शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

शिंदे गटात मंत्रिपदावरून नाराजीचे वारे? कडूंना कॅबिनेट, शिरसाटांनाही व्हायचेय? केसरकर म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 21:47 IST

संजय राऊतांनी राजीनामा द्यावा मगच बोलावे, त्यांना काय माहितीय शरद पवार माझे संबंध, पवारांनीच मला शिकवलेय असे केसरकर म्हणाले. 

एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पद मिळाल्याने आम्हाला सुखद धक्का बसला आहे. हे पंतप्रधान मोदी, शहा, नड्डा आणि देवेंद्र फडणवीसांमुळे झाले आहे. फडणवीसांनी सत्तेचा त्याग केला, उद्धव ठाकरे हो मोठे नेते आहेत, त्यांना वेळ आल्यावर उत्तर देऊ, अशा शब्दांत शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी गेल्या दोन दिवसांतील घडामोडींची माहिती दिली आहे. 

आमच्यामध्ये कोणीही नाराज नाही. शिंदे गटामध्ये मंत्रिपदावरून नाराजी असल्याचे बोलले जात आहे. तसे काही नाही. आम्ही महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र आलो आहोत. यामुळे शिंदेंनी आम्हाला आपल्या कोणालाही मंत्रिपद मिळणार नाही असे जरी सांगितले तरी एकही आमदार मंत्री झाला नाही तरी शिंदेंसोबत असेल, असे म्हणत नाराजीच्या वृत्ताचे खंडन केले आहे. 

शिंदे गटात बच्चू कडू यांनी आपल्याला राज्यमंत्री पद नको तर कॅबिनेट मंत्री पद हवेय अशी मागणी केल्याची चर्चा आहे. तर औरंगाबादमधील संजय शिरसाट यांनाही मंत्रीपद हवे आहे, त्यावरून ते नाराज असल्याचे बोलले जात आहे. यावर केसरकर यांनी खुलासा केला. 

देवेंद्र फडणवीस यांच्याकाळातील काही योजना बंद पडल्या होत्या. जलयुक्त शिवार ही शेता शेतात पाणी पोहोचविण्याची योजना होती, ती त्यांनी सुरु केली आहे. योजना अंमलात येत असताना काही चुका होतात, त्याचा दोष प्रमुखावर कसा देता येईल, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. संजय राऊतांनी राजीनामा द्यावा मगच बोलावे, त्यांना काय माहितीय शरद पवार माझे संबंध, पवारांनीच मला शिकवलेय असे केसरकर म्हणाले. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDeepak Kesarkarदीपक केसरकर Shiv SenaशिवसेनाBacchu Kaduबच्चू कडू