आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादीच्या आमदारांना सर्वाधिक निधी दिला गेला असा आरोप शिवसेना आमदारांनी केला होता.

मविआ सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थ खाते अजित पवारांकडे होते. अजित पवारांनी त्यांच्या पक्षाच्या आमदारांना जास्त निधी दिला. त्याचसोबत शिवसेना आमदाराच्या मतदारसंघात पराभूत झालेल्या राष्ट्रवादी नेत्यांना बळ देण्याचे कामही अजित पवारांनी केले असा आरोप शिवसेना आमदारांनी सातत्याने केला. त्याच अजित पवारांसोबत पुन्हा काम करण्याची वेळ आता सेना आमदारांवर आली आहे. त्यामुळे काहीशी नाराजी पाहायला मिळत आहे.

अर्धी भाकरी मिळाली....

एकनाथ शिंदेंसोबत आम्ही सगळे आलो होतो. राजकारणात हे चालत असते. नाराज होऊन आम्ही काय करणार? जी वस्तूस्थिती आहे ती स्वीकारली पाहिजे. नाराजी चालत राहते. ठीक आहे. ज्याला १ भाकरी मिळाली त्यांना अर्धी भाकरी मिळाली. ज्यांना अर्धी भाकरी मिळाली त्याला पाव मिळाली. सध्यातरी आम्ही खुश आहोत असं म्हणत शिवसेना नेते भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदे