शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

मुस्लिम समाजाच्या मालमत्ता हस्तांतरणातील संभ्रम दूर; सरकारचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2018 01:09 IST

अभिलेख्यातील नोंदणीसाठी यापुढे ‘हिबानामा’ नोंदणीकृत असण्याची गरज राहणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

यवतमाळ : अभिलेख्यातील नोंदणीसाठी यापुढे ‘हिबानामा’ नोंदणीकृत असण्याची गरज राहणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे मुस्लिस समाजातील मालमत्तांच्या हस्तांतरणामधील संभ्रम दूर झाला आहे.मुस्लिम व्यक्तिगत कायद्यांतर्गत मालमत्तांचे वाटप किंवा बक्षीस हे तोंडी किंवा लेखी स्वरूपात असते, त्याला ‘हिबानामा’ असे म्हटले जाते. परंतु हा ‘हिबानामा’ सादर केल्यानंतर महसूल अधिकाऱ्यांमार्फत तो नोंदणीकृत नाही म्हणून अभिलेखात नोंदी घेतल्या जात नाही. याबाबत महसूल विभागातच संभ्रम पहायला मिळत होता. मात्र हा संभ्रम दूर करीत राज्य शासनाने ‘हिबानामा’ नोंदणीकृत असण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले आहे. याबाबतचे परिपत्रक जारी करण्याचा निर्णय मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यासंदर्भात महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.मोठा दिलासाया निर्णयामुळे राज्यात मुस्लिम समाजातील बक्षीस पत्रांद्वारे झालेल्या व ठिकठिकाणी प्रलंबित असलेल्या मालमत्तांच्या नोंदी सुरळीत होण्याचा मार्ग सुकर झाला आहे.२०११ मध्ये सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा बक्षीस पात्र मालमत्तांच्या नोंदींसाठी नोंदणीकृत ‘हिबानामा’ची गरज नसल्याचे स्पष्ट केले होते.

टॅग्स :Muslimमुस्लीमDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाGovernmentसरकार