शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’साठी ठाकरे बंधू मोर्चास्थळी निघाले; आदित्य-अमित ठाकरेही सोबत आले
2
जबरदस्त शक्तीप्रदर्शन होणार...! एकाचवेळी ५५ देश आपल्या युद्धनौका भारताच्या समुद्रात पाठविणार; नौदलाने हुंकार भरला...
3
रोहित आर्याबाबत मोठा खुलासा! कोथरुडचा घरमालक उलटे १.७५ लाख द्यायला तयार झालेला; शेवटी...
4
"नरेंद्र मोदींची छाती ११२ इंचाची, अवघ्या ५ तासांत पूर्ण पाकिस्तानवर कब्जा केला असता, पण..."
5
पाच वर्षांत अफाट परतावा देणारे शेअर्स कोणते, गुंतवणूकदारांसाठी संकेत काय? तुमच्याकडे आहे का?
6
BCCI: "आणखी दोन-तीन दिवस वाट पाहू, जर ट्रॉफी परत मिळाली नाही तर...", बीसीसीआयची कडवी भूमिका
7
“मविआचे ३१ खासदार निवडून आले, तेव्हा मतचोरी झाली का”; भाजपाचा सवाल, राज ठाकरेंबद्दल म्हणाले... 
8
Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू 
9
आज पुन्हा घसरलं सोनं-चांदी, लग्नसराईला सुरुवात होण्यापूर्वी किती स्वस्त झाला? पटापट चेक करा लेटेस्ट रेट
10
भारतानं मिळवलं दहशतवादावर नियंत्रण, २०१३ नंतर कुठेही मोठा दहशतवादी हल्ला नाही - अजित डोवाल
11
"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
12
'या' रेल्वे कंपनीला मुंबई मेट्रोकडून मिळालं २४८१ कोटी रुपयांचं काम, फोकसमध्ये राहणार शेअर्स
13
Mumbai Traffic Update: मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल;  'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना
14
Plastic Bans: महाराष्ट्राच्या शेजारी राज्याने प्लास्टिक वापराबाबत उचललं कठोर पाऊल!
15
केरळमध्ये आता कुणीही 'अत्यंत गरीब' नाही, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा मोठा दावा
16
टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर...
17
शुक्र गोचर २०२५: २ नोव्हेंबर, कार्तिकीच्या मुहूर्तावर 'मालव्य' राजयोगात ५ राशींना धन-समृद्धी योग!
18
SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?
19
KYC पूर्ण नसेल तर FASTag बंद होणार का; पाहा NHAI काय म्हटलं? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
20
श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार?

मुंबईत रेल्वे प्रवास करणा-या महिलांच्या डब्याला सर्वसाधारण करू नका ; गृह विभागाच्या प्रधान सचिवांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2017 19:51 IST

मुंबईत कामावर जाणा-या महिलांची वाढती संख्या पाहता सद्यस्थितीमध्ये महिलांकरिता आरक्षित असलेले डबे कमी पडत आहेत. त्यातच रात्रीच्या महिलावर अत्याचाराचा घटना घडत आहेतच. दिवसाढवळया महिलांवर अत्याचार होण्याच्या घटना घडत आहेत.

नागपूर : मुंबईत कामावर जाणा-या महिलांची वाढती संख्या पाहता सद्यस्थितीमध्ये महिलांकरिता आरक्षित असलेले डबे कमी पडत आहेत. त्यातच रात्रीच्या महिलावर अत्याचाराचा घटना घडत आहेतच. दिवसाढवळया महिलांवर अत्याचार होण्याच्या घटना घडत आहेत. जुईनगर येथे लोकलच्या महिला डब्यात पोलिस जवान नसल्याने महिलेला चोरटयाने लुटून लोकलमधून ढकलून दिल्याची घटना घडली असतांनाही आरपीएफचे मुख्य सुरक्षा आयुक्तांनी अशा प्रकारे निर्णय घेऊन महिलाबददलची अनास्था दाखवून दिल्याची भावना व्यक्त होत आहे. यावर शासन स्तरावरून सदर कार्यवाहीयाबाबत योग्य ती सकारात्मक कृती होण्याच्या दृष्टीने तशा सूचना आरपीएफच्या मुख्य सुरक्षा आयुक्तांना तातडीने द्याव्यात, ही आपणास विनंती करित आहे. त्यामुळे रेल्वे प्रवासी महिलांची गैरसोय होणे टाळता येईल असे निवेदन आज शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गृह विभागाला दिले आहे.

त्या आपल्या निवेदनात म्हणतात, ‘राज्य शासन महिलांवरिल होणारे अत्याचार ,हल्ले,रोखण्याकरिता शासन कायदा विविध उपाययोजना आखत आहे. महिलांचा सन्मान व्हावा यादृष्टीने पावले उचलली जात आहेत.असे असतांना त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने विचार करणे गरजेचे असतांनाही उलटपक्षी महिलांकरिता आरक्षित असलेला डबा पोलिसांची संख्या कमी असल्याने रदद करण्याचा प्रस्ताव रेल्वे सुरक्षा बलाने मांडला आहे.  मुंबई शहरामध्ये  रेल्वेमधून प्रवास करणा-या महिलांवरील अत्याचार,हल्ल्याचे वाढलेले प्रमाण लक्षात घेऊन सर्व स्तरावरुन झालेल्या मागणीनुसार रेल्वे प्रशासनाने महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रात्रीच्या वेळी लोकलसाठी प्रत्येक लोकलमध्ये जीआरपी पोलिस उपलब्ध करून दिले होते. असे असताना मध्य रेल्वेच्या आरपीएफचे मुख्य सुरक्षा आयुक्तांनी विभागीय व्यवस्थापकांना पत्र पाठवून सायं ७ ते रात्री ११ या काळात लोकलमधील महिलांच्या चार डब्यांपैकी एक डबा सुरक्षेसाठी पोलिस जवान नसल्याने कमी करण्याची शिफारस केलेली आहे यावर गृह विभागाने सूचना देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

याबाबत दिनांक २६ ऑक्टोबर २०१७ रोजी आ. डॉ. गोऱ्हे यांच्या मागणीवरून गृह राज्य मंत्री दीपक केसरकर यांनी मंत्रालय, मुंबई येथे रेल्वे प्रवासी संघटनांच्या प्रतिनिधीसोबत आपल्या उपस्थितीत एक विशेष बैठकदेखील घेतली होती. या बैठकीला रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. उपनगरीय रेल्वे मध्ये आवश्यक प्रमाणात पोलीस कर्मचारी असावेत यासाठी सखोल चर्चा होऊन याबाबत अवाश्यक उपाय योजना करण्याचे या अधिकाऱ्यांनी मान्य केले होते. 

टॅग्स :Neelam gorheनीलम गो-हेMumbai Localमुंबई लोकल