शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

गुन्हेगारांना सुरक्षित आयुष्य जगण्याचा अधिकार नाही का? उच्च न्यायालयाने संरक्षण धोरणावरून राज्य सरकारला फटकारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 04:27 IST

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांचे जीवन त्यांच्याच कृत्यामुळे धोक्यात येत असल्याने त्यांना पोलीस संरक्षण देण्याची तरतूद सुधारित संरक्षण धोरणात नाही, अशी माहिती सरकारी वकिलांनी मंगळवारी उच्च न्यायालयाला दिली. मात्र...

मुंबई : गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांचे जीवन त्यांच्याच कृत्यामुळे धोक्यात येत असल्याने त्यांना पोलीस संरक्षण देण्याची तरतूद सुधारित संरक्षण धोरणात नाही, अशी माहिती सरकारी वकिलांनी मंगळवारी उच्च न्यायालयाला दिली. मात्र, या धोरणावर उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी दर्शवली. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना सुरक्षित आयुष्य जगण्याचा अधिकार नाही का, असा सवाल करत उच्च न्यायालयाने राज्य सरकारचीच खरडपट्टी काढली.गेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने खासगी व्यक्तींना संरक्षण देण्याच्या धोरणावर पुनर्विचार करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले होते. त्यानुसार मुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी सुधारित धोरण मुख्य न्या. मंजुळा चेल्लूर व न्या. एम.एस. सोनक यांच्या खंडपीठापुढे सादर केले.गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांचे जीवन त्यांच्याच कृत्यामुळे धोक्यात येत असल्याने त्यांना पोलीस संरक्षण देण्यात येणार नाही, अशी तरतूद सुधारित धोरणात करण्यात आली आहे, अशी माहिती वग्यानी यांनी न्यायालयाला दिली. त्यावर न्यायालयाने संताप व्यक्त केला. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना सुरक्षित जीवन जगण्याचा अधिकार नाही, असे सरकारला वाटते, असाच याचा अर्थ होतो. हा काय मूर्खपणा आहे? गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना कोणताही अधिकार नाही, असे सरकारला म्हणायचे आहे का? कोणीही येऊन त्यांना ठार मारावे का? अशा शब्दांत मुख्य न्या. चेल्लूर यांनी सरकारला फैलावर घेतले.गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना पोलीस संरक्षण न देण्याची सूचना महाअधिवक्ता व अतिरिक्त पोलीस आयुक्तांनीच संबंधित प्राधिकरणाला केल्याची माहिती वग्यानी यांनी न्यायालयाला दिली. त्यावर न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले. ‘ही जर तुमच्या वरिष्ठ पोलीस अधिकाºयाची आणि ज्येष्ठ विधिज्ञाची सूचना असेल, तर देवानेच जनतेला वाचवावे,’ अशा शब्दांत मुख्य न्या. चेल्लूर यांनी महाअधिवक्ता व अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या सूचनेवर टीका केली.नेतेमंडळी व बॉलीवूड अभिनेते, अभिनेत्री तसेच उद्योजक यांना राज्य सरकार पोलीस संरक्षण पुरविते. परंतु, ही मंडळी संरक्षणाची रक्कम सरकारी तिजोरीत जमा करत नसल्याने त्यांच्याकडून थकीत रक्कम वसूल करण्याचे निर्देश पोलीस दलाला द्यावेत, अशी विनंती करणारी जनहित याचिका व्यवसायाने वकील असलेले सनी पुनामिया यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. याचिकेनुसार, सुमारे १००० पोलीस व्हीआयपींच्या संरक्षणासाठी तैनात करण्यात आले आहेत. त्यापैकी तब्बल ६०० पोलीस मुंबईतील व्हीआयपींच्या सेवेत आहेत.महाअधिवक्त्यांना उपस्थित राहण्याचे निर्देश‘संबंधित प्राधिकरणाने सारासार विचार केलेला नाही. तुम्ही केवळ जुन्या धोरणातील काही वाक्ये बदलली आहेत. त्यातून हे धोरण स्पष्ट होत नाही. त्यामुळे हे धोरण आम्ही मंजूर करू, अशी तुम्ही अपेक्षा कशी करू शकता?’ असा सवालही न्यायालयाने सरकारला केला. तसेच राज्य सरकारच्या धोरणावर नाराजी व्यक्त करत ३० नोव्हेंबर रोजी खुद्द महाअधिवक्त्यांनाच सुनावणीस उपस्थित राहण्याचे निर्देश दिले.

टॅग्स :Mumbai High Courtमुंबई हायकोर्टCourtन्यायालयMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार