तंटामुक्त गावांचे जिल्हाबाह्य मुल्यमापन प्रलंबित !

By Admin | Updated: July 20, 2014 22:49 IST2014-07-20T22:49:43+5:302014-07-20T22:49:43+5:30

राज्यभरातील हजारो गावांना शासन निर्णय व जिल्हाबाह्य मुल्यमापणाची प्रतीक्षा आहे.

Distribution of untouched villages is pending! | तंटामुक्त गावांचे जिल्हाबाह्य मुल्यमापन प्रलंबित !

तंटामुक्त गावांचे जिल्हाबाह्य मुल्यमापन प्रलंबित !

वाशिम: आचारसंहितेच्या बडग्यामुळे आधीच अंमलबजावणीला ग्रहण लागलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत २0१२-१३ तंटामुक्त ग्राम होण्याच्या दिशेने पाउल उचलणार्‍या तसेच २0१३-१४ मध्ये स्वयंमुल्यमापनानंतर जिल्हांतर्गत मुल्यमापणाची प्रक्रीया पार पाडणार्‍या राज्यभरातील हजारो गावांना शासन निर्णय व जिल्हाबाह्य मुल्यमापणाची प्रतीक्षा आहे.
गावातील तंटे गावातच मिटविण्याचा महत्वाकांक्षी दृष्ट्रीकोन ठेवून राज्य शासनाने सन २00७ पासून राज्यभरात महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरु केली.या मोहीमेत ग्रामस्थांचा सहभाग वाढविण्यासाठी उत्कृष्ठ कामगिरी करणार्‍या गावांना लोकसंख्येच्या प्रमाणावर आधारीत लाखोचे पुरस्कार देण्याचे धोरण अंगीकारले. सोबतच या मोहिमेचा प्रचार व प्रसार व्यापक प्रमाणात होण्यासाठी राज्यभरातील पत्रकांरासाठी पूरस्कार योजनाही राबविली गेली. एकट्या वाशीम जिल्ह्यात या सर्व शासकीय उपकक्रमाचा परिपाक म्हणून आजतागायत ४९३ ग्रामपंचायतीपैकी २७२ गावांनी तंटामुक्त ग्राम म्हणून घोषित होण्यासह जवळपास सहा कोटी रुपये जिल्ह्याला पूरस्काररुपात मिळवून दिले आहेत. २0१३-१४ मध्ये महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेच्या गतीला पार पडलेल्या सोळाव्या लोकसभेच्या निवडणूकिसह काही ठिकाणच्या विधानसभेच्या पोटनिवडूकिसाठीच्या आचारसंहितेमुळे गतिरोध लागला होता. दरवर्षीच्या नियोजनानुसार तंटामु.क्तीच्या कार्याचे मुल्यमापन करणार्‍या १५ एप्रिलपूर्वी गठीत होणे आवश्यक असतांना त्या ५ मे पूर्वी गठीत कराव्या लागल्या. ३0 एप्रीलपूर्वी प्रशिक्षण व मुल्यमापणाची करावी लागणारी कारवाई २२ मे पूर्वी करावी लागली. सहाजीकच मुल्यमापनाच्या कामासाठी ५ जून ते ५ जूलै पर्यंतचा कालावधी शासनाला निश्‍चीत करावा लागला. अर्थात शासनाने ठरवून दिलेल्या कालावधीत समित्यांचे गठण व स्वयंमुल्यमापणानंतरची जिल्हांतर्गत मुल्यमापणाची प्रक्रीया राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्याने पार पाडली. परंतू शासनाने राज्यभरातील कोणत्या जिल्ह्याची समिती कोणत्या जिल्ह्याचे जिल्हाबाह्य मुल्यमापन करेल याचा निर्णयच आजतागायत न घेतल्याने आधी आचारसंहितेच्या कचाट्यात अडकलेल्या २0१३-१४ मध्ये तंटांमुक्त गाव मोहिमेत सहभागी गावांना यासंबंधी शासन निर्णयाची प्रतीक्षा आहे. अर्थात २0११-१२ प्रमाणे तंटामुक्त गाव मोहिमेच्या निर्णयासंबंधी निर्णय घेण्यास शासनाने विलंब लावला व होउ घातलेल्या विधानसभा निवडणूकिची आचारसंहिता लागण्यापूर्वी त्यासंबंधी निर्णय न लागल्यास राज्यभरातील हजारो गावांच्या हिताच्या या मोहिमेला मोठे ग्रहण लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

** महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत २0१३-१४ मध्ये वाशीम जिल्ह्यातील ९६ गावांनी स्वयंमुल्यमापणाचे अहवाल सादर केल्याने त्या गावांचे जिल्हांतर्गत मुल्यमापणाचे काम जिल्ह्यातील सहाही तालुकास्तरीय समित्यांनी ५ जूलै पूर्वी केले. यामध्ये वाशिम तालूक्यातील १३, कारंजा तालूक्यातील २३, मानोरा तालूक्यातील १९, मंगरुळपीर तालूक्यातील १७, रिसोड तालूक्यातील २0 व मालेगाव तालूक्यातील ४ गावांचा समावेश होता. जिल्हाभरातील २७२ गावे तंटामुक्त गाव म्हणून घोषित झाली असली तरी आजही २२१ गावांना तंटामुक्त गावं मोहीमेत सहभागी होण्याची व पूरस्कारासाठी पात्र ठरण्याची प्रतीक्षा आहे. जिल्हांतर्गत मूल्यमापणाची प्रक्रीया पार पाडणार्‍या या गावांना आता जिल्हाबाह्य मुल्यमापणाची प्रतीक्षा आहे. अर्थात २0१३-१४ ची ही सर्व प्रक्रिया १५ ऑगस्ट २0१४ पूर्वी पूर्ण करुन प्रत्येक जिल्ह्याला २0१४-१५ साठी मोहिमेची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने कामाला लागता येणे सोईचे होणार आहे.
२0१२-१३ मध्ये महात्मा गांधी तंटामुक्त गावं मोहिमेंतर्गत वाशीम जिल्ह्यातील ३६ गावांचा जिल्हाबाह्य मुल्यमापणाचा अहवाल राज्य शासनाकडे पाठविण्यात आला होता. त्यापैकी कोणत्या गावांची तंटामुक्त गाव म्हणून निवड केली गेली हे राज्य शासनाने आजतागायत जाहीर केले नाही. त्यामुळे २0१२-१३ मधील अहवाल पाठविणारी राज्यभरातील गावे एकीकडे आपण पूरस्कारासाठी पात्र ठरलो किंवा नाही याची प्रतीक्षा करीत असतांनाच राज्य शासनाला २0१३-१४ मध्ये मोहिमेत सहभागी गावांच्या जिल्हाबाह्य मुल्यमापणासंबंधीही निर्णय जाहीर करावा लागणार आहे.

Web Title: Distribution of untouched villages is pending!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.